शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

Nawab Malik: ७ दिवसांत नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश; लवकरच अटक होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 22:27 IST

ज्ञानदेव वानखेडे यांनी अलीकडेच मलिकांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. तर समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे धाव घेतली होती.

दिल्ली – NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वादाचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. समीर वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर आता आयोगानं महाराष्ट्र पोलिसांना पुढील ७ दिवसांत कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

समीर वानखेडे यांनी आयोगासमोर म्हटलं होतं की, नवाब मलिकांनी त्यांच्यावर मानसिक अत्याचार केलेत. वानखेडे यापूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोमध्ये होते. तेव्हा मलिकांच्या जावायाला ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. जावई जेलमधून बाहेर आल्यानंतर मलिक यांनी वानखेडेंच्या जाती आणि धर्माबद्दल प्रश्न विचारत संशयाचं वातावरण तयार केले. समीर वानखेडे मुस्लीम आहेत असं मलिकांचा आरोप होता. वानखेडेंनी बनावट महार जातीचं प्रमाणपत्र बनवलं. त्याच आधारे त्यांना नोकरी बळकावली असं मलिकांनी म्हटलं होतं.

मलिकांच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र जात पडताळणी कमिटीनं तपास सुरु केला. तेव्हा वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे धाव घेत मलिकांविरोधात तक्रार दाखल केली होती. मलिक यांनी पत्रकार परिषद, सोशल मीडिया यावरुन वानखेडे कुटुंबीयांविरोधात छळ केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी वानखेडेंनी केली होती. मलिकांच्या जावायाला अटक केल्यामुळेच त्यांना अशाप्रकारे खोटे आरोप केले असा दावाही वानखेडेंनी केला होता.

ज्ञानदेव वानखेडेंचीही उच्च न्यायालयात धाव

ज्ञानदेव वानखेडे यांनी अलीकडेच मलिकांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. नवाब मलिक यांनी हायकोर्टात सांगितले होते की, वानखेडे यांच्याविरोधात ते कुठलेही आक्षेपार्ह वक्तव्य करणार नाहीत. तसेच, मुंबई उच्च न्यायालयात नवाब मलिक यांनी बिनशर्त माफीही मागितली होती. पण जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला नवाब मलिक यांनी वानखेडे कुटुंबियांच्या विरोधात काही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप ज्ञानदेव वानखेडे यांनी केला आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप करत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मुंबई पोलीस नवाब मलिकांना अटक करणार का याकडे सर्वाचं लक्ष – मोहित कंबोज

समीर वानखेडे प्रकरणी दिल्लीच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानं मलिकांविरोधात ७ दिवसांत FIR दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत. एट्रोसिटी प्रकरणी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता मुंबई पोलीस कधी मंत्री नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करणार? आणि हा अदखलपात्र गुन्हा असल्याने त्यांना अटक करणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारतीय संविधानाचा विजय झाला आहे अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिली आहे.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडेMumbai policeमुंबई पोलीस