शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : रालोआला गूडबाय केलेले मित्र निष्प्रभ; नव्या मित्रपक्षांनी भरून काढला बॅकलॉग

By प्रेमदास राठोड | Updated: May 24, 2019 05:54 IST

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहून गेली सार्वत्रिक निवडणूक लढविलेल्या काही मित्रपक्षांनी नंतर रालोआला गूडबाय केला.

- प्रेमदास राठोडराष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहून गेली सार्वत्रिक निवडणूक लढविलेल्या काही मित्रपक्षांनी नंतर रालोआला गूडबाय केला. पण ते मित्रपक्ष या निवडणुकीत निष्प्रभ ठरले. गेल्यावेळी रालोआने ३३६ जागा जिंकल्या होत्या, त्यात भाजपाचा २८२ जागांचा वाटा होता. यावेळी भाजपाने स्वत:च्या जागा तर ३०० पार केल्या, शिवाय रालोआचे संख्याबळ ३५० वर नेऊन पोहोचविले. तेलगू देसमने गेल्यावेळी आंध्र प्रदेशात ३० उमेदवार उतरवून १६ जागा जिंकल्या होत्या. त्याचा बॅकलॉग यावेळी बिहारात अवघ्या १७ जागा लढविलेल्या जेडीयूने १६ जागा जिंकून भरून काढला. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील २४ घटकपक्ष मैदानात उतरले होते. यावेळी २१ घटक पक्षांनी निवडणूक लढविली. यावेळी सामील झालेल्या नवीन १२ घटक पक्षाचा फायदा मिळाला.राओलाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपाने गेल्यावेळी ४२७ जागा लढवून २८२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ४३७ जागा लढवून स्वत:चे संख्याबळ तीनशेवर नेले. भाजपा व तेलगू देसमनंतर राओलातील सर्वांत मोठा घटकपक्ष शिवसेनेने महाराष्ट्रात गेल्यावेळी २० पैकी १८ जागा जिंकल्या होत्या, यावेळी २३ जागा लढवूनही संख्याबळ मात्र जुनेच कायम राखले. भाजपाने महाराष्ट्रातील २३ हे जुने संख्याबळ कायम राखले आहे. गेल्यावेळी रालोआत राहून ३० लढविलेल्या तेलगू देसमने १६ जागा जिंकल्या होत्या. राओलाबाहेर पडल्यावर तेलगू देसमला यावेळी आंध्रात फक्त ३ जागांवर समाधान मानावे लागले. तेथे वायएसआर काँग्रेसने तेलगू देसमचा पार सुपडासाफ केला आहे. भाजपाला गेल्यावेळी एकसंघ आंध्र प्रदेशात ३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी एकट्या तेलंगणातच भाजपा ४ जागा जिंकताना दिसत आहे. महाराष्ट्रात रालोआतून बाहेर पडलेल्या स्वाभिमानी पक्षाला त्याची एकमेव जागाही यावेळी राखता आली नाही. याशिवाय राष्ट्रीय लोकसमता पार्टी (३), नागा पीपल्स फ्रंट (१), नॅशनल पीपल्स पार्टी (१), स्वाभिमानी पक्ष (१) यांनीही गेल्यावेळी राओलाच्या यशात खारीचा वाटा उचलला होता. आघाडीतून बाहेर पडल्यावर त्यांचा यावेळी टिकाव लागू शकला नाही.लोक जनशक्ती पार्टी, शिरोमणी अकाली दल, अपना दल (सोनेलाल), एन.आर. काँग्रेस, पीएमके, डीएमडीके आणि पीएनके यावेळीही रालोआसोबत होते. शिरोमणी अकाली दलाने गेल्यावेळी पंजाबातून ४ जागा रालोआच्या झोळीत टाकल्या होत्या. यावेळी १० जागा लढलेल्या शिरोमणी अकाली दलाला फक्त दोनच जागांवर यश मिळताना दिसत आहे. बिहारात जेडीयूला सोबत घेणे रालोआला लाभदायक ठरले. आसामात आसाम गण परिषदेशी दोस्ती भाजपाला फायद्याची ठरली. भाजपाने येथील स्वत:चे संख्याबळ ७ वरून ९ वर पोहोचवले आहे. मात्र, अण्णाद्रमुकला रालोआत घेऊन तामीळनाडूत २० जागा सोडणे तेवढे फायदेशीर ठरले नाही. कारण रालोआच्या संख्याबळात हा घटकपक्ष जेमतेम एक-दोन जागांची भर घालताना दिसत आहे. दुरावलेले मित्रपक्ष रालोआचा खेळ बिघडवण्याऐवजी स्वत:चाच खेळ बिघडवून बसले, असे रालोआच्या या निवडणुकीतील एकूण कामगिरीवरून दिसते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Andhra Pradesh Lok Sabha Election 2019आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक 2019Assam Lok Sabha Election 2019 आसाम लोकसभा निवडणूक 2019