शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

...म्हणून राहुल गांधींनी घेतली गळाभेट, मोदींनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 15:16 IST

शुक्रवारी लोकसभेमध्ये सादर झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट चर्चेचा विषय ठरली होती. या भेटीमागचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

शाहजहाँपूर - शुक्रवारी लोकसभेमध्ये सादर झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट चर्चेचा विषय ठरली होती. दरम्यान आज उत्तर प्रदेशमधील शाहजहाँपूर येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना या गळाभेटीमागचे कारण पंतप्रधान नरेंद्र यांनी  सांगितले. मोदी म्हणाले, आम्ही त्यांना वारंवार विचारत होतो की अविश्वास प्रस्ताव आणण्याचे नेमके कारण काय आहे. जरा सांगाल का, पण ते कारण सांगू शकले नाहीत आणि मग थेट गळ्यात पडले." 

शनिवारी उत्तर प्रदेशाती शाहजहाँपूर येथे किसान कल्याण सभेला उपस्थित राहिलेल्या मोदींनी उस उप्तादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करताना उत्पादन खर्चापेक्षा 80 टक्के अधिक थेट लाभ देण्याची घोषणा केली. तसेच आपल्या सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती दिली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,  देशाचे 90 हजार कोटी रुपये जे इतरत्र जात असत, ते आता योग्य व्यक्तीकडे पोहोचू लागले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे.'' यावेळी मोदींनी काँग्रेससह अन्य विरोधकांवरही जोरदार टीका केली. पंतप्रधानपदाच्या खुर्चीशिवाय त्यांना काहीही दिसत नाही. ना देश दिसत ना देशातील जनता. मी भ्रष्टाचार आणि परिवावादाविरोधात लढत आहे हेच त्यांचे दुखणे आहे, असे ते म्हणाले.  

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीlok sabhaलोकसभा