शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

पुढील ४-५ वर्षात नरेंद्र मोदींचं 'बिग ड्रीम' पूर्ण होणार; IMF नं दिली Good News

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 11:34 IST

भारताच्या या प्रगतशील ध्येयाचे केवळ आयएमएफच नव्हे तर जगातील अनेक संस्था कौतुक करत आहेत.

नवी दिल्ली – भारतात झालेल्या २ दिवसीय G20 शिखर संमेलनाची यशस्वी सांगता झाली. परदेशी नेते भारताचा पाहुणचार पाहून खुश झाले. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनत आहे. ही बाब आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(IMF) पासून वर्ल्ड बँकसह अनेक जागतिक संस्थांनी मान्य केले आहे. जी-२० मध्ये भारताने मांडलेल्या प्रस्तावाला एका पाठोपाठ एका सदस्य देशांनी होकार दिला. इतकेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ड्रीमवरही संमेलनात शिक्कामोर्तब करण्यात आले.

२०४७ पर्यंत भारत बनेल विकसित देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियन इकोनॉमीबाबत स्वप्न पाहिले आहे. ज्याचा उल्लेख ते स्वत: आणि त्यांचे सहकारी मंत्री अनेकदा करतात. २०४७ पर्यंत भारताला जगातील विकसित देशांच्या यादीत पोहचवायचे आहे. त्याचसोबत पुढील ५-६ वर्षात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताला समोर आणायचे आहे. सध्या अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. जागतिक संस्थांनीही पंतप्रधान मोदींच्या या स्वप्नावर सकारात्मक उत्तर दिले आहे.

G-20 देशात सहभागी होण्यासाठी आलेल्या देशातील IMF च्या डिप्टी मॅनेजिंग डायरेक्टर भारतीय मूळ गीता गोपीनाथ यांनी म्हटलंय की, ग्लोबल ग्रोथ इंजिनच्या रुपात भारताची भूमिका नाकारली जाऊ शकत नाही. २०२७-२८ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकते. पुढील काळात भारताचे ग्लोबल डेवलपमेंट महत्त्वाची भूमिका निभावेल. जागतिक विकासात भारताचे योगदान १५ टक्क्यांपर्यंत पोहचेल. परंतु हे ध्येय गाठण्यासाठी त्यांना लेबर मार्केटमध्ये सुधारणा, उद्योग करण्यासाठी सुलभता, शैक्षणिक गुणवत्ता, महिला सशक्तीकरण यावर विशेष जोर द्यावा लागेल असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत भारताबाबत जे आकडे समोर येत आहेत त्यावर त्यांच्या विश्वासार्हतेवर शंकेचे कारण नाही. भारताची अर्थव्यवस्था समाधानकारकरित्या पुढे जात आहे. चालू आर्थिक वर्षात ६ टक्क्यांहून अधिक वाढीचा अंदाज असून वाढीचा उच्च स्तर राखण्यासाठी आणि खासगी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी संरचनात्मक सुधारणा आवश्यक आहे. भारताच्या या प्रगतशील ध्येयाचे केवळ आयएमएफच नव्हे तर जगातील अनेक संस्था कौतुक करत आहेत.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार याआधीच भारतीय अर्थव्यवस्थेबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार, भारत २०२७ पर्यंत जपान आणि जर्मनीसारख्या देशांना मागे टाकत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत तिसऱ्या स्थानावर पोहचू शकते. २०१४ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था १० व्या स्थानावर होती. जी आज पाचव्या स्थानावर पोहचली आहे. कोरोना काळात जेव्हा जगातील सर्व देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या होत्या तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेने उभारी घेत वेग पकडला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्था