शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पाणी, बसच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींचा केजरीवाल सरकारवर हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 16:23 IST

'दिल्लीतील 2000 व्हीआयपी बंगले आम्ही खाली केले.'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामलीला मैदानावरून आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे एकप्रकारे रणशिंग फुंकले आहे. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर नरेंद्र मोदींनी निशाणा साधला. दिल्लीतील पाणी आणि परिवहन व्यवस्थेच्या मुद्द्यांवरून नरेंद्र मोदींनी केजरीवाल सरकारवर जनतेची कामे केली नसल्याचा आरोप केला. 

दिल्लीतील पाण्याच्या समस्येवर राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. दूषित पाण्याच्या समस्येवर राज्य सरकार गप्प बसले आहे. दिल्लीत आरओची विक्री मोठ्याप्रमाणात होते. गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या समस्येवरून राजकारण करण्यात येत आहे, असे सांगत नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर हल्लाबोल केला. 

याचबरोबर, दिल्लीतील बस गाड्यांच्या मुद्द्यावरूनही नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारला लक्ष्य केले. राज्य सरकार दिल्लीतील लोकांना योग्यरित्या बसेसची सुविधा देऊ शकत नाही. त्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. यासाठी आम्ही दिल्लीत मेट्रोचा विस्तार केला. यामुळे लोकांना कोठेही जाण्या-येण्यास सुविधा मिळत आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

गेल्या पाच वर्षांत आम्ही दिल्ली मेट्रोचा अभूतपूर्व असा विकास केला. दिल्लीच्या मेट्रोच्या मार्गात 70 किमीची भर पडणार आहे. दरवर्षी याचा 25 किलोमीटर वेगाने विस्तार होत आहे. दिल्लीकरांना सुविधा मिळाव्यात हेच आमचे उद्दिष्ट्य आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

याशिवाय, 40 लाख लोकांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे. आम्ही वसाहतींचे प्रश्न सोडवत आहोत. अनधिकृत वसाहतींना अधिकृत केले. 1200 पेक्षा अधिक वसाहतींचे नकाशे आता ऑनलाइन करण्यात आले आहेत. दिल्लीतील 2000 व्हीआयपी बंगले आम्ही खाली केले. पण, माझ्यासाठी तुम्हीच व्हीआयपी आहात, असेही सांगत नरेंद्र मोदी यांनी दिल्ली निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल