शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

बिहारच्या पुरात एनडीआरफ जवानांनी वाचवले 102 गर्भवती महिलांचे प्राण, तीन महिलांची बोटीतच प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 10:35 IST

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बिहारच्या पुरातून सुटका करत 102 गर्भवती महिलांचे प्राण वाचवले आहेत. विशेष म्हणजे तीन गर्भवती महिलांनी बोटीतच बाळाला जन्म दिला आहे.

ठळक मुद्देएनडीआरएफ जवानांनी बिहारच्या पुरातून सुटका करत 102 गर्भवती महिलांचे प्राण वाचवले आहेतविशेष म्हणजे तीन गर्भवती महिलांनी बोटीतच बाळाला जन्म दिला आहे 'एका बाळाचा जन्म 16 ऑगस्ट रोजी मधुबनी येथे, दुस-याचा 18 ऑगस्ट रोजी गोपालगंज येथे आणि तिस-याचा 23 ऑगस्ट रोजी मोतिहारी येथे झाला'एनडीआरएफच्या एकूण 28 टीम असून, त्यांनी आतापर्यंत 48 हजार 486 जणांची सुटका केली आहे. तसंच 29 जनावरांना सुरक्षितस्थळी पोहोचवलं आहे

पाटणा, दि. 9 - राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बिहारच्या पुरातून सुटका करत 102 गर्भवती महिलांचे प्राण वाचवले आहेत. विशेष म्हणजे तीन गर्भवती महिलांनी बोटीतच बाळाला जन्म दिला आहे. एनडीआरएफच्या नवव्या बटालिययने दिलेल्या माहितीनुसार, 'त्या तीन महिलांची डिलिव्हरी व्यवस्थित व्हावी यासाठी एनडीआरएफच्या जवानांनी मदत केली'.

एनडीआरएफ अधिकारी विजय सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एका बाळाचा जन्म 16 ऑगस्ट रोजी मधुबनी येथे, दुस-याचा 18 ऑगस्ट रोजी गोपालगंज येथे आणि तिस-याचा 23 ऑगस्ट रोजी मोतिहारी येथे झाला'.

एनडीआरएफ टीमने आतापर्यंत 102 गर्भवती महिलांची पुरातून सुटका केली असून, त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. एनडीआरएफच्या एकूण 28 टीम असून, त्यांनी आतापर्यंत 48 हजार 486 जणांची सुटका केली आहे. तसंच 29 जनावरांना सुरक्षितस्थळी पोहोचवलं आहे. एनडीआरएफचं वैद्यकीय पथकदेखील पुरग्रस्त भागात जाऊन गरजूंची मदत करत आहे. यासाठी रिव्हर अॅम्ब्युलन्सची मदत घेतली जात आहे. 

बिहारमधील महानंदा, कंकई आदी नद्यांना पूर आला असून चार जिल्ह्यात पूरस्थिती आहे. राज्यातील २० लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. नेपाळ आणि सिमावर्ती भागातील पावसामुळे बिहारमधील नद्यांना पूर आला आहे. राष्ट्रीय आपत्कालिन विभागाच्या दहा तुकड्या देण्याची मागणी नितीशकुमार यांनी केली होती. याशिवाय हवाई दलाचे हेलिकॉप्टर मदतीसाठी देण्याची मागणी करण्यात आली होती. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन केंद्राकडून सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन होते. बिहारला 500 कोटींची मदत देण्याचं आश्वासन मोदींनी दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारातील पूरस्थितीची हवाई पाहणी केली, तसेच पूरग्रस्त भागाला ५00 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. पुरात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांसाठी २ लाख रुपयांचे, तर गंभीर जखमींना ५0 हजारांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक बिहारला पाठविण्यात येईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेतकºयांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी विमा कंपन्यांनी लवकरात लवकर प्रतिनिधी पाठवून नुकसानीचा आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मोदी यांनी बिहारातील चार जिल्ह्यांतील पूरस्थितीची हवाई पाहणी केली. त्यात पुर्णिया, कटिहार, किशनगंज, अरारिया यांचा समावेश होता. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हेही त्यांच्यासोबत होते.

पंतप्रधानांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, बिहारातील १९ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. त्यातील १३ जिल्ह्यांत नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. राज्याच्या जलस्रोत विभागाला सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे. नद्यांच्या काठांवर उभारण्यात आलेले कोट आणि सिंचन कालवे वाहून गेले आहेत. त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी २,७00 कोटी रुपये लागतील. पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. आतापर्यंत २ हजार कोटी रुपयांचे मदत साहित्य पूरग्रस्तांना वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली होती.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिला