शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कोळसा घोटाळा ही निव्वळ कॅगची कल्पना नव्हे नायडू : भाजपच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

नवी दिल्ली : कोळसा खाणपट्ट्यांसाठी धातू आणि सिमेंट कंपन्यांनी लावलेली चढ्या दराची बोली आणि लिलावाची यशस्विता पाहता कोळसा घोटाळा खरा असल्याचे आणि तो निव्वळ कॅगच्या कल्पनेतून समोर आला नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे भाजपच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले असल्याचा दावा संसदीय कामकाज मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केला आहे.

नवी दिल्ली : कोळसा खाणपट्ट्यांसाठी धातू आणि सिमेंट कंपन्यांनी लावलेली चढ्या दराची बोली आणि लिलावाची यशस्विता पाहता कोळसा घोटाळा खरा असल्याचे आणि तो निव्वळ कॅगच्या कल्पनेतून समोर आला नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे भाजपच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले असल्याचा दावा संसदीय कामकाज मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केला आहे.
कोळसा प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी भाजपने जोर लावला होता. कोणतेही नुकसान झाले नसल्याचा तत्कालीन अर्थमंत्र्यांनी केलेला दावा चुकीचा होता, असेही ते म्हणाले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी कोणताही घोटाळा घडला नसल्याचा दावा केला होता.
देशाचे १.८६ लाख कोटी रुपयांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. २० खाणींसाठी योग्य आणि पारदर्शकरीत्या लिलाव करण्याचा मोदी सरकारने घेतलेला निर्णय देशाच्या फायद्याचाच आहे. केवळ चार दिवसांमध्ये बोली ६० हजार कोटींच्या वर गेल्या आहेत. खनिजसंपन्न राज्यांना त्याचा अधिकाधिक लाभ होईल. सध्या १९ खाणपट्ट्यांचा लिलाव होत असून यापैकी १४ खाणपट्टे यापूर्वीच ८० हजार कोटी रुपयांना विकले गेले आहेत, अशी माहितीही नायडू यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
--------------------
१५ लाख कोटी मिळण्याची अपेक्षा
नव्या लिलाव प्रक्रियेतून १५ लाख कोटी रुपये गोळा होण्याची शक्यता आहे, तथापि अनेक बोली विश्लेषकांच्या अपेक्षेपलीकडे गेल्या आहेत. सर्वांत मोठा कोळसा ग्राहक असलेल्या देशांत अमेरिकेला मागे टाकत चीननंतर दुसरे स्थान भारताला मिळण्याची अपेक्षा आहे. मागणीनुसार पुरवठा करण्यात अपयश आल्यामुळे कोल इंडिया लिमिटेडचा कोळसा क्षेत्रातील एकाधिकार मोडीत काढण्यात आला आहे.