शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नरेंद्र मोदी गुरूजींची ‘परीक्षा पे चर्चा’; स्वत:च्या क्षमतांना आव्हान द्या, वाढेल तुमचा आत्मविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:26 IST

‘आज मी विद्यार्थी आणि तुम्ही सगळे परीक्षक आहात. तुम्हीच मला १० पैकी गुण द्या. गुण देताना मी पंतप्रधान आहे, हा विचार मनात आणू नका. असे समजा की मी तुमचा मित्र आहे,’ अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी दहावी व बारावीच्या परीक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्यावरील परीक्षेचा ताण हलका करण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली : ‘आज मी विद्यार्थी आणि तुम्ही सगळे परीक्षक आहात. तुम्हीच मला १० पैकी गुण द्या. गुण देताना मी पंतप्रधान आहे, हा विचार मनात आणू नका. असे समजा की मी तुमचा मित्र आहे,’ अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी दहावी व बारावीच्या परीक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांच्यावरील परीक्षेचा ताण हलका करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनीही पंतप्रधानांनी मनमोकळेपणाने प्रश्न विचारले.विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून खास परीक्षा पे चर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना अनेक प्रश्न विचारले. काहींनी शंकाही विचारल्या. या कार्यक्रमाला अनेक पालकही उपस्थित होते. या विद्यार्थ्यांचे मोदी आज गुरूजीच बनले होते. यावेळी मोदी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी येणारा तणाव कसा घालवायचा आणि आत्मविश्वास कसा वाढवावा याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आपण अनेकदा प्रामाणिकपणे तयारी करतो, परंतु आत्मविश्वास नसेल तर तुम्ही अखेरच्या क्षणी काही गोष्टी विसरू शकता. कठोर मेहनतीसोबत आपण सतत स्वत:च्या क्षमतांना आव्हान द्यायला हवे. त्यातूनच आत्मविश्वास वाढेल. आपण सतत कामगिरी आणखी चांगली कशी करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.विद्यार्थ्यानेच घेतली पंतप्रधानांची फिरकी!दिल्लीच्या अकरावीत शिकणाºया गिरीश सिंहच्या एका प्रश्नाने पंतप्रधानांची फिरकी घेतली. गिरीशने विचारले की, सर, पुढच्या वर्षी आपण दोघांचीही परीक्षा आहे. माझी बारावीची परीक्षा आहे आणि तुमच्यासाठी लोकसभा निवडणुकीची. मग तुम्ही या परीक्षेसाठी तयार आहात का, तुम्ही यामुळे अस्वस्थ आहात का? गिरीशचा हा प्रश्न ऐकताच हास्यकल्लोळ उडाला. यावर मोदी यांनी गंमतीने गिरीशला थेट पत्रकार बनण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, तू ज्या पद्धतीने प्रश्न विचारला तसा केवळ पत्रकारच विचारु शकतात!अनेक लोकांना असे वाटते एकाग्रता हा गुण प्रयत्नपूर्वक शिकावा लागतो. परंतु लक्षात घ्या आपल्यातील प्रत्येक जण दिवसभरात काही ना काही कामे अगदी मन लावून करीत असतो. आत्मविश्वास विकत मिळत नाही. तो स्वत:हून मिळवावा लागतो.- पंतप्रधान मोदी

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी