शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

नरखेड.. महासभा

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

समाजाचे ऋण फेडावे

समाजाचे ऋण फेडावे
पालकमंत्री बावनकुळे : नरखेड येथे प्रांतिक तेली समाज महासभा
नरखेड : समाजाने आपणास काय दिले, ही विचारधारा बाळगण्यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो, ही भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे. सोबतच समाजात विभाजित न राहता संघटित राहणे हितकारक आहे. संघटन शक्तीच्या भरवशावर संघर्ष करणे सहज शक्य होते. समाजात जन्म घेतला आहे, तर त्याचे ऋणही फेडावे, असे विचार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
स्थानिक सावता सभागृहात आयोजित महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तेली समाजाचे अध्यक्ष खा. रामदास तडस होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. आशिष देशमुख, जि. प. उपाध्यक्ष शरद डोणेकर, शिक्षण सभापती उकेश चौहान, डॉ. राजीव पोतदार, कृष्णराव हिंगणकर, रमेश गिरडे, शेखर सावरबांधे, रामूजी वानखेडे, रवींद्र येनुरकर, बळवंत मोरघडे, श्याम लोहबरे, दिनेश टुले, ईश्वर वाडबुधे, नगराध्यक्ष हेमलता टेकाडे, रमेश कोरडे, संजय चरडे, अनिल कोरडे, मनोज कोरडे, प्रशांत खुरसंगे, सोनम कळंभे, पद्मा गिरडकर, वैशाली गुरमुळे, प्रवीण बालपांडे, पंजाब माळोदे, सतिश रेवतकर, अनिल साठोणे आदी उपस्थित होते.
प्रसंगी खा. रामदास तडस म्हणाले, तेली समाज संघटनेचा दबावगट निर्माण झाला पाहिजे. समाजाचे ६० खासदार प्रथमच संसदेत पोहोचले. समाजाला विसरू नका, नाहीतर समाज तुम्हाला विसरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, अभियंते, वकील, लोकप्रतिनिधी, शिक्षक व उच्च पदावरील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक शहराध्यक्ष श्रीराम भुते यांनी केले. संचालन मीनाक्षी सरोदे यांनी तर आभार सुलोचना क्षीरसागर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)