शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

पंतप्रधान मोदींचा नवभारताचा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:42 IST

‘‘आज २०१७ साल आहे. आपण २०२२ पर्यंतचे धेय निश्चित करा. मग, ते शिक्षण असो, की ऊर्जा क्षेत्र. मात्र, ठोस कार्यक्रम समोर ठेऊन काम केल्यास नवभारताचे स्वप्न साकार करु शकतो.

पुणे : ‘‘आज २०१७ साल आहे. आपण २०२२ पर्यंतचे धेय निश्चित करा. मग, ते शिक्षण असो, की ऊर्जा क्षेत्र. मात्र, ठोस कार्यक्रम समोर ठेऊन काम केल्यास नवभारताचे स्वप्न साकार करु शकतो. त्यासाठी प्रतिज्ञा घ्या,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी येथे केले.अध्यात्मिक गुरुदादा जे. पी. वासवानी यांच्या ९९व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे वासवानी यांच्याशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांचे आशीर्वाद घेतले. दादाजींच्या येणाºया शतकसंवत्सरी वर्षानिमित्त समाज सेवेसाठी काम करण्याची प्रतिज्ञा करण्याचे आवाहन त्यांनी भक्तांना केले. कॅम्प येथील, साधू वासवानी मिशनच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.मोदी म्हणाले, २०२२ साली देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यासाठी झटलेल्या वीरांचे समाजाप्रति असलेले संकल्प अजूनही पूर्ण झालेले नाहीत. ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. जागतिक हवामान झपाट्याने बदलत असल्याने प्रदूषणाचा विषय गंभीर बनला आहे. त्यासाठी झाडे लावण्याचे धोरणदेखील राबविण्यात येत आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपला परिसरदेखील स्वच्छ असला पाहिजे. रस्ते, बस स्टॉप आणि सार्वजनिक ठिकाणे कामगारांकरवी स्वच्छ ठेवतादेखील येतील. मात्र, त्यात सातत्य राखण्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे.सर्वांप्रति प्रेमभावना ठेवावासवानी यांनी आपल्या संदेशात, सर्वांप्रती प्रेमाची भावना ठेवण्याचे आवाहन केले. तसेच उत्तम आरोग्यासाठी शरीरसंपदा टिकवा, सदृढ मानाला पुस्तकांचे खाद्य पुरवा, असा उपदेश केला.