शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बॅड लोन्सच्या मुक्तीसाठी साडेसहा लाख कोटी गरज

By admin | Updated: March 31, 2017 00:36 IST

भारतीय बँकांचे १४ लाख कोटी रुपये तणावपूर्ण मालमत्तेच्या (विविध कारणांनी थकलेली कर्जे) स्वरूपात अडकून पडले

नवी दिल्ली : भारतीय बँकांचे १४ लाख कोटी रुपये तणावपूर्ण मालमत्तेच्या (विविध कारणांनी थकलेली कर्जे) स्वरूपात अडकून पडले असून या बॅड लोन्समधून मुक्त होण्यासाठी बँकांना किमान ६,५0,000 कोटी रुपयांची गरज आहे, असे प्रतिपादन कोटक महिंद्रा बँकेचे कार्यकारी व्हाइस चेअरमन तथा कार्यकारी संचालक उदय कोटक यांनी केले आहे.उदय कोटक यांनी सांगितले की, आमच्या अंतर्गत संशोधनानुसार, भारतीय बँकांतील एकूण तणावपूर्ण मालमत्ता १४ लाख कोटींची आहे. त्यात अनुत्पादक मालमत्ता (एनपीए), पुनर्रचित मालमत्ता, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या, धोरणात्मक कर्ज पुनर्रचना (एसडीआर), ५:२५ योजना आणि औद्योगिक कर्ज पुनर्रचना (सीडीआर) यांचा समावेश आहे. यातील ३0 टक्के मालमत्ता बुडीत गृहीत धराव्या लागतील. याचाच अर्थ ४ लाख कोटी रुपयांची नेट तूट बँकांना भरून काढावी लागेल. ही ४ लाख कोटी रुपयाची रक्कम बँकिंग व्यवस्थेतील एकूण भांडवलाच्या अर्धी आहे. उरलेल्या १0 लाख कोटींच्या भांडवलाचा मुद्दा सोडविण्यासाठी आणखी २.५ लाख कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. अशा प्रकारे या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी बँकांना साडेसहा लाख कोटी रुपयांची गरज लागेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)बॅड बँकांची गरजतणावपूर्ण १४ लाख कोटी रुपयांपैकी १0 लाख कोटी रुपये बॅड बँकेकडे हस्तांतरित करता येऊ शकतात. त्यासाठी आपल्याला दोन ते तीन मोठ्या बॅड बँकां स्थापन करण्याची गरज आहे, असे मला वाटते. बॅड बँकांच्या स्थापनेवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. बॅड बँका सामान्य बँकांची तणावपूर्ण कर्जे विकत घेतील. तसेच त्यांच्या वसुलीची प्रक्रिया राबवतील. चांगल्या प्रकारे भांडवल असलेल्या बॅड बँका असायला हव्यात. त्यातील मोठा हिस्सा खासगी क्षेत्रातून आलेला असावा.