शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

“हद कर दी... कहां कहां बदलोगे?”; यूपीतील नामांतरावरुन नवाब मलिकांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 13:18 IST

अकबर इलाहाबादी नहीं, अब प्रयागराजी कहिए, असा टोला मलिकांनी लगावलाय. नेमके प्रकरण जाणून घ्या...

मुंबई: उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे योगी सरकार सत्तेत आल्यापासून काही ठिकाणांची नावे बदलण्यात आली. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अलाहाबाद या शहराचे नाव बदलून प्रयागराज केले होते. सर्व सरकारी दस्तऐवजांमध्ये देखील तसे बदल करण्यात येत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. 

नवाब मलिक यांनी अकबर इलाहाबादी यांचा एक शेर ट्वीट करत नवाब मलिक यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कौम के गम में डिनर खाते हैं हुक्काम के साथ, रंज लीडर को बहुत है मगर, आराम के साथ..अकबर इलाहाबादी... अकबर इलाहाबादी नहीं, अब प्रयागराजी कहिए… हद कर दी... कहां कहां बदलोगे, अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे. 

शहराच्या नावासोबतच व्यक्तींची नावेही बदलतील का?

उत्तर प्रदेश उच्च शिक्षण सेवा आयोगाच्या वेबसाईटवर चक्क काही प्रसिद्ध कवींची आडनावे बदलण्यात आली आहे. त्यांचे आडनाव ‘इलाहाबादी’ ऐवजी ‘प्रयागराज’ असे लिहिण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होता आहे. वेबसाईटवरील अलाहाबाद विभागात प्रसिद्ध कवी अकबर इलाहाबादी, तेग इलाहाबादी आणि राशीद इलाहाबादी यांची आडनावे बदलण्यात आली असून अकबर प्रयागराज, तेग प्रयागराज आणि राशीद प्रयागराज असा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकारानंतर शहराच्या नावासोबतच व्यक्तींची नावेही बदलतील का, अशी चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, फर्जीबाबा कालिचरण यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना शिवागाळ केली असून, अशा वक्तव्यांना देश कधीही सहन करणार नाही. तसेच गोडसेचा महिमामंडळ होत असताना आता मोदी सरकार आल्यावर देशात महात्मा गांधीजींना शिवागाळ करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी यापूर्वी केला होता.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथnawab malikनवाब मलिक