शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
4
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
5
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
6
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
7
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
8
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
9
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
10
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
11
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
12
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
13
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
14
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
15
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?
16
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
17
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
18
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
19
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
20
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा

बॅड लोन्सच्या मुक्तीसाठी साडेसहा लाख कोटी गरज

By admin | Updated: March 31, 2017 00:36 IST

भारतीय बँकांचे १४ लाख कोटी रुपये तणावपूर्ण मालमत्तेच्या (विविध कारणांनी थकलेली कर्जे) स्वरूपात अडकून पडले

नवी दिल्ली : भारतीय बँकांचे १४ लाख कोटी रुपये तणावपूर्ण मालमत्तेच्या (विविध कारणांनी थकलेली कर्जे) स्वरूपात अडकून पडले असून या बॅड लोन्समधून मुक्त होण्यासाठी बँकांना किमान ६,५0,000 कोटी रुपयांची गरज आहे, असे प्रतिपादन कोटक महिंद्रा बँकेचे कार्यकारी व्हाइस चेअरमन तथा कार्यकारी संचालक उदय कोटक यांनी केले आहे.उदय कोटक यांनी सांगितले की, आमच्या अंतर्गत संशोधनानुसार, भारतीय बँकांतील एकूण तणावपूर्ण मालमत्ता १४ लाख कोटींची आहे. त्यात अनुत्पादक मालमत्ता (एनपीए), पुनर्रचित मालमत्ता, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या, धोरणात्मक कर्ज पुनर्रचना (एसडीआर), ५:२५ योजना आणि औद्योगिक कर्ज पुनर्रचना (सीडीआर) यांचा समावेश आहे. यातील ३0 टक्के मालमत्ता बुडीत गृहीत धराव्या लागतील. याचाच अर्थ ४ लाख कोटी रुपयांची नेट तूट बँकांना भरून काढावी लागेल. ही ४ लाख कोटी रुपयाची रक्कम बँकिंग व्यवस्थेतील एकूण भांडवलाच्या अर्धी आहे. उरलेल्या १0 लाख कोटींच्या भांडवलाचा मुद्दा सोडविण्यासाठी आणखी २.५ लाख कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. अशा प्रकारे या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी बँकांना साडेसहा लाख कोटी रुपयांची गरज लागेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)बॅड बँकांची गरजतणावपूर्ण १४ लाख कोटी रुपयांपैकी १0 लाख कोटी रुपये बॅड बँकेकडे हस्तांतरित करता येऊ शकतात. त्यासाठी आपल्याला दोन ते तीन मोठ्या बॅड बँकां स्थापन करण्याची गरज आहे, असे मला वाटते. बॅड बँकांच्या स्थापनेवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. बॅड बँका सामान्य बँकांची तणावपूर्ण कर्जे विकत घेतील. तसेच त्यांच्या वसुलीची प्रक्रिया राबवतील. चांगल्या प्रकारे भांडवल असलेल्या बॅड बँका असायला हव्यात. त्यातील मोठा हिस्सा खासगी क्षेत्रातून आलेला असावा.