शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

मोदी म्हणाले, "ममता बॅनर्जींच्या विचारधारेने बंगालला नष्ट केले", दीदींनी केला असा पलटवार...

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 25, 2020 21:20 IST

ममता बॅनर्जींच्या विचारधारेने बंगालला "नष्ट" केले आहे. मोदींनी मुख्यमंत्री ममतांवर ''पंतप्रधान किसान सन्मान निधी''अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रु देण्याच्या योजनेला अडथळा निर्माण केला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ममता बॅनर्जी सरकारवर मोठा आरोप केला. मोदी म्हणाले, ममता या आपल्या राजकीय अजेंड्यापोटी शेतकऱ्यांसाठी असलेल्या एक केंद्रीय लाभ योजनेत आडथळा आणत आहेत. तसेच राज्यातील 70 लाख शेतकऱ्यांना मुख्य पीएम किसान योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्यास नकार देत आहेत. ममता बॅनर्जींच्या विचारधारेने बंगालला "नष्ट" केले आहे. मोदींनी मुख्यमंत्री ममतांवर ''पंतप्रधान किसान सन्मान निधी''अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रु देण्याच्या योजनेला अडथळा निर्माण केला आहे.

मोदी म्हणाले, "आपण ममताजींची 15 वर्षांपूर्वीची भाषणे ऐकली, तर आपल्याला समजेल, की त्यांच्या विचारधारेने बंगालला किती बर्बाद केले? जनता स्वार्थाचे राजकारण करणाऱ्यांना अत्यंत जवळून पाहत आहे. पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांच्या फायद्यासंदर्भात भाष्यही न करणारा पक्ष येथे दिल्लीतील नागरिकांना शेतकऱ्यांच्या नावावर त्रास देत आहे. देशाची अर्थव्यवस्था बर्बाद करत आहे."

यावर, ममतांनीही पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या मोदी सरकारने पश्चिम बंगालच्या मदतीसाठी "काहीही केलेले नाही. अद्यापही थकबाकीच्या 85,000 कोटी रुपयांचा एक भागही त्यांनी दिलेला नाही. यात 8,000 कोटी रुपयांच्या अनपेड जीएसटीचाही समावेश आहे.'

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कायद्यांविरोधात दिल्लीजवळ आंदोलन करत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना समर्थन देणाऱ्या ममता म्हणाल्या, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पंतप्रधानांनी केवळ त्यांच्यासाठी एक स्पष्ट संबोधनाच्या माध्यमाने आपली चिंता दाखवली.

आपण माझी विचारधारा आणि बंगालच्या लोकांप्रती माझ्या वचनबद्धतेवर प्रश्न उपस्थित केले, तर मी सांगू इच्छिते, की माझी विचारधारा या देशाच्या संस्थापक पित्याच्या दृष्टीशी  अनुरूप आहे. मी अंतःकरणाने, प्रामाणिकपणे आणि स्वच्छ हेतूने जनतेची सेवा केली आहे. जे काही माझ्या सोबत आहे, त्याबरेबर माझ्यासाठी राज्यातील लोकच माझे कुटुंब आहे.

येणाऱ्या काही दिवसांत बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपने आपली संपूर्ण शक्ती झोकून दिली आहे. येथील राजकारण सध्या जबरदस्त तापले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालFarmer strikeशेतकरी संप