शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

देश आर्थिक संकटाकडे लोटला जात असताना भाजपा फक्त विरोधकांवर टीका करण्यात मग्न: ममता बॅनर्जी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 18:22 IST

देश आर्थिक संकटात लोटला जात असताना केंद्र सरकार मात्र विरोधी पक्षांचं ज्या राज्यात सरकार आहे त्यांच्यावर टीका करण्यात व्यग्र आहे, असा हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केला आहे.

कोलकाता-

देश आर्थिक संकटात लोटला जात असताना केंद्र सरकार मात्र विरोधी पक्षांचं ज्या राज्यात सरकार आहे त्यांच्यावर टीका करण्यात व्यग्र आहे, असा हल्लाबोल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केला आहे. मोदी सरकारचं लक्ष फक्त विरोधी पक्षाच्या सरकारांवर आहे. त्यांच्याकडून सीबीआय किंवा इतर केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून भाजपा विरोधी राज्यांमध्ये सरकार चालवलं जात आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी यावेळी केला. 

"देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. श्रीलंकेत काय घडतंय ते आपण पाहातच आहोत. भारताची आर्थिक परिस्थिती काही फारशी चांगली नाही. मी काही श्रीलंकेशी तुलना करत नाही. पण आपल्याकडे काहीच प्लानिंग दिसून येत नाही. पेट्रोलच्या दरात गेल्या पंधरा दिवसात तब्बल ११ वेळा वाढ झाली आहे. तर डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती लक्षणीयरित्या वाढत आहेत. पीएफवरील व्याजदरातही मोठी कपात झाली आहे", असं बॅनर्जी म्हणाल्या. 

'केंद्रानं ईडी, सीबीआयपेक्षा पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर लक्ष द्यावं'विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये ईडी आणि सीबीआयचा कसा वापर करता येईल यावर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा केंद्र सरकारनं इंधन दरवाढ कशी रोखता येईल त्याकडे लक्ष द्यावं, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. महागाई हा सर्वसमावेशक मुद्दा असून केंद्रानं तातडीनं या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलवून माहिती जाणून घ्यावी आणि सरकार त्यावर काय काम करत आहे त्याची माहिती द्यावी, असं आवाहनही बॅनर्जी यांनी केलं आहे. 

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी