शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"शरद पवारांसारखे अनुभवी नेते चुकीच्या पद्धतीने तथ्य मांडत आहेत": नरेंद्र सिंह तोमर

By देवेश फडके | Updated: January 31, 2021 19:51 IST

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवरून महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.

ठळक मुद्देशरद पवार भूमिका बदलतील - नरेंद्र सिंह तोमरकृषी कायद्यांचा बाजार समित्यांवर परिणाम नाही - नरेंद्र सिंह तोमरशरद पवार अनुभवी राजकारणी आहेत - नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली : केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेवरून महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. शरद पवार एक अनुभवी राजकारणी आहेत आणि माजी केंद्रीय कृषीमंत्रीही आहेत. शेतीशी निगडीत मुद्दे आणि निराकरण याची शरद पवार यांना उत्तम माहिती आहे, असे नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.

शरद पवार यापूर्वी कृषी कायद्याचे समर्थक होते. त्यासाठी त्यांनी खूप मेहनतही घेतली होती. मात्र, आता शरद पवार ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहेत, ते पाहून मला आश्चर्य वाटत आहे. सर्व काही माहिती असूनही शरद पवारांसारखे अनुभवी नेते शेतकऱ्यांसमोर चुकीच्या पद्धतीने तथ्य मांडत आहेत, असा दावा नरेंद्र सिंह तोमर यांनी केला.

शरद पवार भूमिका बदलतील

शरद पवार यांच्याकडे आता योग्य माहिती आली आहे. त्यामुळे ते यापुढे आपली भूमिका बदलतील आणि देशातील शेतकऱ्यांना कृषी कायद्याचे फायदे आणि लाभ सांगतील, असा मला विश्वास आहे, असेही तोमर यांनी म्हटले आहे. 

"सोनार बांगलासाठी आम्हाला केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार हवे"; राजीव बॅनर्जी  

कृषी कायद्यांचा बाजार समित्यांवर परिणाम नाही

नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपला माल कोणालाही आणि कुठेही विकण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील. आपल्या राज्याबाहेर शेतकऱ्यांना माल विकता येणार असून, त्याची त्यांना चांगली किंमतही मिळेल. सध्याच्या किमान आधारभूत किंमत व्यवस्थेवर याचा परिणाम होणार नाही. नवीन कृषी कायद्यांमुळे बाजार समित्यांवरही परिणाम होणार नाही. याउलट, अधिक स्पर्धा निर्माण होईल तसेच सेवा आणि पायाभूत सुविधा निर्माण होतील. यामुळे दोन्हीही व्यवस्था कायम राहतील, असेही तोमर यांनी सांगितले. 

दरम्यान, केंद्रीय कृषी कायद्यांवर शरद पवार यांनी शनिवारी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बाजार समित्या यांची व्यवस्था नवीन कृषी कायद्यांमुळे कमकुवत होईल, असा दावा शरद पवार यांनी केला. आमच्या कार्यकाळात विशेष बाजार समित्या स्थापन करण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला होता, जेणेकरून शेतकरी आपले उत्पादन आणि तयार शेतमाल विकण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळू शकेल आणि शेतकरी हितासाठी आताची बाजार प्रणाली मजबूत करण्यासाठी आमच्याकडून सावधगिरी बाळगण्यात आली, असेही शरद पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसagricultureशेती