शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

बिहारच्या पुरात एनडीआरफ जवानांनी वाचवले 102 गर्भवती महिलांचे प्राण, तीन महिलांची बोटीतच प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 10:35 IST

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बिहारच्या पुरातून सुटका करत 102 गर्भवती महिलांचे प्राण वाचवले आहेत. विशेष म्हणजे तीन गर्भवती महिलांनी बोटीतच बाळाला जन्म दिला आहे.

ठळक मुद्देएनडीआरएफ जवानांनी बिहारच्या पुरातून सुटका करत 102 गर्भवती महिलांचे प्राण वाचवले आहेतविशेष म्हणजे तीन गर्भवती महिलांनी बोटीतच बाळाला जन्म दिला आहे 'एका बाळाचा जन्म 16 ऑगस्ट रोजी मधुबनी येथे, दुस-याचा 18 ऑगस्ट रोजी गोपालगंज येथे आणि तिस-याचा 23 ऑगस्ट रोजी मोतिहारी येथे झाला'एनडीआरएफच्या एकूण 28 टीम असून, त्यांनी आतापर्यंत 48 हजार 486 जणांची सुटका केली आहे. तसंच 29 जनावरांना सुरक्षितस्थळी पोहोचवलं आहे

पाटणा, दि. 9 - राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बिहारच्या पुरातून सुटका करत 102 गर्भवती महिलांचे प्राण वाचवले आहेत. विशेष म्हणजे तीन गर्भवती महिलांनी बोटीतच बाळाला जन्म दिला आहे. एनडीआरएफच्या नवव्या बटालिययने दिलेल्या माहितीनुसार, 'त्या तीन महिलांची डिलिव्हरी व्यवस्थित व्हावी यासाठी एनडीआरएफच्या जवानांनी मदत केली'.

एनडीआरएफ अधिकारी विजय सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एका बाळाचा जन्म 16 ऑगस्ट रोजी मधुबनी येथे, दुस-याचा 18 ऑगस्ट रोजी गोपालगंज येथे आणि तिस-याचा 23 ऑगस्ट रोजी मोतिहारी येथे झाला'.

एनडीआरएफ टीमने आतापर्यंत 102 गर्भवती महिलांची पुरातून सुटका केली असून, त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. एनडीआरएफच्या एकूण 28 टीम असून, त्यांनी आतापर्यंत 48 हजार 486 जणांची सुटका केली आहे. तसंच 29 जनावरांना सुरक्षितस्थळी पोहोचवलं आहे. एनडीआरएफचं वैद्यकीय पथकदेखील पुरग्रस्त भागात जाऊन गरजूंची मदत करत आहे. यासाठी रिव्हर अॅम्ब्युलन्सची मदत घेतली जात आहे. 

बिहारमधील महानंदा, कंकई आदी नद्यांना पूर आला असून चार जिल्ह्यात पूरस्थिती आहे. राज्यातील २० लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. नेपाळ आणि सिमावर्ती भागातील पावसामुळे बिहारमधील नद्यांना पूर आला आहे. राष्ट्रीय आपत्कालिन विभागाच्या दहा तुकड्या देण्याची मागणी नितीशकुमार यांनी केली होती. याशिवाय हवाई दलाचे हेलिकॉप्टर मदतीसाठी देण्याची मागणी करण्यात आली होती. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन केंद्राकडून सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन होते. बिहारला 500 कोटींची मदत देण्याचं आश्वासन मोदींनी दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारातील पूरस्थितीची हवाई पाहणी केली, तसेच पूरग्रस्त भागाला ५00 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. पुरात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांसाठी २ लाख रुपयांचे, तर गंभीर जखमींना ५0 हजारांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक बिहारला पाठविण्यात येईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेतकºयांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी विमा कंपन्यांनी लवकरात लवकर प्रतिनिधी पाठवून नुकसानीचा आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मोदी यांनी बिहारातील चार जिल्ह्यांतील पूरस्थितीची हवाई पाहणी केली. त्यात पुर्णिया, कटिहार, किशनगंज, अरारिया यांचा समावेश होता. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हेही त्यांच्यासोबत होते.

पंतप्रधानांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, बिहारातील १९ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. त्यातील १३ जिल्ह्यांत नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. राज्याच्या जलस्रोत विभागाला सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे. नद्यांच्या काठांवर उभारण्यात आलेले कोट आणि सिंचन कालवे वाहून गेले आहेत. त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी २,७00 कोटी रुपये लागतील. पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. आतापर्यंत २ हजार कोटी रुपयांचे मदत साहित्य पूरग्रस्तांना वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली होती.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिला