शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी संबंधित निर्बंध संपणार! केंद्राच्या राज्य सरकारांना नियमांचा पुनर्विचार करण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 15:23 IST

केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोना व्हायरसशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांबाबत आवश्यक सल्ला दिला आहे.

केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोना व्हायरसशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांबाबत आवश्यक सल्ला दिला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोरोना विषाणू (कोविड -19) च्या प्रतिबंधासाठी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वं रद्द करण्याचा विचार राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी करावा, असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. मास्कच्या वापरासह इतर कोविड प्रतिबंधक उपायांवरील सल्ले यापुढे सुरूच राहतील, असंही सांगण्यात आलं आहे. यापूर्वी, सरकारनं परिस्थिती सुधारण्यासाठी आणि साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर NDMA ने निर्णय घेतला की कोविड प्रतिबंधक उपायांसाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी लागू करण्याची आता गरज नाही.

25 फेब्रुवारी 2022 रोजी गृह मंत्रालयाचा सध्याचा आदेश क्रमांक 40-3/2020-DM-1 (A) च्या समाप्तीनंतर, गृह मंत्रालयानं आता नवा कोणताही आदेश जारी करणार नाही असं सांगितलं जात आहे. पण आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (MDHFW) संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सल्ला देत राहील. यामध्ये मास्कचा वापर करणं आणि वारंवार हात स्वच्छ करणं यांचा समावेश असेल. गेल्या 24 महिन्यांत, रोग निदान, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, उपचार आणि लसीकरणासोबतच रुग्णालयातील पायाभूत सुविधा, जागरूकता आणि सामान्य लोकांसाठी सुविधांचा विकास यासारख्या विविध बाबी हाती घेण्यात आल्या आहेत. महामारीच्या व्यवस्थापनासाठी या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत, असं सरकारनं आपल्या अधिकृत आदेशात म्हटलं आहे. 

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी उचललं पाऊलराज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनीही त्यांच्या बाजूनं सर्व पावले उचलली आहेत, असं सरकारच्या वतीनं असे सांगण्यात आलं आहे. यासाठी स्वतःची यंत्रणा राज्यांनी विकसित केली आहे आणि साथीच्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी त्यांच्या विस्तृत योजनांची अंमलबजावणी केली आहे. यासोबतच गेल्या सात आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट होत आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट  0.28 टक्क्यांवर आला आहे.

देशात किती रुग्ण नोंदवले गेले?भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे एकूण 1,778 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 2,542 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 62 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता देशातील एकूण रुग्णांची संख्या 4,30,12,749 वर पोहोचली आहे. तर सक्रिय रुग्ण 23,087 इतके आहेत. एकूण मृत्यू 5,16,605 आणि एकूण लसीकरण 1,81,89,15,234  इतकं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCorona vaccineकोरोनाची लस