शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

कर प्रणालीवर पुनर्विचाराची गरज

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

हायकोर्टाचे मत : प्रामाणिक नागरिकांनी घेतलाय धसका

हायकोर्टाचे मत : प्रामाणिक नागरिकांनी घेतलाय धसका

नागपूर : विविध प्रकारच्या करांचा प्रामाणिक नागरिकांनी धसका घेतलाय असे निरीक्षण नोंदवून वर्तमानातील एकूणच कर प्रणालीचा पुनर्विचार होण्याची गरज असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले आहे.
नागरिक, व्यावसायिक व उत्पादकांची विविध प्रकारच्या करांचा दर कमी करण्याची मागणी आहे. कर कमी होण्याची ते आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. वर्तमान दरानुसार विविध प्रकारचे कर भरल्यानंतर व्यावसायिकांसाठी फार कमी नफा शिल्लक राहतो. व्यवसायात सतत चढ-उतार सुरू असतो पण, त्यानुसार कराचे दर कधीच कमी होत नाहीत. करदात्यांमध्ये विश्वास निर्माण करण्याऐवजी जाचक व्याजदराची व खटला दाखल करण्याची भीती दाखविली जाते. थकित कराच्या रकमेवर दंडाच्या स्वरूपात आकारण्यात येणारे १५ टक्के वार्षिक व्याज बाजारदरापेक्षा अधिक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
कर थकित ठेवल्यामुळे दाखल एफआयआर रद्द करण्यासाठी एका कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी फौजदारी अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी हा अर्ज मंजूर करताना वरीलप्रमाणे निरीक्षण नोंदविले आहे. अर्जदारांनी ७ कोटी ४५ लाख ४५ हजार २६ रुपयांचा थकित व्हॅट व त्यावर १५ टक्के वार्षिक व्याजदराने ९७ लाख ९२ हजार ४७३ रुपये दंड शासनाकडे जमा केला आहे. २४ जुलै २०१३ रोजीच्या व्यापार परिपत्रकातील २ (बी) तरतुदीनुसार व्यावसायिकाला निर्धारित वेळेत कर न भरल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यास थकित रक्कम व विलंब शुल्क भरल्यावर तडजोड केली जाऊ शकते तर, २(सी) तरतुदीनुसार जेएमएफसी न्यायालयात तक्रार दाखल झाल्यानंतर तडजोडीसाठी जेएमएफसी न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे. न्यायालयाने अर्जदारांना दिलासा देताना ही बाब विचारात घेतली. अर्जदारांनी भविष्यात कर भरण्यात हयगय करणार नाही अशी ग्वाही न्यायालयाला दिली आहे. अर्जदारांविरुद्ध २३ ऑक्टोबर २०१३ रोजी भादंविच्या कलम ४०६, ४०९ व महाराष्ट्र मूल्यवर्धित कर कायद्याच्या कलम ७४ (२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.