शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 16:56 IST

Arvind Kejriwal in Delhi assembly : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित केले.

Arvind Kejriwal in Delhi assembly : नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. दिल्ली सरकारचे काम बंद पाडल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केला. 

माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण मोदी देव नाहीत. या जगात देव आहे, काही तरी शक्ती आहे, ती माझ्यासोबत आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका नेत्यासोबत चर्चा केली. त्यावेळी मी त्यांना विचारले असता, ते मला म्हणाले की, मी तुमचे सरकार पाडले आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. २७ वर्षांपासून दिल्लीतील जनता त्यांना मतदान करत नाही. औषधे आणि केजरीवाल यांची बदनामी करून तुम्हाला मते मिळवायची आहेत, हे चुकीचे आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

लोक म्हणतात तुरुंगात गेल्याने नुकसान झाले. नुकसान झाले हे मला मान्य आहे. पण केजरीवालांचे नुकसान झाले नाही, मनीष सिसोदिया यांचे नुकसान झाले नाही, पण दिल्लीतील दोन कोटी जनतेचे नुकसान झाले. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये औषधे बंद करण्यात आली आहेत. थोडं देवाला घाबरा. कोणाचाही अहंकार टिकू शकत नाही, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

याचबरोबर, भाजपवर निशाणा साधत अरविंद केजरीवाल म्हणाले की, त्यांची मानसिकता नकारात्मक आहे, त्यांना तुरुंगात पाठवा. तसेच, बसमधून मार्शल काढले, मार्शलचे काम कोण करतंय, गोरगरिबांची मुले नोकरी करतात. वृद्धांची पेन्शन बंद केली, तीर्थयात्रा बंद केली, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

...तर मला मतदान करा - केजरीवालमी प्रामाणिक आहे, असे जनतेला वाटत असेल तर मला मतदान करा, अन्यथा मतदान करू नका, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले. तसेच, भाजपाने जे काही काम थांबवले होते, ते मी पुन्हा सुरू करेन. तुरुंगात गेल्याने नुकसान झाले, पण ते केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचे नाही तर दिल्लीच्या जनतेचे नुकसान झाले, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीAAPआप