शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई लोकलसाठी स्वतंत्र कंपनी हवी, जागतिक बँकेची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:50 IST

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रवासी रेल्वे कंपनी स्थापन करण्यात यावी, अशी सूचना जागतिक बँकेने केली आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या काही प्रकल्पांना जागतिक बँकेकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे बँकेने ही सूचना केली आहे.

नवी दिल्ली/मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रवासी रेल्वे कंपनी स्थापन करण्यात यावी, अशी सूचना जागतिक बँकेने केली आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या काही प्रकल्पांना जागतिक बँकेकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे बँकेने ही सूचना केली आहे.जागतिक बँकेचे भारताचे संचालक जुनैद अहमद यांनी येथे एका कार्यक्रमात सांगितले की, मुंबईला अत्यंत कार्यक्षम, टिकाऊ आणि भारताच्या पहिल्या उपनगरी रेल्वे कंपनीची गरज आहे. सध्या उपनगरीय रेल्वेसाठी प्रकल्पनिहाय दृष्टिकोन स्वीकारून व्यवस्थापन केले जाते. त्याऐवजी एक मजबूत सार्वजनिक संस्था निर्माण करण्याची गरज आहे.अहमद यांनी सांगितले की, प्रस्तावित कंपनी सरकारी मालकीची असू शकते, अशा कंपनीचे अनेक फायदे होतील. ही कंपनी अत्यंत कार्यक्षम असेल. बाजारातील संकेतांना ती चटकन प्रतिसाद देईल. ती बाजारातून भांडवल उभी करू शकेल आणि आपल्या कामगारांनाही समभाग देईल, अशी कंपनी स्थापन न झाल्यास बदलत्या तंत्रज्ञानाला प्रतिसाद देणे कठीण होऊन जाईल. हे तंत्रज्ञान संस्थेला हुलकावणी देत राहील. अहमद यांनी सांगितले की, अन्य सार्वजनिक आणि प्रवासी सेवांबाबतही हाच दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. केवळ प्रकल्प उभे करण्याऐवजी मजबूत संस्था उभ्या करण्यासाठी हालचाली करणे आवश्यक आहे. चांगल्या गुंतवणूक संधी निर्माण करणाऱ्या व्यवस्थेकडून बँक विनियोजनक्षम संस्था निर्माण करणे हे आगामी काळातील आव्हान राहणार आहे. कार्यक्षम संस्था निर्माण करणे येत्या काळात महत्त्वाचे ठरेल.६0 लाख प्रवासीमुंबई उपनगरीय रेल्वेने दररोज ६ दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. शहरात एकूण चार मार्गांवरून गाड्या धावतात. या सेवेचे व्यवस्थापन मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयामार्फत केले जाते. रेल्वेला मिळणाºया एकूण महसुलात उपनगरीय रेल्वेच्या महसुलाचा मोठा वाटा आहे. जागतिक बँक २00२ पासून मुंबईतील रेल्वे व्यवस्थेशी संबंधित आहे. दोन प्रकल्पांमार्फत प्रशस्त आणि अत्यंत कमी ऊर्जेवर चालणाºया दोन रेल्वे रेक्स प्रकल्पांना जागतिक बँकेने अर्थसाह्य केले आहे.लोकलमुळे ४ हजार कोटींचा तोटामुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेमुळे (लोकल) गेल्या तीन वर्षांत रेल्वे विभागास ४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला असल्याची माहिती सरकारने संसदेत दिली आहे. रेल्वे राज्यमंत्री राएन गोहेन यांनी लोकसभेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, २0१४-१७ या काळात उपनगरीय सेवेमुळे रेल्वेला ४,२७९ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलIndian Railwayभारतीय रेल्वे