शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बिहारच्या पुरात एनडीआरफ जवानांनी वाचवले 102 गर्भवती महिलांचे प्राण, तीन महिलांची बोटीतच प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 10:35 IST

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बिहारच्या पुरातून सुटका करत 102 गर्भवती महिलांचे प्राण वाचवले आहेत. विशेष म्हणजे तीन गर्भवती महिलांनी बोटीतच बाळाला जन्म दिला आहे.

ठळक मुद्देएनडीआरएफ जवानांनी बिहारच्या पुरातून सुटका करत 102 गर्भवती महिलांचे प्राण वाचवले आहेतविशेष म्हणजे तीन गर्भवती महिलांनी बोटीतच बाळाला जन्म दिला आहे 'एका बाळाचा जन्म 16 ऑगस्ट रोजी मधुबनी येथे, दुस-याचा 18 ऑगस्ट रोजी गोपालगंज येथे आणि तिस-याचा 23 ऑगस्ट रोजी मोतिहारी येथे झाला'एनडीआरएफच्या एकूण 28 टीम असून, त्यांनी आतापर्यंत 48 हजार 486 जणांची सुटका केली आहे. तसंच 29 जनावरांना सुरक्षितस्थळी पोहोचवलं आहे

पाटणा, दि. 9 - राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी बिहारच्या पुरातून सुटका करत 102 गर्भवती महिलांचे प्राण वाचवले आहेत. विशेष म्हणजे तीन गर्भवती महिलांनी बोटीतच बाळाला जन्म दिला आहे. एनडीआरएफच्या नवव्या बटालिययने दिलेल्या माहितीनुसार, 'त्या तीन महिलांची डिलिव्हरी व्यवस्थित व्हावी यासाठी एनडीआरएफच्या जवानांनी मदत केली'.

एनडीआरएफ अधिकारी विजय सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एका बाळाचा जन्म 16 ऑगस्ट रोजी मधुबनी येथे, दुस-याचा 18 ऑगस्ट रोजी गोपालगंज येथे आणि तिस-याचा 23 ऑगस्ट रोजी मोतिहारी येथे झाला'.

एनडीआरएफ टीमने आतापर्यंत 102 गर्भवती महिलांची पुरातून सुटका केली असून, त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. एनडीआरएफच्या एकूण 28 टीम असून, त्यांनी आतापर्यंत 48 हजार 486 जणांची सुटका केली आहे. तसंच 29 जनावरांना सुरक्षितस्थळी पोहोचवलं आहे. एनडीआरएफचं वैद्यकीय पथकदेखील पुरग्रस्त भागात जाऊन गरजूंची मदत करत आहे. यासाठी रिव्हर अॅम्ब्युलन्सची मदत घेतली जात आहे. 

बिहारमधील महानंदा, कंकई आदी नद्यांना पूर आला असून चार जिल्ह्यात पूरस्थिती आहे. राज्यातील २० लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. नेपाळ आणि सिमावर्ती भागातील पावसामुळे बिहारमधील नद्यांना पूर आला आहे. राष्ट्रीय आपत्कालिन विभागाच्या दहा तुकड्या देण्याची मागणी नितीशकुमार यांनी केली होती. याशिवाय हवाई दलाचे हेलिकॉप्टर मदतीसाठी देण्याची मागणी करण्यात आली होती. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन केंद्राकडून सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन होते. बिहारला 500 कोटींची मदत देण्याचं आश्वासन मोदींनी दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारातील पूरस्थितीची हवाई पाहणी केली, तसेच पूरग्रस्त भागाला ५00 कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. पुरात मरण पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांसाठी २ लाख रुपयांचे, तर गंभीर जखमींना ५0 हजारांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक बिहारला पाठविण्यात येईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्याचप्रमाणे शेतकºयांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी विमा कंपन्यांनी लवकरात लवकर प्रतिनिधी पाठवून नुकसानीचा आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मोदी यांनी बिहारातील चार जिल्ह्यांतील पूरस्थितीची हवाई पाहणी केली. त्यात पुर्णिया, कटिहार, किशनगंज, अरारिया यांचा समावेश होता. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी हेही त्यांच्यासोबत होते.

पंतप्रधानांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, बिहारातील १९ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. त्यातील १३ जिल्ह्यांत नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. राज्याच्या जलस्रोत विभागाला सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे. नद्यांच्या काठांवर उभारण्यात आलेले कोट आणि सिंचन कालवे वाहून गेले आहेत. त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी २,७00 कोटी रुपये लागतील. पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र काम करीत आहे. आतापर्यंत २ हजार कोटी रुपयांचे मदत साहित्य पूरग्रस्तांना वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली होती.

टॅग्स :pregnant womanगर्भवती महिला