शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

पाण्याचे दुर्भिक्ष्य थांबविण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज

By admin | Updated: January 14, 2017 00:06 IST

जळगाव : राज्यात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. कोकणात न थांबणारे पाणी आहे. जोरदार पाऊस असतो, पण कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. ही समस्या थांबवायची असेल तर उच्च तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल, असे मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी चिपळूण येथे आयोजित १० व्या जलसाहित्य संमेलनात व्यक्त केले.

जळगाव : राज्यात अनेक ठिकाणी पाण्याची समस्या आहे. कोकणात न थांबणारे पाणी आहे. जोरदार पाऊस असतो, पण कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष्य असते. ही समस्या थांबवायची असेल तर उच्च तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल, असे मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी चिपळूण येथे आयोजित १० व्या जलसाहित्य संमेलनात व्यक्त केले.
या संमेलनाच्या आयोजनस्थळाला स्व.भवरलाल जैननगर असे नाव देण्यात आले असून, या नगरात संमेलनाचे उद्घाटन गीते यांच्याहस्ते झाले. या वेळी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, डॉ.अशोक कुकडे, जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.दत्ता देशकर, आमदार सदानंद चव्हाण, जैन इरिगेशनचे विपणनप्रमुख अभय जैन, गजानन देशपांडे, आनंद गुप्ते आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री गीते म्हणाले, कोकणातील जमीन पाण्याचा निचरा करणारी आहे. धो धो पडणार्‍या पावसाचे पाणी अडविता आले तर उन्हाळ्यातील पाणीटंचाईची समस्या दूर होईल. कृषी क्षेत्रातील आघाडीवर असलेली जैन इरिगेशन ही कंपनी कोकणासाठी काही तरी चांगले करू पाहत असल्याचा आनंद गीते यांनी व्यक्त केला.

कोकणात लाखो हेक्टर जमीन आहे. पण सिंचन मात्र नाही. काही हजार हेक्टरसाठी सिंचनाची सुविधा आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोकणात केळीच्या पुनरूज्जीवनासाठी अनेक शेतकरी पुढे येत असून, ते उच्च तंत्रज्ञान अंगीकारत आहेत. त्याला चालना दिली जाईल, असे पालकमंत्री रवींद्र वायकर म्हणाले.
कोकणातील शेतकर्‍यांचा विकास व्हावा यासाठी जैन इरिगेशन प्रयत्नशील आहे. जैन इरिगेशनच्या अतिघनदाट आंबा लागवड पद्धतीने या पिकाचा चांगला विकास, विस्तार होईल. तसेच आंबा प्रक्रिया उद्योगासाठी मदत करू, असे जैन इरिगेशनचे विपणन संचालक अभय जैन म्हणाले.

लातुरातील भीषण पाणीटंचाईमागेल मानवाच्या चुकाही आहे. तेथे सध्या एक दिवसाआड पाणी दिले जाते. पण तेथे पाणीटंचाई दूर करण्यासाठी मांजरेचे पात्र १६ कि.मी. मोकळे केले. मोठी यंत्रणा त्यासाठी कार्यरत झाली. आठ कोटींमध्ये हे काम झाले. ३० बुलडोझर रात्रंदिवस काम करीत होते. आम्ही काम केले, पण कुणी पावत्या मागितल्या नाहीत. पारदर्शकपणे काम केले. रोजच्या कामाचे हिशेब व्हॉट्स ॲपवर प्रसारित केले. तेथे चांगले काम शक्य झाले. लोकसहभाग वाढला, असे संमेलनाचे अध्यक्ष डॉ.अशोक कुकडे म्हणाले. डॉ.दत्ता देशकर यांनीही मनोगत व्यक्त केले.