शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

चित्रपटगृहांत राष्ट्रगीताची सक्ती नाही, मात्र लावल्यास प्रेक्षकांना उभे राहावेच लागेल, सुप्रीम कोर्टाचा सुधारित आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 06:27 IST

चित्रपटगृहांना प्रत्येक शोच्या सुरुवातीस राष्ट्रगीत वाजविण्याची सक्ती करणारा गेल्या वर्षी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी शिथिल केला. यापुढे चित्रपटगृहांनी राष्ट्रगीत वाजविणे सक्तीचे नसेल. मात्र राष्ट्रगीत वाजविले गेल्यास प्रेक्षकांनी उभे राहून त्याचा आदर करणे बंधनकारक असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

नवी दिल्ली : चित्रपटगृहांना प्रत्येक शोच्या सुरुवातीस राष्ट्रगीत वाजविण्याची सक्ती करणारा गेल्या वर्षी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी शिथिल केला. यापुढे चित्रपटगृहांनी राष्ट्रगीत वाजविणे सक्तीचे नसेल. मात्र राष्ट्रगीत वाजविले गेल्यास प्रेक्षकांनी उभे राहून त्याचा आदर करणे बंधनकारक असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.चित्रपटगृहात राष्ट्रगीताच्या वेळी दिव्यांगांना उभे न राहण्याची दिलेली मुभा यापुढेही लागू राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मध्य प्रदेशातील एस. एन. चोकसी यांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने ३० नोव्हेंबर २0१६ रोजी चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजविण्याचा व त्या वेळी सर्व प्रेक्षकांनी उभे राहण्याची सक्ती करणारा आदेश दिला. आताचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा हे आदेश देणाºया खंडपीठावर होते. त्या वेळी केंद्र सरकारने त्याचे जोरदार समर्र्थन केले होते.मात्र हा आदेश मागे घेण्याच्या मागणीची केरळमधील याचिकासुनावणीस आली, तेव्हा न्या. मिस्रा सरन्यायाधीश होते. खंडपीठावर त्यांच्यासह असलेले न्या. धनंजय चंद्रचूड यांनी न्यायालयाने असा आदेश देण्यास आक्षेप नोंदविला होता.केंद्र सरकारने केले घूमजावकेंद्र सरकारनेही घूमजाव केले. राष्ट्रगीत कुठे, केव्हा व कसे वाजविले जावे आणि त्या वेळी त्याचा आदर कसा केला जावा याची सुधारित नियमावली तयार करण्यासाठी विविध मंत्रालयांच्या प्रतिनिधींची १२ सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती सहा महिन्यांत अहवाल देईल व त्यानंतर नवे नियम तयार होतील. तोपर्यंत न्यायालयाने सक्तीचा आदेश मागे घ्यावा, अशी विनंती केंद्र सरकारने केली.न्यायाधीशांमध्येच मतभेद झाल्याने आदेशातून बाहेर पडण्याची संधी व योग्य पृष्ठभूमी मिळताच सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने वरीलप्रमाणे सुधारित आदेश देऊन सर्व याचिका निकाली काढल्या. याचिकाकर्त्यांनी त्यांचे म्हणणे समितीपुढे मांडावे, असेही न्यायालयाने सांगितले.राष्ट्रगीत व त्याचा आदर हे सरकारच्या अखत्यारीतील विषय आहेत. त्यात न्यायालयाने नाक खुपसू नये, असे न्या. चंद्रचूड यांचे म्हणणे होते. त्यानंतर सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने सक्तीच्या आदेशात सुधारणा करण्यास अनुकूलता दर्शविली.

टॅग्स :National Anthemराष्ट्रगीतCourtन्यायालय