शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

राष्ट्रीय सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देणार; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 02:34 IST

घुसखोरांमुळे देशाला धोका; काश्मीरमध्ये शांततेचे प्रयत्न- राष्ट्रपती

नवी दिल्ली : भारताचा २०१४ पासून सुरू झालेला विकासाचा प्रवास यापुढेही सुरू राहण्यासाठी मतदारांनी लोकसभा निवडणुकांत कौल दिला, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणात सांगितले. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी व लोकसभाध्यक्षांची निवड यानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी गुरुवारी अभिभाषण केले. त्यांच्या भाषणातील हे प्रमुख मुद्दे-राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्यराष्ट्रीय सुरक्षेला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर जशी पावले उचलली गेली तशाच प्रकारचे निर्णय राष्ट्राच्या सुरक्षेसाठी भविष्यातही घेतले जातील. घुसखोरांमुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे.तिहेरी तलाक, हलालाविरुद्ध लढातिहेरी तलाक, निकाह हलाला यासारख्या कुप्रथा संपविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, त्याला सर्व पक्षांनी साथ द्यावी. महिलांना समान अधिकार मिळण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.जीएसटी सुलभ करणारकृषीक्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यात येणार असून, उद्योजकांना तारणमुक्त कर्जे देण्याचा तसेच जीएसटी आणखी सुलभ करण्याचे प्रयत्न होतील. अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणखी आर्थिक सुधारणाही केल्या जातील.शांततेचे प्रयत्नजम्मू-काश्मीरमध्ये शांतता व सुव्यवस्था नांदण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करीत आहे. काश्मीरमध्ये पंचायत व लोकसभेच्या निवडणुका नीट पार पाडण्याचे सरकारचे प्रयत्न यशस्वी झाले.नवे औद्योगिक धोरणउद्योगधंद्यांचा विकास तसेच रोजगारांच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी नवे औद्योगिक धोरण लवकरच जाहीर करू. भारताला जागतिक उत्पादनांचे केंद्र बनविण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.मतदारांच्या आशा-आकांक्षाखासदारांनी अशा पद्धतीने कामे करावीत की, त्यापासून लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. मतदाराच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करणे हे खासदाराचे कर्तव्य आहे. त्याचे त्यांनी पालन केले पाहिजे.कावेरी प्रश्न द्रमुककडून उपस्थितराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण सुरू होताच द्रमुकच्या खासदारांनी कावेरी जलवाटपाचा मुद्दा उपस्थित केला. कर्नाटक आणि तामिळनाडूतील हा तिढा लवकर सोडवावा, अशी मागणी या खासदारांनी केली.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद