शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

पुढील ४-५ वर्षात नरेंद्र मोदींचं 'बिग ड्रीम' पूर्ण होणार; IMF नं दिली Good News

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 11:34 IST

भारताच्या या प्रगतशील ध्येयाचे केवळ आयएमएफच नव्हे तर जगातील अनेक संस्था कौतुक करत आहेत.

नवी दिल्ली – भारतात झालेल्या २ दिवसीय G20 शिखर संमेलनाची यशस्वी सांगता झाली. परदेशी नेते भारताचा पाहुणचार पाहून खुश झाले. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनत आहे. ही बाब आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(IMF) पासून वर्ल्ड बँकसह अनेक जागतिक संस्थांनी मान्य केले आहे. जी-२० मध्ये भारताने मांडलेल्या प्रस्तावाला एका पाठोपाठ एका सदस्य देशांनी होकार दिला. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ड्रीमवरही संमेलनात शिक्कामोर्तब करण्यात आले.

२०४७ पर्यंत भारत बनेल विकसित देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन इकोनॉमीबाबत स्वप्न पाहिले आहे. ज्याचा उल्लेख ते स्वत: आणि त्यांचे सहकारी मंत्री अनेकदा करतात. २०४७ पर्यंत भारताला जगातील विकसित देशांच्या यादीत पोहचवायचे आहे. त्याचसोबत पुढील ५-६ वर्षात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताला समोर आणायचे आहे. सध्या अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. जागतिक संस्थांनीही पंतप्रधान मोदींच्या या स्वप्नावर सकारात्मक उत्तर दिले आहे.

G-20 देशात सहभागी होण्यासाठी आलेल्या देशातील IMF च्या डिप्टी मॅनेजिंग डायरेक्टर भारतीय मूळ गीता गोपीनाथ यांनी म्हटलंय की, ग्लोबल ग्रोथ इंजिनच्या रुपात भारताची भूमिका नाकारली जाऊ शकत नाही. २०२७-२८ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते. पुढील काळात भारताचे ग्लोबल डेवलपमेंट महत्त्वाची भूमिका निभावेल. जागतिक विकासात भारताचे योगदान १५ टक्क्यांपर्यंत पोहचेल. परंतु हे ध्येय गाठण्यासाठी त्यांना लेबर मार्केटमध्ये सुधारणा, उद्योग करण्यासाठी सुलभता, शैक्षणिक गुणवत्ता, महिला सशक्तीकरण यावर विशेष जोर द्यावा लागेल असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत भारताबाबत जे आकडे समोर येत आहेत त्यावर त्यांच्या विश्वासार्हतेवर शंकेचे कारण नाही. भारताची अर्थव्यवस्था समाधानकारकरित्या पुढे जात आहे. चालू आर्थिक वर्षात ६ टक्क्यांहून अधिक वाढीचा अंदाज असून वाढीचा उच्च स्तर राखण्यासाठी आणि खासगी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी संरचनात्मक सुधारणा आवश्यक आहे. भारताच्या या प्रगतशील ध्येयाचे केवळ आयएमएफच नव्हे तर जगातील अनेक संस्था कौतुक करत आहेत.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार याआधीच भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार, भारत २०२७ पर्यंत जपान आणि जर्मनीसारख्या देशांना मागे टाकत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत तिसऱ्या स्थानावर पोहचू शकते. २०१४ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था १० व्या स्थानावर होती. जी आज पाचव्या स्थानावर पोहचली आहे. कोरोना काळात जेव्हा जगातील सर्व देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या होत्या तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेने उभारी घेत वेग पकडला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्था