शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शरद पवारांनी 'त्या' पत्रावर मौन सोडलं, फडणवीसांवर केला पलटवार, पत्रकारावरही भडकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 14:30 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. याच मुद्द्यावर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसरवा शरद पवार यांनी २०१०-११ मध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र वाचून दाखवले. यानंतर आता खुद्द पवारांनीच या पत्राचा खुलासा केला आहे.

नवी दिल्ली - कृषी कायद्यांच्या विरोधात आज देशभरात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. याच मुद्द्यावरून देशातील राजकारणही तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. याच मुद्द्यावर सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसरवा शरद पवार यांनी २०१०-११ मध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र वाचून दाखवले. यानंतर आता खुद्द पवारांनीच या पत्राचा खुलासा केला आहे.

पवार म्हणाले, "विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझे पत्र वाचून दाखवले. मात्र, त्यांनीच ते आधी नीट वाचावे. कृषीमंत्री असताना मी ते पत्र लिहिले होते, हे खरे आहे. पण, जे लोक माझ्या पत्राचा उल्लेख करत आहे. त्यांनी माझे पत्र नीट वाचावे. मी माझ्या पत्रात एपीएमसी मार्केटबद्दल सुधारणा केली पाहिजे, असे बोललो आहे. पण मोदी सरकारने जे कृषी कायदे केले आहे, त्यामध्ये एपीएमसी मार्केटचा उल्लेख नाही. त्यामुळे आमचे नाव घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे', असा आरोपही शरद पवारांनी यावेळी केला.

शरद पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यात पुरंदर विमानतळाच्या जमीन अधीग्रहणासंदर्भात चर्चा झाली. यानंतर ते पत्रकारंशी बोलत होते. यावेळी त्यांनी, आपण शेतकरी आंदोलनावर भाष्य करणार नाही, असेही स्पष्ट केले होते. 

पवार भडकले आणि पत्रकार परिषद संपवून निघून गेले -यावेळी, एक पत्रकार 2010 च्या पत्राचा वारंवार उल्लेख करत पवारांना प्रश्न विचारत होता, यावर पवार भडकले आणि 'तुम्ही लोकं बाहेर उभे होतात, हे पाहून मला बरे वाटले नाही. म्हणून मी तुम्हाला येथे बोलावले. मात्र, उत्तर देऊनही तुम्ही एकच प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालवत आहात. मी तुम्हाला येथे बोलावून चूक केली, यापुढे तुम्हाला बोलावणार नाही'. असे म्हणत शरद पवार पत्रकार परिषद संपवून निघून गेले. 

काय म्हणाले होते फडणवीस -शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सोमवारी फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते म्हणाले होते, "मी एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करू इच्छितो, पवार साहेबांनी कायद्याच्या तत्वाला कुठेही विरोध केला नाही. आपण सुरुवातीला पाहिले, की पवारांनी एक दिवस अन्नत्याग केला होता, त्या दिवशी तो कायद्याच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात नव्हता. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते, की यावर आणखी व्यापक चर्चा व्हायला हवी होती. तसेच ज्या पद्धतीने खासदारांना निलंबित केले त्यासाठी मी अन्नत्याग करत आहे. किंवा काल-परवाही, ते मूलभूत तत्वांवर बोललेले नाहीत, ते स्पष्टपणे म्हणाले आहेत, की यावर अधिक व्यापक चर्चा व्हायला हवी होती, ते स्थाई समितीकडे जायला हवे होते. म्हणजे या कायद्याच्या कुठल्याही मूलभूत तत्वाला त्यांनी विरोध केलेला नाही. कारण, याची मूलभूत तत्वे ही त्यांच्या काळात, त्यांनीच तयार केलेली अथवा पुढे नेलेली आहेत." 

गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याबाबत सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचे चित्र असल्याने शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारFarmer strikeशेतकरी संपJournalistपत्रकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस