शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

"शरद पवारांसारखे अनुभवी नेते चुकीच्या पद्धतीने तथ्य मांडत आहेत": नरेंद्र सिंह तोमर

By देवेश फडके | Updated: January 31, 2021 19:51 IST

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवरून महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

ठळक मुद्देशरद पवार भूमिका बदलतील - नरेंद्र सिंह तोमरकृषी कायद्यांचा बाजार समित्यांवर परिणाम नाही - नरेंद्र सिंह तोमरशरद पवार अनुभवी राजकारणी आहेत - नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली : केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवरून महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. शरद पवार एक अनुभवी राजकारणी आहेत आणि माजी केंद्रीय कृषीमंत्रीही आहेत. शेतीशी निगडीत मुद्दे आणि निराकरण याची शरद पवार यांना उत्तम माहिती आहे, असे नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.

शरद पवार यापूर्वी कृषी कायद्याचे समर्थक होते. त्यासाठी त्यांनी खूप मेहनतही घेतली होती. मात्र, आता शरद पवार ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहेत, ते पाहून मला आश्चर्य वाटत आहे. सर्व काही माहिती असूनही शरद पवारांसारखे अनुभवी नेते शेतकऱ्यांसमोर चुकीच्या पद्धतीने तथ्य मांडत आहेत, असा दावा नरेंद्र सिंह तोमर यांनी केला.

शरद पवार भूमिका बदलतील

शरद पवार यांच्याकडे आता योग्य माहिती आली आहे. त्यामुळे ते यापुढे आपली भूमिका बदलतील आणि देशातील शेतकऱ्यांना कृषी कायद्याचे फायदे आणि लाभ सांगतील, असा मला विश्वास आहे, असेही तोमर यांनी म्हटले आहे. 

"सोनार बांगलासाठी आम्हाला केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार हवे"; राजीव बॅनर्जी  

कृषी कायद्यांचा बाजार समित्यांवर परिणाम नाही

नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपला माल कोणालाही आणि कुठेही विकण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. आपल्या राज्याबाहेर शेतकऱ्यांना माल विकता येणार असून, त्याची त्यांना चांगली किंमतही मिळेल. सध्याच्या किमान आधारभूत किंमत व्यवस्थेवर याचा परिणाम होणार नाही. नवीन कृषी कायद्यांमुळे बाजार समित्यांवरही परिणाम होणार नाही. याउलट, अधिक स्पर्धा निर्माण होईल तसेच सेवा आणि पायाभूत सुविधा निर्माण होतील. यामुळे दोन्हीही व्यवस्था कायम राहतील, असेही तोमर यांनी सांगितले. 

दरम्यान, केंद्रीय कृषी कायद्यांवर शरद पवार यांनी शनिवारी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बाजार समित्या यांची व्यवस्था नवीन कृषी कायद्यांमुळे कमकुवत होईल, असा दावा शरद पवार यांनी केला. आमच्या कार्यकाळात विशेष बाजार समित्या स्थापन करण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला होता, जेणेकरून शेतकरी आपले उत्पादन आणि तयार शेतमाल विकण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळू शकेल आणि शेतकरी हितासाठी आताची बाजार प्रणाली मजबूत करण्यासाठी आमच्याकडून सावधगिरी बाळगण्यात आली, असेही शरद पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसagricultureशेती