आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या ८० कुटूंबांना जगण्याच्या लढाईत बळ देणार सुप्रियाताई साधणार दुष्काळग्रस्ताशी संवाद : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची माहिती
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST
नांदेड : मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या विधवा पत्नी आणि मुलांना जीवनात उभे करण्याासाठी खा़सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्विनी सामाजिक अभियानाने काम सुरू केले असून मराठवाड्यातील अत्यंत गरजू आणि कमी वय असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या ८० विधवा पत्नींना दत्तक घेतले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी पत्रपरिषदेत दिली़
आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या ८० कुटूंबांना जगण्याच्या लढाईत बळ देणार सुप्रियाताई साधणार दुष्काळग्रस्ताशी संवाद : राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची माहिती
नांदेड : मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या विधवा पत्नी आणि मुलांना जीवनात उभे करण्याासाठी खा़सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्विनी सामाजिक अभियानाने काम सुरू केले असून मराठवाड्यातील अत्यंत गरजू आणि कमी वय असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या ८० विधवा पत्नींना दत्तक घेतले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी पत्रपरिषदेत दिली़ नांदेड जिल्हा महिला आघाडीतील फेरबद्दल आणि नवीन जिल्हाध्यक्षांच्या निवडीकरीता त्या नांदेडात आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ आत्महत्याग्रस्त शेतकर्यांमध्ये तरूण शेतकर्यांचे प्रमाण बरेच आहे़ अशा अनेक शेतकर्यांच्या पत्नीला सासर आणि माहेरचादेखील आधार नाही़ त्यांना जीवनात उभे करण्याकरीता कायमस्वरूपी व्यवसाय, नोकरी उपलब्ध व्हावी याकरीता यशस्वीनी अभियान प्रयत्न करणार असल्याचे वाघ यांनी सांगितले़ मराठवाड्यात ८० स्त्रीयांना त्यांच्या आवडीनूसार व्यवसाय प्रशिक्षण आणि शिक्षण दिले जाणार आहे़ तर त्यांच्या मुलांना शिक्षणाकरीता बारामती येथील शारदा प्रतिष्ठानमध्ये ठेवण्यात येणार आहे़ याठिकाणी राहणे, जेवन, शिक्षण सर्व सुविधा मोफत पुरविल्या जात आहेत़ तसेच काही स्त्रीयांच्या मागणीनूसार त्यांना दुग्धव्यवसायाकरीता गायी, शेळ्या दिल्या जाणार आहेत़ आगामी काळात खा़सुप्रियाताई सुळे या नांदेड जिल्हा दौरा करून दुष्काळग्रस्तांशी संवाद साधणार असून जिल्ाच्या समन्वयाची जबाबदारी कल्पना पाटील डोंगळीकर यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले़ दरम्यान, तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाविषयी बोलतांना चित्राताई वाघ म्हणाल्या, मंदिरात जायला महिला शिल्लक रहायला पाहीजे़ आज महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतो आहे, पाण्याकरीता वणवण फिरणार्या महिलांच्या समस्या वेगळ्याच आहेत़ पाणी प्रश्नाला प्राधान्य देवून ग्रामीण भागातील स्त्रीयांच्या प्रश्नासाठी लढावे लागणार आहे़ पुरोगामी महाराष्ट्रात आजही सामाजिक अधिकाराकरीता स्त्रीयांना लढावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़ मंदिर प्रवेशास विद्यमान मुख्यमंत्र्यांचा विरोध नाही तर त्यांनी स्त्रीयांना सन्मानाने मंदिरात सोडण्याची व्यवस्था करायला हवी होती़ गृहमंत्री पद त्यांच्याकडे असतांना मंदिर प्रवेश करतांना स्त्रीयांना धक्काबुक्की होती, ही बाब लाजीरवाणी आहे़पत्रपरिषदेअगोदर झालेल्या बैठकीत चित्राताई वाघ यांच्या हस्ते प्रदेश चिटणीस कल्पना पाटील डोंगळीकर, नुतन शहर जिल्हाध्यक्षा कृष्णा मंगनाळे आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रांजली रावनगावकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले़ यावेळी बापुसाहेब गोरठेकर, डॉ़सुुनील कदम, शिला कदम, रामनारायण बंग, जीवन पाटील घोगरे, सविता कंठेवाड, गणेश तादलापूरकर, सारिका बच्चेवार, रितू कोलंबीकर आदी उपस्थित होते़