शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2021 अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांच्या सर्व शंका मिटतील: नरेंद्र सिंह तोमर

By देवेश फडके | Updated: February 1, 2021 20:29 IST

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विविध क्षेत्रातून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रियाशेतकरी कल्याणासाठी कटिबद्ध - नरेंद्र सिंह तोमरविरोधकांकडून कृषी कायद्यांविरोधात घोषणाबाजी

नवी दिल्ली : सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (सोमवारी) अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विविध क्षेत्रातून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. राजकीय वर्तुळात हा केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला अर्थसंकल्प आहे, असा सूर विरोधकांनी आळवला. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. (Budget 2021 Latest News)

कृषी कायद्यांवरून शेतकऱ्यांसह ज्यांच्या मनात शंका निर्माण झाली होती. या अर्थसंकल्पामुळे सर्वांच्या मनातील शंका दूर होतील, असा विश्वास नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केला. या अर्थसंकल्पात किमान आधारभूत किंमतीप्रति कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आणि एपीएमसी आणखी सक्षम होण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली आहेत, असे तोमर यांनी सांगितले. 

१६.५ लाख कोटींची कर्जे

अर्थसंकल्पातील तरतुदींनंतर शेतकऱ्यांना १६.५ लाख कोटींचे कर्ज उपलब्ध होईल. एपीएमसी सक्षम होऊ शकेल. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा तयार होतील. पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही तोमर यांनी सांगितले.

शेतकरी कल्याणासाठी कटिबद्ध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नेहमीच कटिबद्ध आहे. मोदी सरकार केवळ अर्थसंकल्पात तरतूद करत नाही. तर ज्या योजनेसाठी तरतूद केली आहे, ती योजना कार्यान्वितही करते, असे तोमर यांनी यावेळी बोलतना नमूद केले. 

 

 

Budget 2021 आता होणार डिजिटल जनगणना; अर्थसंकल्पात ३,७५० कोटींची तरतूद

चर्चा हाच मार्ग, कृषीमंत्री तयार आहेत

शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे चर्चा आहे. केंद्र सरकारने चर्चेचा मार्ग खुला केला आहे. कृषीमंत्री चर्चा करण्यास तयार आहेत, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले. दिल्ली सीमेवर शेतकरी आहेत, आम्ही सर्व जण त्यांची बाजू समजून घेत आहोत. कृषीमंत्री बोलण्यास तयार आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या मनात शंका आहेत, ते चर्चा करू शकतात, असेही निर्मला सीतारामन म्हणाल्या.

विरोधकांकडून कृषी कायद्यांविरोधात घोषणाबाजी

अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत शेतकऱ्यांचा उल्लेख करताच विरोधकांनी गदारोळ केला. सभागृहात सुरू करताच विरोधी पक्षातील खासदारांनी नवीन कृषी कायदे मागे घेण्याची मागणी लावून धरली. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून हजारो शेतकरी दिल्लीच्या विविध सीमेवरील नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत.

 

टॅग्स :budget 2021बजेट 2021Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनCentral Governmentकेंद्र सरकार