शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक: नवभारताच्या उभारणीसाठी भाजपाचा सहा कलमी अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 02:07 IST

गरिबी, दहशतवाद, सांप्रदायिकता, जातीयवाद, भ्रष्टाचार आणि अस्वच्छता व कच-यापासून देशाला मुक्त करून सन २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘नवभारत’ साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सोमवारी सहा कलमी अजेंडा राबविण्याचा निर्धार केला.

नवी दिल्ली : गरिबी, दहशतवाद, सांप्रदायिकता, जातीयवाद, भ्रष्टाचार आणि अस्वच्छता व कच-यापासून देशाला मुक्त करून सन २०२२ पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘नवभारत’ साकार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सोमवारी सहा कलमी अजेंडा राबविण्याचा निर्धार केला.येथील तालकटोरा स्टेडियममध्ये भरलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अधिवेशनात अशा आशयाचा ठराव संमत केला गेला. सकाळी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी या बैठकीचे उद््घाटन केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने समारोप झाला. अरुण जेटली व नितीन गडकरी या दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी नंतर अधिवेशनात झालेल्या कामकाजाची पत्रकारांना माहिती दिली. बचाव करण्यासाठी माझ्यामागे कोणी नातेवाईक नाहीत, असे सांगून मोदी यांनी सार्वजनिक व सरकारी व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार आणि लबाडी करणाºयांची जराही गैर करणार नाही, असे ठणकावून सांगितले. राजकीय ठरावात सरकारने हाती घेतलेल्या समाजोद्धाराच्या अनेक योजनांची तारीफ केली.भ्रष्टाचाराविरुद्ध तडजोड नाहीभ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत कोणतीही तडजोड करणार नाही. यात जो कोणी सापडेल त्याची खैर नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत निक्षून सांगितले.केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी बैठकीबाबत माहिती दिली. भ्रष्टाचाराबाबत बोलताना मोदी म्हणाले की, भ्रष्टाचारात सापडल्यास कुणाची गय करणार नाही. माझा कोणीही नातेवाईक नाही. काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका करताना ते म्हणाले की, विरोधक सत्तेवर होते तेव्हा सत्ता त्यांच्यासाठी उपभोगाची वस्तू होती आणि आता त्यांना हे समजत नाही की, विरोधी पक्षात कसे राहायचे आहे. अनेकदा विरोधकांकडून कडवट भाषा वापरली जाते. जर सरकारवर कोणताही स्पष्ट आरोप नाही तर अशा भाषेचा वापर हा पर्याय होऊ शकत नाही.

टॅग्स :BJPभाजपा