शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

धक्कादायक! कोरोना कालावधीत ११,७१५ उद्योजकांच्या आत्महत्या; २०१९ च्या तुलनेत २९ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 13:12 IST

नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाचा जगाला मोठा तडाखा बसला. अद्यापही कोरोनाचे संकट कायम असून, अनेकविध नव्या व्हेरिएंटची भर पडत ...

नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाचा जगाला मोठा तडाखा बसला. अद्यापही कोरोनाचे संकट कायम असून, अनेकविध नव्या व्हेरिएंटची भर पडत चालल्याचे पाहायला मिळत आहे. भारतात तर कोरोना संकटाचा प्रचंड मोठा फटका उद्योग क्षेत्राला बसल्याचे दिसले. हजारो उद्योग कायमचे बंद पडले, तर लाखो लोकांचे रोजगार गेले. यातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. केंद्र सरकारने एनसीआरबीच्या हवाल्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. 

सन २०२० मधील कोरोना संकट काळात कृषी क्षेत्रापेक्षाही उद्योग क्षेत्राला जास्त फटका बसल्याचे केंद्र सरकारच्या आकडेवारीतून समोर आले आहे. कोरोना संकट आणि लॉकडाउन यामुळे उद्योग क्षेत्राला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. सन २०२० मध्ये एकूण ११ हजार ७१६ उद्योजकांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्र सरकारडून संसदेत देण्यात आली. २०१९ च्या तुलनेत म्हणजेच कोरोना संकट येण्यापूर्वीच्या कालावधीची तुलना केल्यास ही आकडेवारी २९ टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे.

११ हजार ७१६ उद्योजकांनी आत्महत्या करत जीवन संपवले

गृह मंत्रालयाने नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (NCRB) डेटाच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, २०१० मध्ये ९ हजार ०५२ उद्योजकांनी आत्महत्या केली. तर २०२० मध्ये ११ हजार ७१६ उद्योजकांनी आत्महत्या केली. उद्योजकांनी केलेल्या आत्महत्येचा आकडा हा शेतकऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे. २०२० मध्ये १० हजार ६६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. उद्योजकांच्या आत्महत्येच्या आकडेवारीत कृषी क्षेत्राशी तुलना करता २९.४ टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. सन २०२० मध्ये आत्महत्या केलेल्या ११ हजार ७१६ उद्योजकांपैकी ४ हजार २२६ दुकानदार, ४ हजार ३५६ व्यापारी आणि ३ हजार १३४ जण इतर व्यवसायात गुंतलेले होते, असेही सांगितले जात आहे.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतातील बँकामधील निष्क्रिय खाती आणि यामधील रकमेसंदर्भात माहिती दिली. देशातील बँकांमधील विविध खात्यांमध्ये २६ हजार कोटी रुपये पडून असून, यापैकी ९ कोटी अशी खाती आहेत, ज्यामध्ये गेल्या १० वर्षांत कोणताही व्यवहार करण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बँकेने एका वर्षांहून अधिक निष्क्रिय किंवा कोणताही व्यवहार झालेल्या खात्यांचे दरवर्षी मूल्यांकन करण्यास सुरुवात केली आहे. तसेच खात्यांच्या निष्क्रियतेबाबत खातेधारकांकडून माहिती मागवण्यासंदर्भात निर्देश दिल्याची माहिती देण्यात आली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार