शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
2
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
3
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
4
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
5
IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला
6
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
7
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
8
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
9
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
10
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
11
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
12
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
13
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
14
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
15
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
17
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
18
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
19
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
20
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
Daily Top 2Weekly Top 5

'कच्चा लिंबू' समजू नका, राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार घेऊ; कलाकारांचा 'इरादा' पक्का, सरकारवर फसवणुकीचा 'ठप्पा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 11:38 IST

केवळ 11 पुरस्कार विजेत्यांनाच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी दिल्लीत जमलेल्या कलाकारांनी घेतलेल्या असहकाराच्या भूमिकेमुळे केंद्र सरकार अडचणीत सापडले आहे. त्यामुळे आज संध्याकाळी होऊ घातलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्यात काही विजेत्यांना राष्ट्रपतींच्याऐवजी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. केवळ 11 पुरस्कार विजेत्यांनाच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयाला विजेत्या कलाकारांनी तीव्र विरोध केला आहे. आम्ही राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार स्वीकारू, अन्यथा सोहळ्यावर बहिष्कार टाकू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आमच्या मनात सरकारविषयी कोणतीही कटुता नाही. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देणार नाही, हे सांगितल्यामुळे कलाकारांमध्ये विश्वासघात झाल्याची भावना आहे. त्यामुळे आम्ही आज पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे पत्र सरकारला पाठवले आहे. या पत्रावर 62 जणांच्या सह्या असल्याचे कलाकारांकडून घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत स्पष्ट करण्यात आले.

थोड्याचवेळात यासंबंधी दिल्लीच्या अशोक हॉटेलमध्ये तातडीची बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल.

आतापर्यंत दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात येत असे. मात्र, यंदा पहिल्यांदाच या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. हा निर्णय ऐनवेळी जाहीर करण्यात आला. कारण, या पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर विजेत्यांना पारितोषिक राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. परंतु, चित्रपट महोत्सव विभागाच्या संचालकांकडून विजेत्या कलाकारांना या सोहळ्याच्या रंगीत तालमीसाठी पाचारण करण्यात आले तेव्हा 107 पुरस्कार हे स्मृती इराणींच्या हस्ते दिले जातील, अशी माहिती देण्यात आली. तेव्हा कलाकारांनी याबद्दल नाराजी व्यक्त करायला सुरूवात केली. अनेक कलाकरांनी इराणींकडून पुरस्कार स्वीकारण्यास नकार देत या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. हे प्रकरण चिघळायला लागल्यानंतर स्वत: स्मृती इराणी त्याठिकाणी आल्या होत्या. त्यांना संबंधित कलाकारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात राष्ट्रपती कार्यालयाकडूनच बदल करण्यात आले, असा दावा इराणी यांनी केला. मात्र, तुमच्या भावना मी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवेन, असे आश्वासन त्यावेळी इराणी यांनी दिले होते. 

टॅग्स :National Film Awardsराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018Smriti Iraniस्मृती इराणी