शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाणी, बसच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींचा केजरीवाल सरकारवर हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 16:23 IST

'दिल्लीतील 2000 व्हीआयपी बंगले आम्ही खाली केले.'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामलीला मैदानावरून आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे एकप्रकारे रणशिंग फुंकले आहे. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर नरेंद्र मोदींनी निशाणा साधला. दिल्लीतील पाणी आणि परिवहन व्यवस्थेच्या मुद्द्यांवरून नरेंद्र मोदींनी केजरीवाल सरकारवर जनतेची कामे केली नसल्याचा आरोप केला. 

दिल्लीतील पाण्याच्या समस्येवर राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. दूषित पाण्याच्या समस्येवर राज्य सरकार गप्प बसले आहे. दिल्लीत आरओची विक्री मोठ्याप्रमाणात होते. गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या समस्येवरून राजकारण करण्यात येत आहे, असे सांगत नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर हल्लाबोल केला. 

याचबरोबर, दिल्लीतील बस गाड्यांच्या मुद्द्यावरूनही नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारला लक्ष्य केले. राज्य सरकार दिल्लीतील लोकांना योग्यरित्या बसेसची सुविधा देऊ शकत नाही. त्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. यासाठी आम्ही दिल्लीत मेट्रोचा विस्तार केला. यामुळे लोकांना कोठेही जाण्या-येण्यास सुविधा मिळत आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

गेल्या पाच वर्षांत आम्ही दिल्ली मेट्रोचा अभूतपूर्व असा विकास केला. दिल्लीच्या मेट्रोच्या मार्गात 70 किमीची भर पडणार आहे. दरवर्षी याचा 25 किलोमीटर वेगाने विस्तार होत आहे. दिल्लीकरांना सुविधा मिळाव्यात हेच आमचे उद्दिष्ट्य आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

याशिवाय, 40 लाख लोकांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे. आम्ही वसाहतींचे प्रश्न सोडवत आहोत. अनधिकृत वसाहतींना अधिकृत केले. 1200 पेक्षा अधिक वसाहतींचे नकाशे आता ऑनलाइन करण्यात आले आहेत. दिल्लीतील 2000 व्हीआयपी बंगले आम्ही खाली केले. पण, माझ्यासाठी तुम्हीच व्हीआयपी आहात, असेही सांगत नरेंद्र मोदी यांनी दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल