शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

धर्मनिरपेक्षतेची संदिग्धता दूर होण्याची गरज

By admin | Updated: August 22, 2016 05:10 IST

धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमके काय तसेच त्याच्या व्यवहार्य तेविषयी अजूनही संदिग्धता आहे

नवी दिल्ली : धर्म निरपेक्षता हा भारतीय राज्यघटनेचा गाभा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नि:संदिग्धपणे जाहीर केले असले तरी धर्मनिरपेक्षता म्हणजे नेमके काय तसेच त्याच्या व्यवहार्य तेविषयी अजूनही संदिग्धता आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती डॉ. हामिद अन्सारी यांनी केले.माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी लिहिलेल्या व रुपा पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या ‘सेक्युलॅरिझम: इंडिया अ‍ॅट ए क्रॉसरोड’ या पुस्तकाचे शुक्रवारी अनावरण करताना अन्सारी बोलात होते. भारतीय समाज आणि त्याचे सामाजिक व्यवहार खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष होण्यासाठी ही संदिग्धता दूर होण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.उपराष्ट्रपती म्हणाले की, धर्मनिरपेक्षतेविषयी संदिग्धता कायम राहण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे, सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी या शब्दाला आपल्या सोयीनुसार दिलेला रंग. दुसरे, खोलवर पाळेमुळे रुजलेल्या धार्मिक गटांमुळे धर्मनिरपेक्षतेच्या व्यवहार्यतेविषयी समाजात असलेली साशंकता.पुस्तकातील मताशी सहमती दर्शवत उपराष्ट्रपती म्हणाले की, जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून धर्मनिरपेक्षता समाजाच्या अंगी बाणविण्याची इच्छा केंद्र व राज्य सरकारे तसेच राजकीय पक्षांमध्ये दिसून येत नाही. यासाठी अजूनही खूप काही करणे गरजेचे आहे, असे सांगून ते म्हणाले की, राजकीय, सामाजिक आणि बौध्दिक पातळीवर याच्याशी पक्की बांधिलकी स्वीकारली गेली तरच हे साध्य होऊ शकेल. पण तसे होताना अजून तरी दिसत नाही.गोडबोले यांचे हे पुस्तक म्हणजे धर्मनिरपेक्षता याविषयावरील ज्ञानभांडार आहे व ते प्रासंगिक व समाजोपयोगी आहे, असे कौतुकही अन्सारी यांनी केले. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार व माजी खासदार एच. के. दुआ म्हणाले की, सध्या देश एका कठीण कालखंडातून जात आहे व विविध पातळीवर संस्कती थोपविली जात आहे. बहुमताच्या नावाखाली सुमार लोकांना पुढे आणले जात आहे व अल्पसंख्य समाज मुख्य प्रवाहापासून दुरावत चालला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. धर्मनिरपेक्षतेसाठी एक घटनात्मक आयोग नेमावा व धर्म व राजकारणाची फारकत करावी यासह या पुस्तकात केलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार होऊन त्यातून धर्म निरपेक्षतेवर एका नव्या पातळीवर विचारमंथन सुरु होईल, अशी आशा लेखक गोडबोले यांनी व्यक्त केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)>एखादे राष्ट्र धर्म निरपेक्ष होण्यासाठी त्याची राज्यघटना निधर्मी असणे व त्याच्या सरकारने सर्व धर्मांना समान वागणूक देऊन पुरेसे नाही. त्यासाठी समाज आणि व्यक्तीही धर्मनिरपेक्ष असायला हव्यात.- माधव गोडबोले, माजी केंद्रीय गृहसचिव (नव्या पुस्तकातून)