शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 13:48 IST

Narendra Modi Man ki Baat : पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमात डिजिटल अटकेपासून बचावाची माहिती दिली.

Narendra Modi Man ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी(दि. 27) 115 व्या 'मन की बात' कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशात सुरू असलेल्या डिजिटल अरेस्टच्या घटनांबाबत महत्त्वाची माहिती दिली आणि लोकांना जागरुक केले. पंतप्रधानांनी कार्यक्रमात एक व्हिडिओ दाखवला, ज्यामध्ये पोलिसांचे कपडे घातलेला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची ऑनलाईन पद्धतीने चौकशी करत आहे आणि त्याला आधार कार्ड दाखवण्याची मागणी करतोय.

डिजिटल अरेस्टवर पीएम मोदींनी केले जागरुकडिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदी म्हणाले की, प्रत्येक वयोगटातील आणि वर्गातील लोक डिजिटल अटकेचे बळी ठरत आहेत. भीतीपोटी अनेकजण आपल्या कष्टाने कमावलेले पैसे या ऑनलाईन गुन्हेगारांना देत आहेत. लोकांना जागरुक करत पीएम मोदी म्हणाले की, तुम्हाला कधी असा फोन आला तर घाबरू नका. तपास यंत्रणा कधीही अशाप्रकारचे फोन किंवा व्हिडिओ करत नाहीत. तमाम भारतीयांना अशा घोटाळ्यापासून सावध राहावे.

डिजिटल अरेस्टपासून बचावाचे तीन टप्पेकायद्यात डिजिटल अटकेसारखी कोणतीही व्यवस्था नाही, ही फसवणूक, खोटेपणा आहे. डिजिटल अटकेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीला तोंड देण्यासाठी सर्व तपास यंत्रणा राज्य सरकारांसोबत एकत्र काम करत आहेत. पीएम मोदींनी यावेळी डिजिटल अटकेपासून बचावाचे तीन टप्पे सांगितले. 

  1. थांबा/शांत राहा
  2. विचार करा
  3. योग्य कारवाई करा

 

पंतप्रधान म्हणाले की, असे काही घडल्यास तुम्ही सर्वप्रथम शांत राहा, घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नका, तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका आणि शक्य असल्यास स्क्रीनशॉट घ्या आणि रेकॉर्डिंग करा. दुसरी पायरी म्हणजे विचार करणे. कोणतीही एजन्सी फोनवर अशा धमक्या देत नाही, व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही किंवा अशा पैशांची मागणी करत नाही. तुम्हाला भीती वाटत असेल, तर समजून घ्या की काहीतरी चुकीचे आहे. शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या तिसऱ्या टप्प्याबद्दल बोलताना पीएम मोदी म्हणाले, तिसरा टप्पा म्हणजे योग्य कारवाई. अशाप्रकारचे फोन आल्यावर नॅशनल सायबर हेल्पलाइन 1930 डायल करा. तसेच सायबर क्राईम वेबसाइटवर अहवाल द्या. कुटुंब आणि पोलिसांना कळवा.

अशी केली जाते डिजिटल अरेस्टडिजिटल अटक घोटाळ्याची सुरुवात एका अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलने होते. हा ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल असू शकतो. पीडितेला अज्ञात क्रमांकावरून कॉल किंवा व्हिडिओ कॉल येतो आणि त्यांना बनावट पार्सल, मोबाईल क्रमांक बंद करणे किंवा बनावट मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची माहिती दिली जाते. यानंतर, त्यांना बनावट अटक किंवा बनावट वॉरंट दाखवले जाते. यानंतर त्यांना प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. अशाप्रकारे हजारो, लाखो रुपये उकळले जातात.

तक्रार कशी करायची?पीएम म्हणाले की, अशी फसवणूक करणारे हजारो व्हिडिओ आयडी ब्लॉक करण्यात आले आहेत. लाखो सिमकार्ड आणि बँक खातीही ब्लॉक करण्यात आली आहेत. एजन्सी त्यांचे काम करत आहेत, परंतु डिजिटल अटकेच्या नावाखाली होणारे घोटाळे टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जागरूकता खूप महत्त्वाची आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी, तुमच्यासोबत झालेला घोटाळा #SAFEDIGITALINDIA हॅशटॅगसह सोशल मीडियावर शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना जागरूक करा. डिजिटल अटक घोटाळा किंवा इतर सायबर फसवणुकीबद्दलच्या तक्रारी नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर (cybercrime.gov.in/) किंवा हेल्पलाइन नंबर 1930 वर कॉल करून नोंदवल्या जाऊ शकतात. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMan ki Baatमन की बातcyber crimeसायबर क्राइम