नरखेड... जोड
By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST
त्या अनुषंगाने तलाठ्यांनी कुठलीही माहिती दिली नव्हती. माहिती अधिकारात माहिती मिळाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पेरणीही केली नव्हती परंतु त्यांना लाभ मिळाल्याचे उघड झाले. संत्रा बागा व विहीर नसलेल्यांना १०० टक्के नुकसानभरपाई देण्यात आली. तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर चौकशी नेमून अहवाल सादर करण्यात आला. त्या चौकशी समितीने संत्रा झाडे नसताना लाभ मिळाल्याचे निष्पन्न झाले. या अहवालानंतर तलाठी के. के. कोरे यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई झाली नाही.
नरखेड... जोड
त्या अनुषंगाने तलाठ्यांनी कुठलीही माहिती दिली नव्हती. माहिती अधिकारात माहिती मिळाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पेरणीही केली नव्हती परंतु त्यांना लाभ मिळाल्याचे उघड झाले. संत्रा बागा व विहीर नसलेल्यांना १०० टक्के नुकसानभरपाई देण्यात आली. तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर चौकशी नेमून अहवाल सादर करण्यात आला. त्या चौकशी समितीने संत्रा झाडे नसताना लाभ मिळाल्याचे निष्पन्न झाले. या अहवालानंतर तलाठी के. के. कोरे यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई झाली नाही.तसेच घरांची पडझड झालेल्यांना पक्क्या घरांना अनुदान वाटप करून शेतकरी व गरीब नागरिकांचे अधिकाऱ्यांनी दिवाळे काढले. या अनुदान वाटपाचा लाभ ग्रामपंचायत सदस्य, कोतवाल यांनी लाटल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अशा प्रकारचा घोळ तालुक्यात झाला असून याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच पोलिसांत दाखल केलेल्या खोट्या तक्रारी मागे घेण्यात याव्यात, दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)