शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आता मिड डे मिल सोबत नाश्ताही मिळणार; नव्या शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकासही होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 13:56 IST

नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याचीही तरतूद

मुंबई: सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासोबत नाश्ताही देण्यात यावा, अशी सूचना नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे. त्यामुळे आता शाळांमध्ये मुलांना भोजनासोबत नाश्ताही मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं याच आठवड्यात नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी नाश्त्याची आवश्यकता असते. त्यामुळे मध्यान्ह भोजनेच्या योजनेचा आणखी विस्तार करण्यात यावा, अशी शिफारस नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आली आहे.'विद्यार्थ्यांना पुरेशी पोषणमूल्य मिळत नसल्यास त्यांना व्यवस्थित अभ्यास करता येत नाहीत. शरीरासाठी आवश्यक घटक न मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासोबत शारीरिक विकासदेखील गरजेचा आहे. शाळेत प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, समुपदेशक असणं आवश्यक आहे,' असं नवं शैक्षणिक धोरण सांगतं.'पौष्टिक नाश्ता केल्यानंतर सकाळचे काही तास अभ्यासासाठी उत्तम असल्याचं सर्वेक्षण सांगतं. या कालावधीत विद्यार्थी अवघड विषयांचा अभ्यास करू शकतात. त्यामुळे या वेळेत विद्यार्थ्यांना साधाच, पण पोषणमूल्य असलेला ब्रेकफास्ट दिला जाऊ शकतो,' असं धोरणात नमूद करण्यात आलं आहे. ज्या ठिकाणी गरम जेवण देणं शक्य नसेल, तिथे साधं, पण पौष्टिक जेवण देता येऊ शकेल. अशा भागांमध्ये शेंगदाणा किंवा चणे गूळ आणि स्थानिक फळांसोबत एकत्र येऊन दिले जाऊ शकतात, असा पर्याय शैक्षणिक धोरणातून सुचवण्यात आला आहे.नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. 'सर्व शालेय विद्यार्थ्यांची ठराविक कालावधीतून आरोग्य तपासणी करण्यात यावी. त्याची नोंद असणारं आरोग्यपत्र देण्यात यावं,' अशी सूचना धोरणात करण्यात आली आहे. मुलाचं वय ५ वर्ष होण्यापूर्वी त्यांना बालवाटिकेत पाठवण्यात यावं, असा सल्ला देण्यात आला आहे.