शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

पूँछमध्ये पंतप्रधान यायला ४० वर्षे लागली - नरेंद्र मोदी

By admin | Updated: November 28, 2014 15:48 IST

पूँछमध्ये तब्बल चाळिस वर्षांनंतर पंतप्रधान आले असल्याचे सांगत मोरारजी देसाईंनंतर इथे येणारा पंतप्रधान मीच असल्याचं प्रचारसभेत नरेंद्र मोदींनी सांगितलं.

ऑनलाइन लोकमत
पूँछ (जम्मू व काश्मिर) दि. २८ - पूँछमध्ये तब्बल चाळिस वर्षांनंतर पंतप्रधान आले असल्याचे सांगत मोरारजी देसाईंनंतर इथे येणारा पंतप्रधान मीच असल्याचं प्रचारसभेत नरेंद्र मोदींनी सांगितलं. कच्छसारख्या वाळवंटी व मुसलमान मोठ्या संख्येने असलेल्या मागास भागात जोमानं विकास मी करून दाखवला आहे. आज कच्छमध्ये पाणी, रस्ते, रेल्वे, रोजगार अशा सर्व सोयी असून देशामध्ये सगळ्यात वेगाने प्रगती करणारा भाग म्हणजे कच्छ आहे. पूँछचा पण असाच कायापालट मी करून दाखवीन असं सांगत जम्मू व काश्मिरमध्ये भाजपाला संपूर्ण बहुमत द्या असं आवाहन मोदींनी केलं.
दिल्लीहून अब्जावधी रुपये जम्मू व काश्मिरमध्ये आले, परंतु अब्दुल्ला व मुफ्ती मोहम्मद या दोन परीवारांनी सगळे पैसे खाल्ले असून लोकांना काही मिळालं नाही असा आरोप मोदींनी केला.
 
मोदींच्या भाषणातील मुद्दे:
 
- अर्धी - अधुरी सरकार बनवू नका. बनवायचं तर संपूर्ण बहुमत असलेलं सरकार बनवा. अर्धे - अधुरे सरकार काही खरं नसतं. त्यामुळं जम्मू व काश्मिरमध्ये भाजपाचं बहुमत असलेलं सरकार बनवा.
- शौचालयाच्या अभावी मुली शाळा सोडतात. हे काम छोटं वाटत असेल पण माझ्यासाठी ते खूप मोठ्ठं आहे. लोक माझी खिल्ली उडवतात. हीच व्यथा काळोखात उघड्यावर शौचाला जावं लागणा-या महिलांची आहे. त्यामुळं प्रत्येक घरात शौचालय हवं.
- फक्त भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळवलीत तरी तुमचं अर्ध काम होईल. त्यासाठी या भ्रष्ट परीवारांना सत्तेपासून लांब ठेवा.
- परीवारवाद, वंशवाद, बिरादरीवाद ही काश्मिरला लागलेली कीड आहे. बाप - बेटा, बाप - बेटी या सगळ्यापासून मुक्त व्हा. भाजपा विकासासाठी, रोजगारासाठी मतं मागत आहे. भाजपाला सत्ता द्या.
- मी जम्मू व काश्मिरमध्ये स्क्रू टाईट केले आहेत आणि इथल्या सरकार व विरोधी पक्ष दोघांची अडचण केली आहे.
- जम्मू व काश्मिरमध्ये आत्तापर्यंत अब्जावधी रुपये दिल्लीतून पाठवण्यात आले, परंतु हे रुपये गेले कुठे? हा पैसा कोणी खाल्ला? असे विचारत मोदींनी अब्दुल्ला व मुफ्ती मोहम्मद या दोन परीवारांवर टीकास्त्र सोडले.
- ज्या ज्या लोकांनी जम्मू व काश्मिरबद्दल बरेवाईट उद्गार काढले होते त्यांना तुम्ही लोकांनी बुलेट बाजुला सारून बॅलटच्या माध्यमातून पराजित केलं आहे. त्यासाठी जम्मू व काश्मिरच्या लोकांचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे.
- जम्मू व काश्मिरमध्ये ७० - ७२ टक्के मतदान करून लोकांनी विक्रम केला आहे. निवडणुकांचे निकाल कधीही लागोत, पण या मतदानाने हे सिद्ध केलंय की लोकतंत्राचा विजय झालाय.
- आत्तापर्यंत मी कधी काही मागण्यासाठी आलो नाही, परंतु आज मी मतं मागायला आलो आहे आणि जम्मू व काश्मिरचे लोक माझी झोळी भरतील अशी मला खात्री आहे.
- लोकांच्या व्यथा माझ्या व्यथा असतात, तुमच्या समस्या माझ्या समस्या असतात, तुम्हाला त्रास झाला तर मला त्रास होतो, मी असा प्रधानसेवक आहे.
- ज्यावेळी पूराने काश्मिरला ग्रासलं त्यावेळीही इथल्या नागरिकांचे अश्रू पुसायला मी आलो, एवढंच नाही तर आपल्या लोकांबरोबर दिवाळी साजरी न करता मी काश्मिरमध्ये दिवाळी साजरी केली, असा प्रधानसेवक मी आहे.
- जम्मू व काश्मिरमध्ये केवळ विकासाचा मंत्र घेऊन मी आलो. विकासाची स्वप्नं घेऊन आलो.
- याआधी पंतप्रधान संपूर्ण काळात एखादी फेरी मारायचे आणि काश्मिरचे कौतुक करायचे. त्या तुलनेत मी गेल्या सहा महिन्यात सहा वेळा जम्मू व काश्मिरमध्ये आल्याचं मोदी म्हणाले.
- भाजापाच्या प्रचाराचं काम एक सेवक म्हणून यापूर्वी करताना आपण पूंछमध्ये राहिलोय आणि इथल्या अनेक घरांमध्ये चहापाणी घेतलंय, रोटी खाल्लीय असं सांगत त्यांनी भाजपाला बहुमतांनी विजयी करण्याचं भावनिक आवाहन मोदींनी केले.