शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 13:48 IST

Narendra Modi Man ki Baat : पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात डिजिटल अटकेपासून बचावाची माहिती दिली.

Narendra Modi Man ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी(दि. 27) 115 व्या 'मन की बात' कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशात सुरू असलेल्या डिजिटल अरेस्टच्या घटनांबाबत महत्त्वाची माहिती दिली आणि लोकांना जागरुक केले. पंतप्रधानांनी कार्यक्रमात एक व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये पोलिसांचे कपडे घातलेला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची ऑनलाईन पद्धतीने चौकशी करत आहे आणि त्याला आधार कार्ड दाखवण्याची मागणी करतोय.

डिजिटल अरेस्टवर पीएम मोदींनी केले जागरुकडिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदी म्हणाले की, प्रत्येक वयोगटातील आणि वर्गातील लोक डिजिटल अटकेचे बळी ठरत आहेत. भीतीपोटी अनेकजण आपल्या कष्टाने कमावलेले पैसे या ऑनलाईन गुन्हेगारांना देत आहेत. लोकांना जागरुक करत पीएम मोदी म्हणाले की, तुम्हाला कधी असा फोन आला तर घाबरू नका. तपास यंत्रणा कधीही अशाप्रकारचे फोन किंवा व्हिडिओ करत नाहीत. तमाम भारतीयांना अशा घोटाळ्यापासून सावध राहावे.

डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पेकायद्यात डिजिटल अटकेसारखी कोणतीही व्यवस्था नाही, ही फसवणूक, खोटेपणा आहे. डिजिटल अटकेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीला तोंड देण्यासाठी सर्व तपास यंत्रणा राज्य सरकारांसोबत एकत्र काम करत आहेत. पीएम मोदींनी यावेळी डिजिटल अटकेपासून बचावाचे तीन टप्पे सांगितले. 

  1. थांबा/शांत राहा
  2. विचार करा
  3. योग्य कारवाई करा

 

पंतप्रधान म्हणाले की, असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा, घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका, तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा. दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही. तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून घ्या की काहीतरी चुकीचे आहे. शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या तिसऱ्या टप्प्याबद्दल बोलताना पीएम मोदी म्हणाले, तिसरा टप्पा म्हणजे योग्य कारवाई. अशाप्रकारचे फोन आल्यावर नॅशनल सायबर हेल्पलाइन 1930 डायल करा. तसेच सायबर क्राईम वेबसाइटवर अहवाल द्या. कुटुंब आणि पोलिसांना कळवा.

अशी केली जाते डिजिटल अरेस्टडिजिटल अटक घोटाळ्याची सुरुवात एका अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलने होते. हा ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल असू शकतो. पीडितेला अज्ञात क्रमांकावरून कॉल किंवा व्हिडिओ कॉल येतो आणि त्यांना बनावट पार्सल, मोबाईल क्रमांक बंद करणे किंवा बनावट मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची माहिती दिली जाते. यानंतर, त्यांना बनावट अटक किंवा बनावट वॉरंट दाखवले जाते. यानंतर त्यांना प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. अशाप्रकारे हजारो, लाखो रुपये उकळले जातात.

तक्रार कशी करायची?पीएम म्हणाले की, अशी फसवणूक करणारे हजारो व्हिडिओ आयडी ब्लॉक करण्यात आले आहेत. लाखो सिमकार्ड आणि बँक खातीही ब्लॉक करण्यात आली आहेत. एजन्सी त्यांचे काम करत आहेत, परंतु डिजिटल अटकेच्या नावाखाली होणारे घोटाळे टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जागरूकता खूप महत्त्वाची आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी, तुमच्यासोबत झालेला घोटाळा #SAFEDIGITALINDIA हॅशटॅगसह सोशल मीडियावर शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना जागरूक करा. डिजिटल अटक घोटाळा किंवा इतर सायबर फसवणुकीबद्दलच्या तक्रारी नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर (cybercrime.gov.in/) किंवा हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करून नोंदवल्या जाऊ शकतात. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातcyber crimeसायबर क्राइम