शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देणार; राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 02:34 IST

घुसखोरांमुळे देशाला धोका; काश्मीरमध्ये शांततेचे प्रयत्न- राष्ट्रपती

नवी दिल्ली : भारताचा २०१४ पासून सुरू झालेला विकासाचा प्रवास यापुढेही सुरू राहण्यासाठी मतदारांनी लोकसभा निवडणुकांत कौल दिला, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषणात सांगितले. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी व लोकसभाध्यक्षांची निवड यानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी गुरुवारी अभिभाषण केले. त्यांच्या भाषणातील हे प्रमुख मुद्दे-राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्यराष्ट्रीय सुरक्षेला सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर जशी पावले उचलली गेली तशाच प्रकारचे निर्णय राष्ट्राच्या सुरक्षेसाठी भविष्यातही घेतले जातील. घुसखोरांमुळे भारताच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे.तिहेरी तलाक, हलालाविरुद्ध लढातिहेरी तलाक, निकाह हलाला यासारख्या कुप्रथा संपविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, त्याला सर्व पक्षांनी साथ द्यावी. महिलांना समान अधिकार मिळण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.जीएसटी सुलभ करणारकृषीक्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्यात येणार असून, उद्योजकांना तारणमुक्त कर्जे देण्याचा तसेच जीएसटी आणखी सुलभ करण्याचे प्रयत्न होतील. अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणखी आर्थिक सुधारणाही केल्या जातील.शांततेचे प्रयत्नजम्मू-काश्मीरमध्ये शांतता व सुव्यवस्था नांदण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करीत आहे. काश्मीरमध्ये पंचायत व लोकसभेच्या निवडणुका नीट पार पाडण्याचे सरकारचे प्रयत्न यशस्वी झाले.नवे औद्योगिक धोरणउद्योगधंद्यांचा विकास तसेच रोजगारांच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी नवे औद्योगिक धोरण लवकरच जाहीर करू. भारताला जागतिक उत्पादनांचे केंद्र बनविण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.मतदारांच्या आशा-आकांक्षाखासदारांनी अशा पद्धतीने कामे करावीत की, त्यापासून लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. मतदाराच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करणे हे खासदाराचे कर्तव्य आहे. त्याचे त्यांनी पालन केले पाहिजे.कावेरी प्रश्न द्रमुककडून उपस्थितराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण सुरू होताच द्रमुकच्या खासदारांनी कावेरी जलवाटपाचा मुद्दा उपस्थित केला. कर्नाटक आणि तामिळनाडूतील हा तिढा लवकर सोडवावा, अशी मागणी या खासदारांनी केली.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद