शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

केदारनाथ, चामोलीत नैसर्गिक दुर्घटना टळतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 04:56 IST

आयआयटी वैज्ञानिकांनी सुचवला उपाय

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील केदारनाथ आणि चामोलीत भविष्यात नैसर्गिक दुर्घटना होऊ नयेत यासाठी भारतीय वैज्ञानिकांनी तंत्र सांगितले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (कानपूर) वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, जर हिमालयातील हिमनदी जलग्रहण क्षेत्रांची उपग्रहांद्वारे रियल टाइम देखरेख केली गेल्यास धौलीगंगा आणि केदारनाथमध्ये घडलेल्या दुर्घटनांच्या आधी लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले जाऊ शकते. उपग्रहांद्वारे मिळणाऱ्या रियल टाइम माहितीमुळे अशा दुर्घटनांची माहिती आधीच समजेल.या वैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार हिमालय क्षेत्रांत हिमनद्यांत बनलेली सरोवरे फुटल्यास जीवितहानी टाळण्यासाठी परिणामकारक धोरण असले पाहिजे. या वैज्ञानिकांत डॉ. तरुण शुक्ल आणि प्रोफेसर इंद्र शेखर सेन यांचा समावेश आहे. या अभ्यासात त्यांना भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने मदत केली. हा अभ्यास आंतरराष्ट्रीय मासिक ‘सायन्स’मध्ये प्रसिद्ध झाला आहे.

तिसरा ध्रुव nजलवायु परिवर्तनाच्या कारणामुळे तापमान आणि जास्त पावसाच्या घटना वेगाने वाढत आहेत. हिमालयाला जगाचा तिसरा ध्रुवही म्हटले जाते. येथे जगाचा सर्वात मोठा बर्फाळ भाग आहे. nहिमालयातील हिमनद्या तुलनात्मक रूपात वेगाने वितळत आहेत. यामुळे हिमालयात अनेक ठिकाणी सरोवर निर्माण होत आहेत. जर हिमनद्या वितळल्यामुळे सरोवरांच्या वर जास्त पाऊस होत असेल किंवा त्यांच्यावर कोणता मोठा दगड किंवा बर्फाचा तुकडा कोसळत असेल तर त्यामुळे केदारनाथ किंवा चामोलीसारख्या दुर्घटना होतील. nहिमालय यावेळी नैसर्गिक संकटांचे केंद्र बनत आहे. यात धोकादायक घटना हिमनद्यांच्या माध्यमातून बनणारे सरोवर फुटल्यामुळे घडतात. 

टॅग्स :Kedarnathकेदारनाथ