शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

मोदी म्हणाले, "ममता बॅनर्जींच्या विचारधारेने बंगालला नष्ट केले", दीदींनी केला असा पलटवार...

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 25, 2020 21:20 IST

ममता बॅनर्जींच्या विचारधारेने बंगालला "नष्ट" केले आहे. मोदींनी मुख्यमंत्री ममतांवर ''पंतप्रधान किसान सन्मान निधी''अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रु देण्याच्या योजनेला अडथळा निर्माण केला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ममता बॅनर्जी सरकारवर मोठा आरोप केला. मोदी म्हणाले, ममता या आपल्या राजकीय अजेंड्यापोटी शेतकऱ्यांसाठी असलेल्या एक केंद्रीय लाभ योजनेत आडथळा आणत आहेत. तसेच राज्यातील 70 लाख शेतकऱ्यांना मुख्य पीएम किसान योजनेंतर्गत आर्थिक मदत देण्यास नकार देत आहेत. ममता बॅनर्जींच्या विचारधारेने बंगालला "नष्ट" केले आहे. मोदींनी मुख्यमंत्री ममतांवर ''पंतप्रधान किसान सन्मान निधी''अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रु देण्याच्या योजनेला अडथळा निर्माण केला आहे.

मोदी म्हणाले, "आपण ममताजींची 15 वर्षांपूर्वीची भाषणे ऐकली, तर आपल्याला समजेल, की त्यांच्या विचारधारेने बंगालला किती बर्बाद केले? जनता स्वार्थाचे राजकारण करणाऱ्यांना अत्यंत जवळून पाहत आहे. पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांच्या फायद्यासंदर्भात भाष्यही न करणारा पक्ष येथे दिल्लीतील नागरिकांना शेतकऱ्यांच्या नावावर त्रास देत आहे. देशाची अर्थव्यवस्था बर्बाद करत आहे."

यावर, ममतांनीही पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या मोदी सरकारने पश्चिम बंगालच्या मदतीसाठी "काहीही केलेले नाही. अद्यापही थकबाकीच्या 85,000 कोटी रुपयांचा एक भागही त्यांनी दिलेला नाही. यात 8,000 कोटी रुपयांच्या अनपेड जीएसटीचाही समावेश आहे.'

केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कायद्यांविरोधात दिल्लीजवळ आंदोलन करत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना समर्थन देणाऱ्या ममता म्हणाल्या, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पंतप्रधानांनी केवळ त्यांच्यासाठी एक स्पष्ट संबोधनाच्या माध्यमाने आपली चिंता दाखवली.

आपण माझी विचारधारा आणि बंगालच्या लोकांप्रती माझ्या वचनबद्धतेवर प्रश्न उपस्थित केले, तर मी सांगू इच्छिते, की माझी विचारधारा या देशाच्या संस्थापक पित्याच्या दृष्टीशी  अनुरूप आहे. मी अंतःकरणाने, प्रामाणिकपणे आणि स्वच्छ हेतूने जनतेची सेवा केली आहे. जे काही माझ्या सोबत आहे, त्याबरेबर माझ्यासाठी राज्यातील लोकच माझे कुटुंब आहे.

येणाऱ्या काही दिवसांत बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यासाठी भाजपने आपली संपूर्ण शक्ती झोकून दिली आहे. येथील राजकारण सध्या जबरदस्त तापले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालFarmer strikeशेतकरी संप