शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी, बसच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींचा केजरीवाल सरकारवर हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 16:23 IST

'दिल्लीतील 2000 व्हीआयपी बंगले आम्ही खाली केले.'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामलीला मैदानावरून आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे एकप्रकारे रणशिंग फुंकले आहे. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर नरेंद्र मोदींनी निशाणा साधला. दिल्लीतील पाणी आणि परिवहन व्यवस्थेच्या मुद्द्यांवरून नरेंद्र मोदींनी केजरीवाल सरकारवर जनतेची कामे केली नसल्याचा आरोप केला. 

दिल्लीतील पाण्याच्या समस्येवर राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. दूषित पाण्याच्या समस्येवर राज्य सरकार गप्प बसले आहे. दिल्लीत आरओची विक्री मोठ्याप्रमाणात होते. गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या समस्येवरून राजकारण करण्यात येत आहे, असे सांगत नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर हल्लाबोल केला. 

याचबरोबर, दिल्लीतील बस गाड्यांच्या मुद्द्यावरूनही नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारला लक्ष्य केले. राज्य सरकार दिल्लीतील लोकांना योग्यरित्या बसेसची सुविधा देऊ शकत नाही. त्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. यासाठी आम्ही दिल्लीत मेट्रोचा विस्तार केला. यामुळे लोकांना कोठेही जाण्या-येण्यास सुविधा मिळत आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

गेल्या पाच वर्षांत आम्ही दिल्ली मेट्रोचा अभूतपूर्व असा विकास केला. दिल्लीच्या मेट्रोच्या मार्गात 70 किमीची भर पडणार आहे. दरवर्षी याचा 25 किलोमीटर वेगाने विस्तार होत आहे. दिल्लीकरांना सुविधा मिळाव्यात हेच आमचे उद्दिष्ट्य आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

याशिवाय, 40 लाख लोकांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे. आम्ही वसाहतींचे प्रश्न सोडवत आहोत. अनधिकृत वसाहतींना अधिकृत केले. 1200 पेक्षा अधिक वसाहतींचे नकाशे आता ऑनलाइन करण्यात आले आहेत. दिल्लीतील 2000 व्हीआयपी बंगले आम्ही खाली केले. पण, माझ्यासाठी तुम्हीच व्हीआयपी आहात, असेही सांगत नरेंद्र मोदी यांनी दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल