शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

बॅड लोन्सच्या मुक्तीसाठी साडेसहा लाख कोटी गरज

By admin | Updated: March 31, 2017 00:36 IST

भारतीय बँकांचे १४ लाख कोटी रुपये तणावपूर्ण मालमत्तेच्या (विविध कारणांनी थकलेली कर्जे) स्वरूपात अडकून पडले

नवी दिल्ली : भारतीय बँकांचे १४ लाख कोटी रुपये तणावपूर्ण मालमत्तेच्या (विविध कारणांनी थकलेली कर्जे) स्वरूपात अडकून पडले असून या बॅड लोन्समधून मुक्त होण्यासाठी बँकांना किमान ६,५0,000 कोटी रुपयांची गरज आहे, असे प्रतिपादन कोटक महिंद्रा बँकेचे कार्यकारी व्हाइस चेअरमन तथा कार्यकारी संचालक उदय कोटक यांनी केले आहे.उदय कोटक यांनी सांगितले की, आमच्या अंतर्गत संशोधनानुसार, भारतीय बँकांतील एकूण तणावपूर्ण मालमत्ता १४ लाख कोटींची आहे. त्यात अनुत्पादक मालमत्ता (एनपीए), पुनर्रचित मालमत्ता, मालमत्ता पुनर्रचना कंपन्या, धोरणात्मक कर्ज पुनर्रचना (एसडीआर), ५:२५ योजना आणि औद्योगिक कर्ज पुनर्रचना (सीडीआर) यांचा समावेश आहे. यातील ३0 टक्के मालमत्ता बुडीत गृहीत धराव्या लागतील. याचाच अर्थ ४ लाख कोटी रुपयांची नेट तूट बँकांना भरून काढावी लागेल. ही ४ लाख कोटी रुपयाची रक्कम बँकिंग व्यवस्थेतील एकूण भांडवलाच्या अर्धी आहे. उरलेल्या १0 लाख कोटींच्या भांडवलाचा मुद्दा सोडविण्यासाठी आणखी २.५ लाख कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. अशा प्रकारे या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी बँकांना साडेसहा लाख कोटी रुपयांची गरज लागेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)बॅड बँकांची गरजतणावपूर्ण १४ लाख कोटी रुपयांपैकी १0 लाख कोटी रुपये बॅड बँकेकडे हस्तांतरित करता येऊ शकतात. त्यासाठी आपल्याला दोन ते तीन मोठ्या बॅड बँकां स्थापन करण्याची गरज आहे, असे मला वाटते. बॅड बँकांच्या स्थापनेवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. बॅड बँका सामान्य बँकांची तणावपूर्ण कर्जे विकत घेतील. तसेच त्यांच्या वसुलीची प्रक्रिया राबवतील. चांगल्या प्रकारे भांडवल असलेल्या बॅड बँका असायला हव्यात. त्यातील मोठा हिस्सा खासगी क्षेत्रातून आलेला असावा.