शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते इंडिया गेटवर सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 19:38 IST

Netaji Subhashchandra Bose: इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवला जाईल. ग्रॅनाइटचा पुतळा तयार होईपर्यंत त्यांचा होलोग्राम पुतळा तिथे बसवण्यात आला आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी दिल्लीतील इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhashchandra Bose) यांच्या 125व्या जयंतीनिमित्त त्यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले. होलोग्रामचा अचूक प्रभाव निर्माण करण्यासाठी त्यावर नेताजींचे थ्रीडी चित्र लावण्यात आले आहे. होलोग्राम पुतळा 28 फूट उंच आणि 6 फूट रुंद आहे. पंतप्रधान मोदींनी 21 जानेवारी रोजी घोषणा केली होती की, इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवला जाईल. ग्रॅनाइटचा पुतळा तयार होईपर्यंत त्यांचा होलोग्राम पुतळा तिथे बसवण्यात आला आहे.

हा पुतळा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईलपुतळ्याच्या अनावरणप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारतमातेचे शूर पुत्र सुभाषचंद्र बोस यांनी ब्रिटिश सरकारसमोर अभिमानाने सांगितले होते की, मी स्वातंत्र्याची भीक मागणार नाही, तर ते लढ्याने मिळवू. नेताजींनी स्वतंत्र भारताचा नारा दिला होता. त्यांच्या या डिजिटल पुतळ्याची जागा लवकरच भव्य पुतळ्याने साकारली जाणार आहे. हा पुतळा स्वातंत्र्याच्या महान नायकाला श्रद्धांजली असेल. तसेच, हा पुतळा आपल्या भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील."

''स्वातंत्र्यानंतर देशाच्या संस्कृती आणि परंपरांसोबतच अनेक महान व्यक्तींचे योगदान पुसून टाकण्याचे काम केले गेले हे दुर्दैव आहे. आज स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतर देश त्या चुका दुरुस्त करत आहे. आमच्या सरकारला नेताजींशी संबंधित फाइल्स सार्वजनिक करण्याची संधी मिळाली. नेताजींनी काही करण्याचा निर्धार केला तर कोणतीही शक्ती त्यांना रोखू शकत नव्हती. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुढे जायचे आहे.''असे मोदी म्हणाले. 

आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार प्रदानयादरम्यान पंतप्रधान मोदींनी 2019, 2020, 2021 आणि 2022 या वर्षांसाठी 'सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार' देखील प्रदान केला. या अंतर्गत एकूण 7 पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात भारतातील विविध लोक आणि संस्थांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची आणि निःस्वार्थ सेवेची प्रशंसा करण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी वार्षिक सुभाष चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्काराची सुरुवात केली आहे. या पुरस्कारांतर्गत, एखाद्या संस्थेला 51 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र आणि एखाद्या व्यक्तीला 5 लाख रुपये आणि प्रमाणपत्र दिले जाते.

देशात आपत्ती व्यवस्थापनात मोठी सुधारणापंतप्रधान पुढे म्हणाले की, ''आपल्या देशात वर्षानुवर्षे आपत्तीचा विषय कृषी विभागाकडे होता. याचे मूळ कारण म्हणजे पूर, अतिवृष्टी, गारपिटीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची जबाबदारी कृषी मंत्रालयाची होती. अशा प्रकारे देशात आपत्ती व्यवस्थापन सुरू होते. पण 2001 च्या गुजरात भूकंपानंतर जे घडले त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा अर्थच बदलून गेला. आम्ही सर्व विभाग आणि मंत्रालयांना मदत आणि बचाव कार्यात टाकले आहे. त्या काळातील अनुभवातून शिकून गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन कायदा 2003 मध्ये लागू करण्यात आला.''

हा कायदा करणारे गुजरात पहिले राज्य''आपत्तीला तोंड देण्यासाठी असा कायदा करणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य ठरले. नंतर केंद्र सरकारने गुजरातच्या कायद्यापासून धडा घेत 2005 मध्ये संपूर्ण देशासाठी असाच आपत्ती व्यवस्थापन कायदा केला. आम्ही एनडीआरएफला बळकट केले, त्याचे आधुनिकीकरण केले, त्यांचा देशभर विस्तार केला. अवकाश तंत्रज्ञानापासून नियोजन आणि व्यवस्थापनापर्यंत सर्वोत्कृष्ट पद्धतींचा अवलंब करण्यात आला.''

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोस