शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

मुंबई लोकलसाठी स्वतंत्र कंपनी हवी, जागतिक बँकेची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:50 IST

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रवासी रेल्वे कंपनी स्थापन करण्यात यावी, अशी सूचना जागतिक बँकेने केली आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या काही प्रकल्पांना जागतिक बँकेकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे बँकेने ही सूचना केली आहे.

नवी दिल्ली/मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रवासी रेल्वे कंपनी स्थापन करण्यात यावी, अशी सूचना जागतिक बँकेने केली आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या काही प्रकल्पांना जागतिक बँकेकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे बँकेने ही सूचना केली आहे.जागतिक बँकेचे भारताचे संचालक जुनैद अहमद यांनी येथे एका कार्यक्रमात सांगितले की, मुंबईला अत्यंत कार्यक्षम, टिकाऊ आणि भारताच्या पहिल्या उपनगरी रेल्वे कंपनीची गरज आहे. सध्या उपनगरीय रेल्वेसाठी प्रकल्पनिहाय दृष्टिकोन स्वीकारून व्यवस्थापन केले जाते. त्याऐवजी एक मजबूत सार्वजनिक संस्था निर्माण करण्याची गरज आहे.अहमद यांनी सांगितले की, प्रस्तावित कंपनी सरकारी मालकीची असू शकते, अशा कंपनीचे अनेक फायदे होतील. ही कंपनी अत्यंत कार्यक्षम असेल. बाजारातील संकेतांना ती चटकन प्रतिसाद देईल. ती बाजारातून भांडवल उभी करू शकेल आणि आपल्या कामगारांनाही समभाग देईल, अशी कंपनी स्थापन न झाल्यास बदलत्या तंत्रज्ञानाला प्रतिसाद देणे कठीण होऊन जाईल. हे तंत्रज्ञान संस्थेला हुलकावणी देत राहील. अहमद यांनी सांगितले की, अन्य सार्वजनिक आणि प्रवासी सेवांबाबतही हाच दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. केवळ प्रकल्प उभे करण्याऐवजी मजबूत संस्था उभ्या करण्यासाठी हालचाली करणे आवश्यक आहे. चांगल्या गुंतवणूक संधी निर्माण करणाऱ्या व्यवस्थेकडून बँक विनियोजनक्षम संस्था निर्माण करणे हे आगामी काळातील आव्हान राहणार आहे. कार्यक्षम संस्था निर्माण करणे येत्या काळात महत्त्वाचे ठरेल.६0 लाख प्रवासीमुंबई उपनगरीय रेल्वेने दररोज ६ दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. शहरात एकूण चार मार्गांवरून गाड्या धावतात. या सेवेचे व्यवस्थापन मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयामार्फत केले जाते. रेल्वेला मिळणाºया एकूण महसुलात उपनगरीय रेल्वेच्या महसुलाचा मोठा वाटा आहे. जागतिक बँक २00२ पासून मुंबईतील रेल्वे व्यवस्थेशी संबंधित आहे. दोन प्रकल्पांमार्फत प्रशस्त आणि अत्यंत कमी ऊर्जेवर चालणाºया दोन रेल्वे रेक्स प्रकल्पांना जागतिक बँकेने अर्थसाह्य केले आहे.लोकलमुळे ४ हजार कोटींचा तोटामुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेमुळे (लोकल) गेल्या तीन वर्षांत रेल्वे विभागास ४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला असल्याची माहिती सरकारने संसदेत दिली आहे. रेल्वे राज्यमंत्री राएन गोहेन यांनी लोकसभेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, २0१४-१७ या काळात उपनगरीय सेवेमुळे रेल्वेला ४,२७९ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलIndian Railwayभारतीय रेल्वे