शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
2
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
3
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
4
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
5
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
6
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
7
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
8
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
9
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
10
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
11
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
12
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
13
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
14
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
15
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
16
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
17
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
18
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
19
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
20
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

कोळसा घोटाळा ही निव्वळ कॅगची कल्पना नव्हे नायडू : भाजपच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

नवी दिल्ली : कोळसा खाणपट्ट्यांसाठी धातू आणि सिमेंट कंपन्यांनी लावलेली चढ्या दराची बोली आणि लिलावाची यशस्विता पाहता कोळसा घोटाळा खरा असल्याचे आणि तो निव्वळ कॅगच्या कल्पनेतून समोर आला नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे भाजपच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले असल्याचा दावा संसदीय कामकाज मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केला आहे.

नवी दिल्ली : कोळसा खाणपट्ट्यांसाठी धातू आणि सिमेंट कंपन्यांनी लावलेली चढ्या दराची बोली आणि लिलावाची यशस्विता पाहता कोळसा घोटाळा खरा असल्याचे आणि तो निव्वळ कॅगच्या कल्पनेतून समोर आला नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे भाजपच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले असल्याचा दावा संसदीय कामकाज मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केला आहे.
कोळसा प्रकरणाची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी भाजपने जोर लावला होता. कोणतेही नुकसान झाले नसल्याचा तत्कालीन अर्थमंत्र्यांनी केलेला दावा चुकीचा होता, असेही ते म्हणाले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी कोणताही घोटाळा घडला नसल्याचा दावा केला होता.
देशाचे १.८६ लाख कोटी रुपयांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. २० खाणींसाठी योग्य आणि पारदर्शकरीत्या लिलाव करण्याचा मोदी सरकारने घेतलेला निर्णय देशाच्या फायद्याचाच आहे. केवळ चार दिवसांमध्ये बोली ६० हजार कोटींच्या वर गेल्या आहेत. खनिजसंपन्न राज्यांना त्याचा अधिकाधिक लाभ होईल. सध्या १९ खाणपट्ट्यांचा लिलाव होत असून यापैकी १४ खाणपट्टे यापूर्वीच ८० हजार कोटी रुपयांना विकले गेले आहेत, अशी माहितीही नायडू यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
--------------------
१५ लाख कोटी मिळण्याची अपेक्षा
नव्या लिलाव प्रक्रियेतून १५ लाख कोटी रुपये गोळा होण्याची शक्यता आहे, तथापि अनेक बोली विश्लेषकांच्या अपेक्षेपलीकडे गेल्या आहेत. सर्वांत मोठा कोळसा ग्राहक असलेल्या देशांत अमेरिकेला मागे टाकत चीननंतर दुसरे स्थान भारताला मिळण्याची अपेक्षा आहे. मागणीनुसार पुरवठा करण्यात अपयश आल्यामुळे कोल इंडिया लिमिटेडचा कोळसा क्षेत्रातील एकाधिकार मोडीत काढण्यात आला आहे.