शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे दुर्भिक्ष्य थांबविण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज

By admin | Updated: January 14, 2017 00:06 IST

जळगाव : राज्यात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. कोकणात न थांबणारे पाणी आहे. जोरदार पाऊस असतो, पण कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. ही समस्या थांबवायची असेल तर उच्च तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल, असे मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी चिपळूण येथे आयोजित १० व्या जलसाहित्य संमेलनात व्यक्त केले.

जळगाव : राज्यात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. कोकणात न थांबणारे पाणी आहे. जोरदार पाऊस असतो, पण कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. ही समस्या थांबवायची असेल तर उच्च तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल, असे मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी चिपळूण येथे आयोजित १० व्या जलसाहित्य संमेलनात व्यक्त केले.
या संमेलनाच्या आयोजनस्थळाला स्व.भवरलाल जैननगर असे नाव देण्यात आले असून, या नगरात संमेलनाचे उद्घाटन गीते यांच्याहस्ते झाले. या वेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, डॉ.अशोक कुकडे, जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.दत्ता देशकर, आमदार सदानंद चव्हाण, जैन इरिगेशनचे विपणनप्रमुख अभय जैन, गजानन देशपांडे, आनंद गुप्ते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री गीते म्हणाले, कोकणातील जमीन पाण्याचा निचरा करणारी आहे. धो धो पडणार्‍या पावसाचे पाणी अडविता आले तर उन्हाळ्यातील पाणीटंचाईची समस्या दूर होईल. कृषी क्षेत्रातील आघाडीवर असलेली जैन इरिगेशन ही कंपनी कोकणासाठी काही तरी चांगले करू पाहत असल्याचा आनंद गीते यांनी व्यक्त केला.

कोकणात लाखो हेक्टर जमीन आहे. पण सिंचन मात्र नाही. काही हजार हेक्टरसाठी सिंचनाची सुविधा आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोकणात केळीच्या पुनरूज्जीवनासाठी अनेक शेतकरी पुढे येत असून, ते उच्च तंत्रज्ञान अंगीकारत आहेत. त्याला चालना दिली जाईल, असे पालकमंत्री रवींद्र वायकर म्हणाले.
कोकणातील शेतकर्‍यांचा विकास व्हावा यासाठी जैन इरिगेशन प्रयत्नशील आहे. जैन इरिगेशनच्या अतिघनदाट आंबा लागवड पद्धतीने या पिकाचा चांगला विकास, विस्तार होईल. तसेच आंबा प्रक्रिया उद्योगासाठी मदत करू, असे जैन इरिगेशनचे विपणन संचालक अभय जैन म्हणाले.

लातुरातील भीषण पाणीटंचाईमागेल मानवाच्या चुकाही आहे. तेथे सध्या एक दिवसाआड पाणी दिले जाते. पण तेथे पाणीटंचाई दूर करण्यासाठी मांजरेचे पात्र १६ कि.मी. मोकळे केले. मोठी यंत्रणा त्यासाठी कार्यरत झाली. आठ कोटींमध्ये हे काम झाले. ३० बुलडोझर रात्रंदिवस काम करीत होते. आम्ही काम केले, पण कुणी पावत्या मागितल्या नाहीत. पारदर्शकपणे काम केले. रोजच्या कामाचे हिशेब व्हॉट्स ॲपवर प्रसारित केले. तेथे चांगले काम शक्य झाले. लोकसहभाग वाढला, असे संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अशोक कुकडे म्हणाले. डॉ.दत्ता देशकर यांनीही मनोगत व्यक्त केले.