शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

Narendra Modi : भ्रष्टाचार, घराणेशाहीवर नरेंद्र माेदींचा घणाघात; देशाच्या विकासासाठी ‘पंचप्राणां’वर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 06:59 IST

Independence Day : स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केले. आपल्या ८२ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी २५ वर्षांत देशाची वाटचाल कशी असायला हवी, याचा आराखडाच मांडला.

नवी दिल्ली : ‘भ्रष्टाचार आणि घराणेशाही ही देशाच्या विकासात अडथळे ठरणारी दोन मोठी आव्हाने आहेत. ती केवळ राजकारणाच्या परिघापुरतीच मर्यादित नसून सर्वव्यापी आहेत. या दोन्ही दुष्प्रवृत्तींबाबत लोकांनी द्वेषभावना जागृत करावी आणि येत्या २५ वर्षांत भारत एक विकसित राष्ट्र म्हणून उदयाला यावे यासाठी ‘पंचप्राणां’वर लक्ष केंद्रित करावे,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशवासीयांना केले. 

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केले. आपल्या ८२ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी २५ वर्षांत देशाची वाटचाल कशी असायला हवी, याचा आराखडाच मांडला. विकसित राष्ट्र म्हणून उभे राहायचे असेल तर भ्रष्टाचार आणि घराणेशाही यांना मूठमाती द्यावी लागेल, असा आग्रह त्यांनी धरला. तसेच विकासाच्या मार्गावर गतिमान प्रवास करायचा असेल पाच सूत्रे (पंचप्राण) देशवासीयांनी अवलंबायला हवीत, असेही पंतप्रधान म्हणाले. 

विकसित भारतासाठी कटिबद्ध राहणे, कोणाच्या मनात गुलामीचा अंश असता कामा नये, आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान, विविधतेत असलेल्या आपल्या एकतेची जपणूक आणि नागरिक म्हणून - यात पंतप्रधान आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यांचाही समावेश - आपली सर्व कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडणे, ही पंचसूत्री मोदी यांनी देशवासीयांना दिली. 

स्वदेशी बनावटीच्या तोफांनी सलामीपंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला त्यावेळी रिवाजाप्रमाणे २१ तोफांची सलामी देण्यात आली. मात्र, यंदा ही सलामी स्वदेशी बनावटीच्या तोफांची होती. संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या या तोफांचे नाव ॲडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम (एटीएजीएस) असे आहे. 

जय अनुसंधान...पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये विविध क्षेत्रातील मूळ संशोधनाच्या गरजेवर अधिक भर दिला. जय जवान, जय किसान, जय विज्ञानबरोबरच आता ‘जय अनुसंधान’ असे म्हणायला हवे, असे मोदी यांनी नमूद केले. 

‘नारीशक्तीचा सन्मान करा’देशातील महिलाशक्तीबद्दलही मोदींनी गौरवोद्गार काढले. प्रत्येक स्त्रीचा मान राखला जायला हवा, त्यांना सन्मानाची वागणूक दिली जावी, असे सांगत नारीशक्तीचा सन्मान करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.  

स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांच्या वाटचालीत देशाच्या जीवनात अनेक चढ-उतार आले. सुख आणि दुःखाचे अनेक प्रसंग आपण पाहिले. यातूनही देशवासीयांनी मोठी कामगिरी केली. कधीच हार मानली नाही. संकल्प डळमळू दिले नाहीत. हीच भारताची खरी ताकद आहे. २०४७ मध्ये स्वातंत्र्याची १०० वर्षे आपण पूर्ण करू तेव्हा याच इच्छाशक्तीच्या बळावर विकसित राष्ट्र म्हणून जगासमोर उभे राहू. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिन