शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

जलवाहतूक एक उत्तम पर्याय

By admin | Updated: July 7, 2014 17:06 IST

केद्रीय परिवहन आणि नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी मागील आठवडय़ात मुंबई दौ:यादरम्यान मुंबईच्या समुद्रकिना:यालगत सुरू होणा:या काही सुविधांची घोषणा केली

केद्रीय परिवहन आणि नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी मागील आठवडय़ात मुंबई दौ:यादरम्यान मुंबईच्या समुद्रकिना:यालगत सुरू होणा:या काही सुविधांची घोषणा केली आणि पुन्हा एकदा जलवाहतुकीची चर्चा सुरू झाली. 
आपल्या देशाला सुमारे 6500 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. याशिवाय अंदमान आणि निकोबार तसेच लक्षद्वीप बेटांभोवती सुमारे एक हजार किलोमीटरचा अधिक सागरी तट आहे. यात भर म्हणून जवळपास 14 हजार किलोमीटर लांबीच्या नद्या जलवाहतुकीसाठी वापरल्या जाऊ शकतात, असा अहवाल अंतर्गत जलवाहतूक प्राधिकरणाने तयार केला आहे. पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर प्रत्येकी दोन आणि ईशान्य भारतामध्ये एक असे पाच राष्ट्रीय जलमार्गही घोषित करून दशके उलटली. मात्र, त्यांच्या विकासाची काही निश्चित योजना कार्यान्वित झालेली नाही. 
ब्रिटिश पूर्व काळात उत्तर भारतातील अनेक नद्यांमधून जलवाहतूक सुरू होती. दिल्लीहून आग्रा आणि वाराणसीपासून पाटणा आणि अगदी पुढे कोलकात्यार्पयत जलमार्गाने प्रवासी आणि सामानाची ने-आण होत असे. याचा फायदा घेऊन कोलकात्यामध्ये मोठय़ा उद्योगांनी आपले पाय रोवले. अभियांत्रिकी, लोह, सिमेंट इत्यादी उद्योगांनी आपली सुरुवात इथेच केली. महाराष्ट्रातील कल्याण, दाभोळ आणि रायगड, रेवदांडय़ामधून मोठय़ा प्रमाणात व्यापार होत असे. भारत पूर्णपणो ब्रिटिश अंमलाखाली आल्यानंतर मात्र शासनकत्र्याची गरज बदलली. जलद प्रवासाची साधने आवश्यक झाल्यामुळे रस्ते आणि लोहमार्गावर भर देण्यात आला आणि हळूहळू जलवाहतुकीकडे दुर्लक्ष झाले. नद्यांवर मोठमोठी धरणो बांधली गेली. बेसुमार जंगलतोडीमुळे जमिनीची धूप होऊन नद्यांमध्ये गाळ जमा होऊ लागला आणि त्या जलवाहतुकीसाठी अडचणीच्या झाल्या. बारमाही नद्यादेखील वर्षातील चार महिन्यांहून अधिक काळ कोरडय़ा दिसू लागल्या आहेत. 
समुद्रकिना:यावरील दृश्य निराळे नाही. महानगरातील आणि औद्योगिक वसाहतींमधील प्रदूषित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता समुद्रात सोडून देण्यात येते. चहूबाजूंनी भराव टाकून समुद्राला मागे ढकलण्याचा प्रयत्न मनुष्याने चालविला आहे. त्याचा परिणाम म्हणून निळाशार समुद्र किना:यालगत प्रदूषित झालेला दिसतो. 
रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीला अर्धा खर्च लागतो. जलवाहतूक एक चतुर्थाश खर्चात शक्य होते. आपल्या देशात दरवर्षी सुमारे दीड लाखाहून अधिक लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. आपले वार्षिक कच्च्या तेलाचे आयात बिल सुमारे आठ लाख कोटी रुपयांचे आहे. सतत वाढणा:या वाहनांच्या प्रदूषणाने पर्यावरणाची हानी सुरूच आहे. या दुष्परिणामांना रोखण्याच्या दृष्टीने जलवाहतुकीचा पर्याय अतिशय योग्य आहे. मुंबईलाही समुद्रकिनारा आणि लगतच्या खाडय़ांची नैसर्गिक देणगी लाभली आहे. शहर जसजसे वाढत गेले तसेच मोठय़ा प्रमाणात ठाणो, नवी मुंबई, वसई, विरार, अलिबाग परिसरात लोकसंख्या वाढली आहे. केवळ लोकल सेवेवर अवलंबून राहिल्याचा परिणाम अडचणीचा ठरला आहे. मुंबईची होणारी वाढ विचारात घेऊन 1967 साली मुंबई पोर्ट ट्रस्टने आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनीला संपूर्ण मुंबई बंदर परिसराचा एक मास्टर प्लान बनवण्याचे कंत्रट दिले. त्या अहवालात मालवाहतुकीस सोयी, प्रवासी वाहतुकीचा विकास आराखडा, पर्यटनाचे विविध उपक्रम यांचा समावेश होता. दुर्दैवाने दर दशकात या विषयाचा अभ्यास होत राहिला आणि कोणतीही योजना अंमलात आली नाही. (लेखक महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स-बंदरचे अध्यक्ष आहेत.) 
 
गेट-वे परिसरातील बोटींची गर्दी, त्यामध्ये चढता-उतरताना महिला, वृद्ध आणि मुलांची होणारी तारांबळ, नसणा:या बोटी या मुंबई शहराचे भूषण नाहीत. या परिस्थितीमध्ये बदल घडवण्याच्या दृष्टीने गडकरींनी टाकलेली पावले आशादायीच आहेत. तरंगती हॉटेल्स, क्रुझ बोटी, सी प्लेन, हॉवरक्राफ्ट सेवा, वॉटर स्पोर्ट्स यांसारख्या सेवा या केवळ श्रीमंत लोकांपुरत्याच मर्यादित न राहता सर्वसामान्य मुंबईकर आणि त्यानंतर देशातील अन्य समुद्र आणि नदी तटांवरील शहरवासीयांसाठी आकर्षण केंद्र बनतील अशी त्याची क्षमता आहे.
 
- अतुल कुलकर्णी