शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

National Language: हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही? जाणून घ्या राष्ट्रभाषा-राजभाषा आणि मातृभाषेतील अंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 11:56 IST

National Language: भारतासारख्या विशाल आणि वैविध्यपूर्ण देशात अनेक भाषा आणि बोली लिहिल्या, वाचल्या आणि बोलल्या जातात. अशा परिस्थितीत राष्ट्रभाषेबाबत आपले संविधान काय सांगते, ते जाणून घेऊया.

National Language: सोशल मीडिया दररोज विविध गोष्टींवरुन वाद-प्रतिवाद केले जातात. सध्या देशात भाषेचा वाद सुरू झाला आहे. हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही, असे दाक्षिणात्य चित्रपटांचा अभिनेता किचा सुदीपने सांगितल्यावर बॉलीवूडचा अभिनेता अजय देवगणने  त्याला सुनावले. या दोन्ही स्टार्समध्ये कोणताही वाद वाढण्याआधीच आपापसात समेट घडवून आणला गेला, मात्र सोशल मीडियावर हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे की नाही? अशी चर्चा सुरू झाली. देशाची राज्यघटना याबद्दल काय सांगते आणि कोणत्या भाषेला राष्ट्रभाषा म्हणून अधिकृत मान्यता आहे? देशाची अधिकृत राष्ट्रीय भाषा कोणती आहे ते जाणून घेऊया.

हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीभारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि हीच त्याची सर्वात मोठी ओळख आहे. भारतात अनेक भाषा आणि बोली बोलल्या, लिहिल्या आणि वाचल्या जातात. अशा स्थितीत कोणत्याही एका भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. भारतातील मोठी लोकसंख्या हिंदी भाषिक आहे हिंदी न बोलणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तसेच भारतात प्रत्येकाला एकच राष्ट्रीय भाषा शिकण्याची आणि बोलण्याची सक्ती नाही.

14 सप्टेंबरला हिंदी दिवस का साजरा केला जातो?भारताला त्यांच्या भिन्नतेमुळे राष्ट्रभाषा नाही, परंतु सरकारी कार्यालयांमध्ये कामासाठी भाषिक आधार निर्माण करण्यासाठी हिंदीला अधिकृत भाषेचा(राजभाषा) दर्जा देण्यात आला आहे. यासंबंधीच्या महत्त्वाच्या तरतुदी संविधानाच्या भाग 17 मध्येही करण्यात आल्या आहेत.

हिंदी ही राजभाषा कधी झाली?14 सप्टेंबर 1949 रोजी हिंदीला राजभाषेचा दर्जा मिळाला. त्यानंतर 1953 पासून राजभाषा प्रचार समितीतर्फे दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिवसाचे आयोजन करण्यात येऊ लागले. भारतीय राज्यघटनेच्या भाग 17 च्या कलम 343(1) मध्ये असे म्हटले आहे की राष्ट्राची अधिकृत भाषा हिंदी आणि लिपी देवनागरी असेल.

मातृभाषा कोणाला म्हणतात?मातृभाषा ही अशी भाषा आहे जी आपण जन्माने शिकतो. आपण जिथे जन्मलो तिथे बोलली जाणारी भाषा स्वतःच शिकली जाते. जी भाषा आपण जन्मानंतर प्रथम शिकतो, तिला आपण आपली मातृभाषा मानतो. आजवर देशात कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळालेला नाही आणि सर्व भाषांना समान आदर व सन्मान मिळाला आहे. देशातील कुठल्याही नागरिकाला संपूर्ण देशात त्याची मातृभाषा बोलण्यास, लिहिण्यास आणि वाचण्याचे स्वातंत्र्य आहे. 

टॅग्स :IndiaभारतAjay Devgnअजय देवगण