शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

PM मोदींकडून ‘मन की बात’ला अर्धविराम, तीन महिने होणार नाही प्रसारण, समोर आलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 12:36 IST

Man ki Baat: २०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधण्यास सुरुवात केली होती. गेली दहा वर्षे सुरू असणाऱ्या या कार्यक्रमाला अर्धविराम लागणार आहे.

२०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधण्यास सुरुवात केली होती. या कार्यक्रमामधून नरेंद्र मोदी हे देशातील विविध प्रश्नांवर भाष्य करतात. तसेच विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचीही ओळख करून देतात. दरम्यान गेली दहा वर्षे सुरू असणाऱ्या या कार्यक्रमाला अर्धविराम लागणार आहे. आज ‘मन की बात’च्या प्रसारणादरम्यान मोदींनी याबाबतची माहिती दिली. मार्च महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होणार आहे.अशा परिस्थितीत पुढचे तीन महिने मन की बात कार्यक्रमाचं प्रसारण होणार नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. आज प्रसारित झालेला हा भाग मन की बात कार्यक्रमाचा ११० वा भाग होता. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, देशामध्ये नमो ड्रोन दीदी ची चर्चा होत आहे. नारीशक्ती प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. काही दिवसांनंतर ८ मार्च रोजी आपण महिला दिल सारजा करणार आहोत. हा खास दिवस देशाच्या विकासामध्ये महिलांच्या योगदानाला सॅल्युट करण्याची संधी प्रदान करतो. महान कवी भरतियार यांनी सांगितले होते की, जेव्हा महिलांना समान संधी दिली जाईल त्याचवेळी जग खऱ्या अर्थाने बहरेल.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी डिजिटल गॅझेटचा उल्लेख केला. मोदी म्हणाले की, डिजिटल गॅझेटच्या मदतीने आता वन्यप्राण्यांशी ताळमेळ साधण्यास मदत मिळत आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता का? देशाच्या वेगवेगळ्या भागात वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे, हे ऐकून तुम्हाला आनंद होईल. आज युवा उद्योजकसुद्धा वन्यजीव संरक्षण आणि इको टुरिझमसाठी नवनव्या कल्पना समोर आणत आहेत. भारतामध्ये निसर्गासोबत ताळमेळ आपल्या संस्कृतीचा अभिन्न भाग आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातCentral Governmentकेंद्र सरकार