शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची कमिटमेंट! भ्रष्टाचार, परिवारवाद, तुष्टीकरणाविरोधात लढणार; लाल किल्ल्यावरून फुंकले रणशिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 09:44 IST

Narendra Modi Speech fron Red Fort: सीमेवर दिसणारा गाव हा अखेरचा नाही तर देशाचा पहिला गाव आहे. गावांतील दोन कोटी महिलांना लखपती बनविणार. - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील वर्षीही मीच देशाची प्रगती सांगणार असे सुतोवाच केले. याचबरोबर मोदींनी जनतेला मोदींच्या तीन कमिटमेंटची माहिती दिली. 

मी भ्रष्टाचाराविरोधात लढत राहणार, दुसरी गोष्ट म्हणजे परिवारवादाने देशाला ओरबाड़लेय. जखडून ठेवले आहे. याने देशाच्या लोकांचा हक्क हिरावला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे, तुष्टीकरणाने देशाच्या मुलभूत चिंतनाला, चरित्राला डाग लावला आहे. तीन वाईट गोष्टींविरोधात लढायचे आहे. ही मोदींची कमिटमेंट आहे, असे मोदी यांनी सांगितले. 

आपल्याला तीन वाईट गोष्टींविरोधात लढायचे आहे. हे आव्हान आपल्या देशाचे, जनतेचे शोषण करत आहेत. गरीब परंतू कौशल्य असलेल्या लोकांची संधी हिरावून घेत आहेत, असे मोदी म्हणाले. देशात १० कोटी लोकांचा जन्मच झाला नव्हता, त्यांच्या पत्नी विधवा होत होत्या. मुले होत होती. हे लोक देशाचा खजिना लुटत होते. ते मी बंद केले. यामुळे मोदी या लोकांना नको झालाय, अशी टीका मोदी यांनी केली. 

परिवारवाद आणि घराणेशाही हे सामाजिक न्यायाच्या प्रतिभेचे शत्रू आहेत, ते गरीबांची क्षमता नाकारतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. म्हणूनच या देशातील लोकशाहीच्या बळकटीसाठी कुटुंबवादापासून मुक्ती मिळणे आवश्यक आहे. सर्वजन हिताचा आणि सर्वजन सुखाचा हक्क प्रत्येकाला मिळायला हवा. त्यामुळे सामाजिक न्यायाचीही गरज आहे. तुष्टीकरणाने सामाजिक न्यायाची सर्वात मोठी हानी केली आहे. कोणी सामाजिक न्याय नष्ट केला असेल, तर या तुष्टीकरणाच्या विचारसरणीने, तुष्टीकरणाच्या राजकारणाने, तुष्टीकरणाच्या योजनांनी सामाजिक न्यायाचा घात केला आहे. भ्रष्टाचार हा विकासाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे मोदी म्हणाले. 

सीमेवर दिसणारा गाव हा अखेरचा नाही तर देशाचा पहिला गाव आहे. गावांतील दोन कोटी महिलांना लखपती बनविणार. शेती, उद्योजकतेचे ट्रेनिंग दिले जाईल. ७०० जिल्ह्यांमध्ये 5G पोहोचले आहे. आता 6G ची तय़ारी सुरु केली आहे. हा भारत थांबत नाही, हा भारत खचून जात नाही, हा भारत दमत नाही आणि हा भारत हार मानत नाही, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिनRed Fortलाल किल्ला