शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

PM मोदींकडून ‘मन की बात’ला अर्धविराम, तीन महिने होणार नाही प्रसारण, समोर आलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 12:36 IST

Man ki Baat: २०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधण्यास सुरुवात केली होती. गेली दहा वर्षे सुरू असणाऱ्या या कार्यक्रमाला अर्धविराम लागणार आहे.

२०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधण्यास सुरुवात केली होती. या कार्यक्रमामधून नरेंद्र मोदी हे देशातील विविध प्रश्नांवर भाष्य करतात. तसेच विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचीही ओळख करून देतात. दरम्यान गेली दहा वर्षे सुरू असणाऱ्या या कार्यक्रमाला अर्धविराम लागणार आहे. आज ‘मन की बात’च्या प्रसारणादरम्यान मोदींनी याबाबतची माहिती दिली. मार्च महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होणार आहे.अशा परिस्थितीत पुढचे तीन महिने मन की बात कार्यक्रमाचं प्रसारण होणार नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. आज प्रसारित झालेला हा भाग मन की बात कार्यक्रमाचा ११० वा भाग होता. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, देशामध्ये नमो ड्रोन दीदी ची चर्चा होत आहे. नारीशक्ती प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. काही दिवसांनंतर ८ मार्च रोजी आपण महिला दिल सारजा करणार आहोत. हा खास दिवस देशाच्या विकासामध्ये महिलांच्या योगदानाला सॅल्युट करण्याची संधी प्रदान करतो. महान कवी भरतियार यांनी सांगितले होते की, जेव्हा महिलांना समान संधी दिली जाईल त्याचवेळी जग खऱ्या अर्थाने बहरेल.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी डिजिटल गॅझेटचा उल्लेख केला. मोदी म्हणाले की, डिजिटल गॅझेटच्या मदतीने आता वन्यप्राण्यांशी ताळमेळ साधण्यास मदत मिळत आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता का? देशाच्या वेगवेगळ्या भागात वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे, हे ऐकून तुम्हाला आनंद होईल. आज युवा उद्योजकसुद्धा वन्यजीव संरक्षण आणि इको टुरिझमसाठी नवनव्या कल्पना समोर आणत आहेत. भारतामध्ये निसर्गासोबत ताळमेळ आपल्या संस्कृतीचा अभिन्न भाग आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातCentral Governmentकेंद्र सरकार