शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : रालोआला गूडबाय केलेले मित्र निष्प्रभ; नव्या मित्रपक्षांनी भरून काढला बॅकलॉग

By प्रेमदास राठोड | Updated: May 24, 2019 05:54 IST

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहून गेली सार्वत्रिक निवडणूक लढविलेल्या काही मित्रपक्षांनी नंतर रालोआला गूडबाय केला.

- प्रेमदास राठोडराष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहून गेली सार्वत्रिक निवडणूक लढविलेल्या काही मित्रपक्षांनी नंतर रालोआला गूडबाय केला. पण ते मित्रपक्ष या निवडणुकीत निष्प्रभ ठरले. गेल्यावेळी रालोआने ३३६ जागा जिंकल्या होत्या, त्यात भाजपाचा २८२ जागांचा वाटा होता. यावेळी भाजपाने स्वत:च्या जागा तर ३०० पार केल्या, शिवाय रालोआचे संख्याबळ ३५० वर नेऊन पोहोचविले. तेलगू देसमने गेल्यावेळी आंध्र प्रदेशात ३० उमेदवार उतरवून १६ जागा जिंकल्या होत्या. त्याचा बॅकलॉग यावेळी बिहारात अवघ्या १७ जागा लढविलेल्या जेडीयूने १६ जागा जिंकून भरून काढला. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील २४ घटकपक्ष मैदानात उतरले होते. यावेळी २१ घटक पक्षांनी निवडणूक लढविली. यावेळी सामील झालेल्या नवीन १२ घटक पक्षाचा फायदा मिळाला.राओलाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपाने गेल्यावेळी ४२७ जागा लढवून २८२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ४३७ जागा लढवून स्वत:चे संख्याबळ तीनशेवर नेले. भाजपा व तेलगू देसमनंतर राओलातील सर्वांत मोठा घटकपक्ष शिवसेनेने महाराष्ट्रात गेल्यावेळी २० पैकी १८ जागा जिंकल्या होत्या, यावेळी २३ जागा लढवूनही संख्याबळ मात्र जुनेच कायम राखले. भाजपाने महाराष्ट्रातील २३ हे जुने संख्याबळ कायम राखले आहे. गेल्यावेळी रालोआत राहून ३० लढविलेल्या तेलगू देसमने १६ जागा जिंकल्या होत्या. राओलाबाहेर पडल्यावर तेलगू देसमला यावेळी आंध्रात फक्त ३ जागांवर समाधान मानावे लागले. तेथे वायएसआर काँग्रेसने तेलगू देसमचा पार सुपडासाफ केला आहे. भाजपाला गेल्यावेळी एकसंघ आंध्र प्रदेशात ३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी एकट्या तेलंगणातच भाजपा ४ जागा जिंकताना दिसत आहे. महाराष्ट्रात रालोआतून बाहेर पडलेल्या स्वाभिमानी पक्षाला त्याची एकमेव जागाही यावेळी राखता आली नाही. याशिवाय राष्ट्रीय लोकसमता पार्टी (३), नागा पीपल्स फ्रंट (१), नॅशनल पीपल्स पार्टी (१), स्वाभिमानी पक्ष (१) यांनीही गेल्यावेळी राओलाच्या यशात खारीचा वाटा उचलला होता. आघाडीतून बाहेर पडल्यावर त्यांचा यावेळी टिकाव लागू शकला नाही.लोक जनशक्ती पार्टी, शिरोमणी अकाली दल, अपना दल (सोनेलाल), एन.आर. काँग्रेस, पीएमके, डीएमडीके आणि पीएनके यावेळीही रालोआसोबत होते. शिरोमणी अकाली दलाने गेल्यावेळी पंजाबातून ४ जागा रालोआच्या झोळीत टाकल्या होत्या. यावेळी १० जागा लढलेल्या शिरोमणी अकाली दलाला फक्त दोनच जागांवर यश मिळताना दिसत आहे. बिहारात जेडीयूला सोबत घेणे रालोआला लाभदायक ठरले. आसामात आसाम गण परिषदेशी दोस्ती भाजपाला फायद्याची ठरली. भाजपाने येथील स्वत:चे संख्याबळ ७ वरून ९ वर पोहोचवले आहे. मात्र, अण्णाद्रमुकला रालोआत घेऊन तामीळनाडूत २० जागा सोडणे तेवढे फायदेशीर ठरले नाही. कारण रालोआच्या संख्याबळात हा घटकपक्ष जेमतेम एक-दोन जागांची भर घालताना दिसत आहे. दुरावलेले मित्रपक्ष रालोआचा खेळ बिघडवण्याऐवजी स्वत:चाच खेळ बिघडवून बसले, असे रालोआच्या या निवडणुकीतील एकूण कामगिरीवरून दिसते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Andhra Pradesh Lok Sabha Election 2019आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक 2019Assam Lok Sabha Election 2019 आसाम लोकसभा निवडणूक 2019