शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बिहारच्या पुरात एनडीआरफ जवानांनी वाचवले 102 गर्भवती महिलांचे प्राण, तीन महिलांची बोटीतच प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 10:35 IST

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बिहारच्या पुरातून सुटका करत 102 गर्भवती महिलांचे प्राण वाचवले आहेत. विशेष म्हणजे तीन गर्भवती महिलांनी बोटीतच बाळाला जन्म दिला आहे.

ठळक मुद्देएनडीआरएफ जवानांनी बिहारच्या पुरातून सुटका करत 102 गर्भवती महिलांचे प्राण वाचवले आहेतविशेष म्हणजे तीन गर्भवती महिलांनी बोटीतच बाळाला जन्म दिला आहे 'एका बाळाचा जन्म 16 ऑगस्ट रोजी मधुबनी येथे, दुस-याचा 18 ऑगस्ट रोजी गोपालगंज येथे आणि तिस-याचा 23 ऑगस्ट रोजी मोतिहारी येथे झाला'एनडीआरएफच्या एकूण 28 टीम असून, त्यांनी आतापर्यंत 48 हजार 486 जणांची सुटका केली आहे. तसंच 29 जनावरांना सुरक्षितस्थळी पोहोचवलं आहे

पाटणा, दि. 9 - राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बिहारच्या पुरातून सुटका करत 102 गर्भवती महिलांचे प्राण वाचवले आहेत. विशेष म्हणजे तीन गर्भवती महिलांनी बोटीतच बाळाला जन्म दिला आहे. एनडीआरएफच्या नवव्या बटालिययने दिलेल्या माहितीनुसार, 'त्या तीन महिलांची डिलिव्हरी व्यवस्थित व्हावी यासाठी एनडीआरएफच्या जवानांनी मदत केली'.

एनडीआरएफ अधिकारी विजय सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एका बाळाचा जन्म 16 ऑगस्ट रोजी मधुबनी येथे, दुस-याचा 18 ऑगस्ट रोजी गोपालगंज येथे आणि तिस-याचा 23 ऑगस्ट रोजी मोतिहारी येथे झाला'.

एनडीआरएफ टीमने आतापर्यंत 102 गर्भवती महिलांची पुरातून सुटका केली असून, त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. एनडीआरएफच्या एकूण 28 टीम असून, त्यांनी आतापर्यंत 48 हजार 486 जणांची सुटका केली आहे. तसंच 29 जनावरांना सुरक्षितस्थळी पोहोचवलं आहे. एनडीआरएफचं वैद्यकीय पथकदेखील पुरग्रस्त भागात जाऊन गरजूंची मदत करत आहे. यासाठी रिव्हर अॅम्ब्युलन्सची मदत घेतली जात आहे. 

बिहारमधील महानंदा, कंकई आदी नद्यांना पूर आला असून चार जिल्ह्यात पूरस्थिती आहे. राज्यातील २० लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. नेपाळ आणि सिमावर्ती भागातील पावसामुळे बिहारमधील नद्यांना पूर आला आहे. राष्ट्रीय आपत्कालिन विभागाच्या दहा तुकड्या देण्याची मागणी नितीशकुमार यांनी केली होती. याशिवाय हवाई दलाचे हेलिकॉप्टर मदतीसाठी देण्याची मागणी करण्यात आली होती. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन केंद्राकडून सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन होते. बिहारला 500 कोटींची मदत देण्याचं आश्वासन मोदींनी दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारातील पूरस्थितीची हवाई पाहणी केली, तसेच पूरग्रस्त भागाला ५00 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. पुरात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांसाठी २ लाख रुपयांचे, तर गंभीर जखमींना ५0 हजारांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक बिहारला पाठविण्यात येईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेतकºयांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी विमा कंपन्यांनी लवकरात लवकर प्रतिनिधी पाठवून नुकसानीचा आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मोदी यांनी बिहारातील चार जिल्ह्यांतील पूरस्थितीची हवाई पाहणी केली. त्यात पुर्णिया, कटिहार, किशनगंज, अरारिया यांचा समावेश होता. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हेही त्यांच्यासोबत होते.

पंतप्रधानांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, बिहारातील १९ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. त्यातील १३ जिल्ह्यांत नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. राज्याच्या जलस्रोत विभागाला सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे. नद्यांच्या काठांवर उभारण्यात आलेले कोट आणि सिंचन कालवे वाहून गेले आहेत. त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी २,७00 कोटी रुपये लागतील. पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. आतापर्यंत २ हजार कोटी रुपयांचे मदत साहित्य पूरग्रस्तांना वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली होती.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिला