शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या ८० कुटूंबांना जगण्याच्या लढाईत बळ देणार सुप्रियाताई साधणार दुष्काळग्रस्ताशी संवाद : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची माहिती

By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST

नांदेड : मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवा पत्नी आणि मुलांना जीवनात उभे करण्याासाठी खा़सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्विनी सामाजिक अभियानाने काम सुरू केले असून मराठवाड्यातील अत्यंत गरजू आणि कमी वय असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या ८० विधवा पत्नींना दत्तक घेतले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी पत्रपरिषदेत दिली़

नांदेड : मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवा पत्नी आणि मुलांना जीवनात उभे करण्याासाठी खा़सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्विनी सामाजिक अभियानाने काम सुरू केले असून मराठवाड्यातील अत्यंत गरजू आणि कमी वय असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या ८० विधवा पत्नींना दत्तक घेतले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी पत्रपरिषदेत दिली़
नांदेड जिल्हा महिला आघाडीतील फेरबद्दल आणि नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडीकरीता त्या नांदेडात आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांमध्ये तरूण शेतकर्‍यांचे प्रमाण बरेच आहे़ अशा अनेक शेतकर्‍यांच्या पत्नीला सासर आणि माहेरचादेखील आधार नाही़ त्यांना जीवनात उभे करण्याकरीता कायमस्वरूपी व्यवसाय, नोकरी उपलब्ध व्हावी याकरीता यशस्वीनी अभियान प्रयत्न करणार असल्याचे वाघ यांनी सांगितले़ मराठवाड्यात ८० स्त्रीयांना त्यांच्या आवडीनूसार व्यवसाय प्रशिक्षण आणि शिक्षण दिले जाणार आहे़ तर त्यांच्या मुलांना शिक्षणाकरीता बारामती येथील शारदा प्रतिष्ठानमध्ये ठेवण्यात येणार आहे़ याठिकाणी राहणे, जेवन, शिक्षण सर्व सुविधा मोफत पुरविल्या जात आहेत़ तसेच काही स्त्रीयांच्या मागणीनूसार त्यांना दुग्धव्यवसायाकरीता गायी, शेळ्या दिल्या जाणार आहेत़ आगामी काळात खा़सुप्रियाताई सुळे या नांदेड जिल्हा दौरा करून दुष्काळग्रस्तांशी संवाद साधणार असून जिल्‘ाच्या समन्वयाची जबाबदारी कल्पना पाटील डोंगळीकर यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले़ दरम्यान, तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाविषयी बोलतांना चित्राताई वाघ म्हणाल्या, मंदिरात जायला महिला शिल्लक रहायला पाहीजे़ आज महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतो आहे, पाण्याकरीता वणवण फिरणार्‍या महिलांच्या समस्या वेगळ्याच आहेत़ पाणी प्रश्नाला प्राधान्य देवून ग्रामीण भागातील स्त्रीयांच्या प्रश्नासाठी लढावे लागणार आहे़ पुरोगामी महाराष्ट्रात आजही सामाजिक अधिकाराकरीता स्त्रीयांना लढावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़ मंदिर प्रवेशास विद्यमान मुख्यमंत्र्यांचा विरोध नाही तर त्यांनी स्त्रीयांना सन्मानाने मंदिरात सोडण्याची व्यवस्था करायला हवी होती़ गृहमंत्री पद त्यांच्याकडे असतांना मंदिर प्रवेश करतांना स्त्रीयांना धक्काबुक्की होती, ही बाब लाजीरवाणी आहे़
पत्रपरिषदेअगोदर झालेल्या बैठकीत चित्राताई वाघ यांच्या हस्ते प्रदेश चिटणीस कल्पना पाटील डोंगळीकर, नुतन शहर जिल्हाध्यक्षा कृष्णा मंगनाळे आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रांजली रावनगावकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले़ यावेळी बापुसाहेब गोरठेकर, डॉ़सुुनील कदम, शिला कदम, रामनारायण बंग, जीवन पाटील घोगरे, सविता कंठेवाड, गणेश तादलापूरकर, सारिका बच्चेवार, रितू कोलंबीकर आदी उपस्थित होते़