शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

राष्ट्रीय सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देणार; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 02:34 IST

घुसखोरांमुळे देशाला धोका; काश्मीरमध्ये शांततेचे प्रयत्न- राष्ट्रपती

नवी दिल्ली : भारताचा २०१४ पासून सुरू झालेला विकासाचा प्रवास यापुढेही सुरू राहण्यासाठी मतदारांनी लोकसभा निवडणुकांत कौल दिला, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणात सांगितले. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी व लोकसभाध्यक्षांची निवड यानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी गुरुवारी अभिभाषण केले. त्यांच्या भाषणातील हे प्रमुख मुद्दे-राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्यराष्ट्रीय सुरक्षेला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर जशी पावले उचलली गेली तशाच प्रकारचे निर्णय राष्ट्राच्या सुरक्षेसाठी भविष्यातही घेतले जातील. घुसखोरांमुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे.तिहेरी तलाक, हलालाविरुद्ध लढातिहेरी तलाक, निकाह हलाला यासारख्या कुप्रथा संपविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, त्याला सर्व पक्षांनी साथ द्यावी. महिलांना समान अधिकार मिळण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.जीएसटी सुलभ करणारकृषीक्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यात येणार असून, उद्योजकांना तारणमुक्त कर्जे देण्याचा तसेच जीएसटी आणखी सुलभ करण्याचे प्रयत्न होतील. अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणखी आर्थिक सुधारणाही केल्या जातील.शांततेचे प्रयत्नजम्मू-काश्मीरमध्ये शांतता व सुव्यवस्था नांदण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करीत आहे. काश्मीरमध्ये पंचायत व लोकसभेच्या निवडणुका नीट पार पाडण्याचे सरकारचे प्रयत्न यशस्वी झाले.नवे औद्योगिक धोरणउद्योगधंद्यांचा विकास तसेच रोजगारांच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी नवे औद्योगिक धोरण लवकरच जाहीर करू. भारताला जागतिक उत्पादनांचे केंद्र बनविण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.मतदारांच्या आशा-आकांक्षाखासदारांनी अशा पद्धतीने कामे करावीत की, त्यापासून लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. मतदाराच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करणे हे खासदाराचे कर्तव्य आहे. त्याचे त्यांनी पालन केले पाहिजे.कावेरी प्रश्न द्रमुककडून उपस्थितराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण सुरू होताच द्रमुकच्या खासदारांनी कावेरी जलवाटपाचा मुद्दा उपस्थित केला. कर्नाटक आणि तामिळनाडूतील हा तिढा लवकर सोडवावा, अशी मागणी या खासदारांनी केली.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद