शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

आरक्षणाबाबत पुनर्विचार करण्याची गरज - मोहन भागवत

By admin | Updated: September 21, 2015 12:07 IST

पटेल समुदायाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हार्दिक पटेलने असतानाच आरक्षण धोरणाचा आढावा घेऊन त्याबाबत पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - पटेल समुदायाला आरक्षण देण्याची मागणी करत हार्दिक पटेलने संपूर्ण गुजरात ढवळून काढला असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षण धोरणाचा आढावा घेऊन त्याबाबत पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. संघाचे मुखपत्र असलेल्या 'ऑर्गनायझर' ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांनी हा विचार मांडला आहे.
 
एक बिगरराजकीय समिती तयार करून आरक्षणाच्या मुद्याचा आढावा घेण्याची गरज आहे. कोणाला किती व कधीपर्यंत आरक्षण दिले जावे याचा विचार या समितीतील तज्ञ करतील. मात्र या समितीत राजकीय नेत्यांऐवजी सामाजिक सेवा करणा-या व्यक्तींना प्राधान्य दिले जावे, असे मतही त्यांनी मांडले. राजकीय फायद्यासाठी आरक्षणाचा वापर करण्यात येत असल्याने त्याचा पुनर्विचार होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. लोकशाहीत आपल्या हितासाठी काही समूह एकत्र येतात, पण आपल्या महत्वकांक्षेपायी अन्य वर्गांच्या हितांच नुकसान होणार नाही, याची काळजी आपण घ्यायला हवी असे मत त्यांनी मांडले.
सामाजिकदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या वर्गाला आरक्षण दिले पाहिजे असे संविधानात नमूद केले आहे. मात्र आज आरक्षणाचा राजकारणासाठी वापर होतो. जर संविधानानुसार सर्व घडले असते तर आज हे प्रश्न निर्माणच झाले नसते असेही भागवत म्हणाले. या मुद्यावर सतत आंदोलनं होू नयेत यासाठी सरकारनेही संवेदनशील भूमिका ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले.