शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

मोदी म्हणाले, "ममता बॅनर्जींच्या विचारधारेने बंगालला नष्ट केले", दीदींनी केला असा पलटवार...

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 25, 2020 21:20 IST

ममता बॅनर्जींच्या विचारधारेने बंगालला "नष्ट" केले आहे. मोदींनी मुख्यमंत्री ममतांवर ''पंतप्रधान किसान सन्मान निधी''अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रु देण्याच्या योजनेला अडथळा निर्माण केला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ममता बॅनर्जी सरकारवर मोठा आरोप केला. मोदी म्हणाले, ममता या आपल्या राजकीय अजेंड्यापोटी शेतकऱ्यांसाठी असलेल्या एक केंद्रीय लाभ योजनेत आडथळा आणत आहेत. तसेच राज्यातील 70 लाख शेतकऱ्यांना मुख्य पीएम किसान योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्यास नकार देत आहेत. ममता बॅनर्जींच्या विचारधारेने बंगालला "नष्ट" केले आहे. मोदींनी मुख्यमंत्री ममतांवर ''पंतप्रधान किसान सन्मान निधी''अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रु देण्याच्या योजनेला अडथळा निर्माण केला आहे.

मोदी म्हणाले, "आपण ममताजींची 15 वर्षांपूर्वीची भाषणे ऐकली, तर आपल्याला समजेल, की त्यांच्या विचारधारेने बंगालला किती बर्बाद केले? जनता स्वार्थाचे राजकारण करणाऱ्यांना अत्यंत जवळून पाहत आहे. पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांच्या फायद्यासंदर्भात भाष्यही न करणारा पक्ष येथे दिल्लीतील नागरिकांना शेतकऱ्यांच्या नावावर त्रास देत आहे. देशाची अर्थव्यवस्था बर्बाद करत आहे."

यावर, ममतांनीही पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या मोदी सरकारने पश्चिम बंगालच्या मदतीसाठी "काहीही केलेले नाही. अद्यापही थकबाकीच्या 85,000 कोटी रुपयांचा एक भागही त्यांनी दिलेला नाही. यात 8,000 कोटी रुपयांच्या अनपेड जीएसटीचाही समावेश आहे.'

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कायद्यांविरोधात दिल्लीजवळ आंदोलन करत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना समर्थन देणाऱ्या ममता म्हणाल्या, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पंतप्रधानांनी केवळ त्यांच्यासाठी एक स्पष्ट संबोधनाच्या माध्यमाने आपली चिंता दाखवली.

आपण माझी विचारधारा आणि बंगालच्या लोकांप्रती माझ्या वचनबद्धतेवर प्रश्न उपस्थित केले, तर मी सांगू इच्छिते, की माझी विचारधारा या देशाच्या संस्थापक पित्याच्या दृष्टीशी  अनुरूप आहे. मी अंतःकरणाने, प्रामाणिकपणे आणि स्वच्छ हेतूने जनतेची सेवा केली आहे. जे काही माझ्या सोबत आहे, त्याबरेबर माझ्यासाठी राज्यातील लोकच माझे कुटुंब आहे.

येणाऱ्या काही दिवसांत बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपने आपली संपूर्ण शक्ती झोकून दिली आहे. येथील राजकारण सध्या जबरदस्त तापले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालFarmer strikeशेतकरी संप