शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
5
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

पाण्याचे दुर्भिक्ष्य थांबविण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज

By admin | Updated: January 14, 2017 00:06 IST

जळगाव : राज्यात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. कोकणात न थांबणारे पाणी आहे. जोरदार पाऊस असतो, पण कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. ही समस्या थांबवायची असेल तर उच्च तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल, असे मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी चिपळूण येथे आयोजित १० व्या जलसाहित्य संमेलनात व्यक्त केले.

जळगाव : राज्यात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. कोकणात न थांबणारे पाणी आहे. जोरदार पाऊस असतो, पण कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. ही समस्या थांबवायची असेल तर उच्च तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल, असे मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी चिपळूण येथे आयोजित १० व्या जलसाहित्य संमेलनात व्यक्त केले.
या संमेलनाच्या आयोजनस्थळाला स्व.भवरलाल जैननगर असे नाव देण्यात आले असून, या नगरात संमेलनाचे उद्घाटन गीते यांच्याहस्ते झाले. या वेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, डॉ.अशोक कुकडे, जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.दत्ता देशकर, आमदार सदानंद चव्हाण, जैन इरिगेशनचे विपणनप्रमुख अभय जैन, गजानन देशपांडे, आनंद गुप्ते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री गीते म्हणाले, कोकणातील जमीन पाण्याचा निचरा करणारी आहे. धो धो पडणार्‍या पावसाचे पाणी अडविता आले तर उन्हाळ्यातील पाणीटंचाईची समस्या दूर होईल. कृषी क्षेत्रातील आघाडीवर असलेली जैन इरिगेशन ही कंपनी कोकणासाठी काही तरी चांगले करू पाहत असल्याचा आनंद गीते यांनी व्यक्त केला.

कोकणात लाखो हेक्टर जमीन आहे. पण सिंचन मात्र नाही. काही हजार हेक्टरसाठी सिंचनाची सुविधा आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोकणात केळीच्या पुनरूज्जीवनासाठी अनेक शेतकरी पुढे येत असून, ते उच्च तंत्रज्ञान अंगीकारत आहेत. त्याला चालना दिली जाईल, असे पालकमंत्री रवींद्र वायकर म्हणाले.
कोकणातील शेतकर्‍यांचा विकास व्हावा यासाठी जैन इरिगेशन प्रयत्नशील आहे. जैन इरिगेशनच्या अतिघनदाट आंबा लागवड पद्धतीने या पिकाचा चांगला विकास, विस्तार होईल. तसेच आंबा प्रक्रिया उद्योगासाठी मदत करू, असे जैन इरिगेशनचे विपणन संचालक अभय जैन म्हणाले.

लातुरातील भीषण पाणीटंचाईमागेल मानवाच्या चुकाही आहे. तेथे सध्या एक दिवसाआड पाणी दिले जाते. पण तेथे पाणीटंचाई दूर करण्यासाठी मांजरेचे पात्र १६ कि.मी. मोकळे केले. मोठी यंत्रणा त्यासाठी कार्यरत झाली. आठ कोटींमध्ये हे काम झाले. ३० बुलडोझर रात्रंदिवस काम करीत होते. आम्ही काम केले, पण कुणी पावत्या मागितल्या नाहीत. पारदर्शकपणे काम केले. रोजच्या कामाचे हिशेब व्हॉट्स ॲपवर प्रसारित केले. तेथे चांगले काम शक्य झाले. लोकसहभाग वाढला, असे संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अशोक कुकडे म्हणाले. डॉ.दत्ता देशकर यांनीही मनोगत व्यक्त केले.