शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुंबई लोकलसाठी स्वतंत्र कंपनी हवी, जागतिक बँकेची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:50 IST

मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रवासी रेल्वे कंपनी स्थापन करण्यात यावी, अशी सूचना जागतिक बँकेने केली आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या काही प्रकल्पांना जागतिक बँकेकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे बँकेने ही सूचना केली आहे.

नवी दिल्ली/मुंबई : मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रवासी रेल्वे कंपनी स्थापन करण्यात यावी, अशी सूचना जागतिक बँकेने केली आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या काही प्रकल्पांना जागतिक बँकेकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे बँकेने ही सूचना केली आहे.जागतिक बँकेचे भारताचे संचालक जुनैद अहमद यांनी येथे एका कार्यक्रमात सांगितले की, मुंबईला अत्यंत कार्यक्षम, टिकाऊ आणि भारताच्या पहिल्या उपनगरी रेल्वे कंपनीची गरज आहे. सध्या उपनगरीय रेल्वेसाठी प्रकल्पनिहाय दृष्टिकोन स्वीकारून व्यवस्थापन केले जाते. त्याऐवजी एक मजबूत सार्वजनिक संस्था निर्माण करण्याची गरज आहे.अहमद यांनी सांगितले की, प्रस्तावित कंपनी सरकारी मालकीची असू शकते, अशा कंपनीचे अनेक फायदे होतील. ही कंपनी अत्यंत कार्यक्षम असेल. बाजारातील संकेतांना ती चटकन प्रतिसाद देईल. ती बाजारातून भांडवल उभी करू शकेल आणि आपल्या कामगारांनाही समभाग देईल, अशी कंपनी स्थापन न झाल्यास बदलत्या तंत्रज्ञानाला प्रतिसाद देणे कठीण होऊन जाईल. हे तंत्रज्ञान संस्थेला हुलकावणी देत राहील. अहमद यांनी सांगितले की, अन्य सार्वजनिक आणि प्रवासी सेवांबाबतही हाच दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. केवळ प्रकल्प उभे करण्याऐवजी मजबूत संस्था उभ्या करण्यासाठी हालचाली करणे आवश्यक आहे. चांगल्या गुंतवणूक संधी निर्माण करणाऱ्या व्यवस्थेकडून बँक विनियोजनक्षम संस्था निर्माण करणे हे आगामी काळातील आव्हान राहणार आहे. कार्यक्षम संस्था निर्माण करणे येत्या काळात महत्त्वाचे ठरेल.६0 लाख प्रवासीमुंबई उपनगरीय रेल्वेने दररोज ६ दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. शहरात एकूण चार मार्गांवरून गाड्या धावतात. या सेवेचे व्यवस्थापन मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयामार्फत केले जाते. रेल्वेला मिळणाºया एकूण महसुलात उपनगरीय रेल्वेच्या महसुलाचा मोठा वाटा आहे. जागतिक बँक २00२ पासून मुंबईतील रेल्वे व्यवस्थेशी संबंधित आहे. दोन प्रकल्पांमार्फत प्रशस्त आणि अत्यंत कमी ऊर्जेवर चालणाºया दोन रेल्वे रेक्स प्रकल्पांना जागतिक बँकेने अर्थसाह्य केले आहे.लोकलमुळे ४ हजार कोटींचा तोटामुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेमुळे (लोकल) गेल्या तीन वर्षांत रेल्वे विभागास ४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला असल्याची माहिती सरकारने संसदेत दिली आहे. रेल्वे राज्यमंत्री राएन गोहेन यांनी लोकसभेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, २0१४-१७ या काळात उपनगरीय सेवेमुळे रेल्वेला ४,२७९ कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकलIndian Railwayभारतीय रेल्वे