शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : रालोआला गूडबाय केलेले मित्र निष्प्रभ; नव्या मित्रपक्षांनी भरून काढला बॅकलॉग

By प्रेमदास राठोड | Updated: May 24, 2019 05:54 IST

राष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहून गेली सार्वत्रिक निवडणूक लढविलेल्या काही मित्रपक्षांनी नंतर रालोआला गूडबाय केला.

- प्रेमदास राठोडराष्ट्रीय लोकशाही आघाडीत राहून गेली सार्वत्रिक निवडणूक लढविलेल्या काही मित्रपक्षांनी नंतर रालोआला गूडबाय केला. पण ते मित्रपक्ष या निवडणुकीत निष्प्रभ ठरले. गेल्यावेळी रालोआने ३३६ जागा जिंकल्या होत्या, त्यात भाजपाचा २८२ जागांचा वाटा होता. यावेळी भाजपाने स्वत:च्या जागा तर ३०० पार केल्या, शिवाय रालोआचे संख्याबळ ३५० वर नेऊन पोहोचविले. तेलगू देसमने गेल्यावेळी आंध्र प्रदेशात ३० उमेदवार उतरवून १६ जागा जिंकल्या होत्या. त्याचा बॅकलॉग यावेळी बिहारात अवघ्या १७ जागा लढविलेल्या जेडीयूने १६ जागा जिंकून भरून काढला. २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील २४ घटकपक्ष मैदानात उतरले होते. यावेळी २१ घटक पक्षांनी निवडणूक लढविली. यावेळी सामील झालेल्या नवीन १२ घटक पक्षाचा फायदा मिळाला.राओलाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपाने गेल्यावेळी ४२७ जागा लढवून २८२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ४३७ जागा लढवून स्वत:चे संख्याबळ तीनशेवर नेले. भाजपा व तेलगू देसमनंतर राओलातील सर्वांत मोठा घटकपक्ष शिवसेनेने महाराष्ट्रात गेल्यावेळी २० पैकी १८ जागा जिंकल्या होत्या, यावेळी २३ जागा लढवूनही संख्याबळ मात्र जुनेच कायम राखले. भाजपाने महाराष्ट्रातील २३ हे जुने संख्याबळ कायम राखले आहे. गेल्यावेळी रालोआत राहून ३० लढविलेल्या तेलगू देसमने १६ जागा जिंकल्या होत्या. राओलाबाहेर पडल्यावर तेलगू देसमला यावेळी आंध्रात फक्त ३ जागांवर समाधान मानावे लागले. तेथे वायएसआर काँग्रेसने तेलगू देसमचा पार सुपडासाफ केला आहे. भाजपाला गेल्यावेळी एकसंघ आंध्र प्रदेशात ३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी एकट्या तेलंगणातच भाजपा ४ जागा जिंकताना दिसत आहे. महाराष्ट्रात रालोआतून बाहेर पडलेल्या स्वाभिमानी पक्षाला त्याची एकमेव जागाही यावेळी राखता आली नाही. याशिवाय राष्ट्रीय लोकसमता पार्टी (३), नागा पीपल्स फ्रंट (१), नॅशनल पीपल्स पार्टी (१), स्वाभिमानी पक्ष (१) यांनीही गेल्यावेळी राओलाच्या यशात खारीचा वाटा उचलला होता. आघाडीतून बाहेर पडल्यावर त्यांचा यावेळी टिकाव लागू शकला नाही.लोक जनशक्ती पार्टी, शिरोमणी अकाली दल, अपना दल (सोनेलाल), एन.आर. काँग्रेस, पीएमके, डीएमडीके आणि पीएनके यावेळीही रालोआसोबत होते. शिरोमणी अकाली दलाने गेल्यावेळी पंजाबातून ४ जागा रालोआच्या झोळीत टाकल्या होत्या. यावेळी १० जागा लढलेल्या शिरोमणी अकाली दलाला फक्त दोनच जागांवर यश मिळताना दिसत आहे. बिहारात जेडीयूला सोबत घेणे रालोआला लाभदायक ठरले. आसामात आसाम गण परिषदेशी दोस्ती भाजपाला फायद्याची ठरली. भाजपाने येथील स्वत:चे संख्याबळ ७ वरून ९ वर पोहोचवले आहे. मात्र, अण्णाद्रमुकला रालोआत घेऊन तामीळनाडूत २० जागा सोडणे तेवढे फायदेशीर ठरले नाही. कारण रालोआच्या संख्याबळात हा घटकपक्ष जेमतेम एक-दोन जागांची भर घालताना दिसत आहे. दुरावलेले मित्रपक्ष रालोआचा खेळ बिघडवण्याऐवजी स्वत:चाच खेळ बिघडवून बसले, असे रालोआच्या या निवडणुकीतील एकूण कामगिरीवरून दिसते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Andhra Pradesh Lok Sabha Election 2019आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक 2019Assam Lok Sabha Election 2019 आसाम लोकसभा निवडणूक 2019