शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Nawab Malik: ७ दिवसांत नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश; लवकरच अटक होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 22:27 IST

ज्ञानदेव वानखेडे यांनी अलीकडेच मलिकांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. तर समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे धाव घेतली होती.

दिल्ली – NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वादाचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर आता आयोगानं महाराष्ट्र पोलिसांना पुढील ७ दिवसांत कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

समीर वानखेडे यांनी आयोगासमोर म्हटलं होतं की, नवाब मलिकांनी त्यांच्यावर मानसिक अत्याचार केलेत. वानखेडे यापूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये होते. तेव्हा मलिकांच्या जावायाला ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. जावई जेलमधून बाहेर आल्यानंतर मलिक यांनी वानखेडेंच्या जाती आणि धर्माबद्दल प्रश्न विचारत संशयाचं वातावरण तयार केले. समीर वानखेडे मुस्लीम आहेत असं मलिकांचा आरोप होता. वानखेडेंनी बनावट महार जातीचं प्रमाणपत्र बनवलं. त्याच आधारे त्यांना नोकरी बळकावली असं मलिकांनी म्हटलं होतं.

मलिकांच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र जात पडताळणी कमिटीनं तपास सुरु केला. तेव्हा वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे धाव घेत मलिकांविरोधात तक्रार दाखल केली होती. मलिक यांनी पत्रकार परिषद, सोशल मीडिया यावरुन वानखेडे कुटुंबीयांविरोधात छळ केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी वानखेडेंनी केली होती. मलिकांच्या जावायाला अटक केल्यामुळेच त्यांना अशाप्रकारे खोटे आरोप केले असा दावाही वानखेडेंनी केला होता.

ज्ञानदेव वानखेडेंचीही उच्च न्यायालयात धाव

ज्ञानदेव वानखेडे यांनी अलीकडेच मलिकांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. नवाब मलिक यांनी हायकोर्टात सांगितले होते की, वानखेडे यांच्याविरोधात ते कुठलेही आक्षेपार्ह वक्तव्य करणार नाहीत. तसेच, मुंबई उच्च न्यायालयात नवाब मलिक यांनी बिनशर्त माफीही मागितली होती. पण जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला नवाब मलिक यांनी वानखेडे कुटुंबियांच्या विरोधात काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप ज्ञानदेव वानखेडे यांनी केला आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप करत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबई पोलीस नवाब मलिकांना अटक करणार का याकडे सर्वाचं लक्ष – मोहित कंबोज

समीर वानखेडे प्रकरणी दिल्लीच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं मलिकांविरोधात ७ दिवसांत FIR दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. एट्रोसिटी प्रकरणी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता मुंबई पोलीस कधी मंत्री नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करणार? आणि हा अदखलपात्र गुन्हा असल्याने त्यांना अटक करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारतीय संविधानाचा विजय झाला आहे अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली आहे.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडेMumbai policeमुंबई पोलीस