शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
4
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
5
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
6
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
7
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
8
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
9
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
10
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
11
पुतीन परतले, पुढे...?
12
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
15
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
16
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
17
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
18
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
19
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
20
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

नितीश यांची काँग्रेसवर थेट टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 04:13 IST

तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षांनी तेजस्वी यादव यांना विरोधी पक्षनेते म्हणून घोषित केले. सभागृहात तेजस्वी म्हणाले की, नितीश कुमार यांनी एकदाही मला राजीनामा मागितला नाही किंवा काढलेही नाही.

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रथमच शुक्रवारी विधानसभेत काँगे्रसवर थेट टीका केली. ते म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करण्याची मागणी मी काँग्रेसकडे केली होती. पण, त्यांनी काहीच केले नाही. आम्ही अनेक आव्हानांना सामोरे गेलो. त्यानंतरही आघाडी धर्माचे पालन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. सत्ता सेवेसाठी असते, ‘मेवा’ नसते. सत्ता संपत्ती मिळविण्यासाठी नसते. काँग्रेस आणि राजदला उद्देशून ते म्हणाले की, मला कोणीही जातीयतेचे धडे देऊ शकत नाही. काही जण पाप लपविण्यासाठी धर्मनिरपेक्ष झाले आहेत.सभागृहात बोलताना नितीश कुमार म्हणाले की, ज्या लोकांनी आम्हाला मते दिली ते लोक त्रस्त होते. त्यामुळे जनहितासाठी हा निर्णय घ्यावा लागला. तेजस्वी यादव यांच्याकडे इशारा करून ते म्हणाले की, आम्ही मर्यादेत राहत आहोत. तुम्हीही दक्ष राहा. बिहारमधील भागलपूरमध्ये झालेल्या दंगलीचा उल्लेख करून ते म्हणाले की, या प्रकरणात अनेक लोकांना वाचविण्याचा प्रयत्न झाला. नितीश कुमार यांनी आज राहुल गांधी यांनाही उत्तर दिले. नितीश कुमार यांचा उल्लेख त्यांनी धोकेबाज असा केला होता. नितीश कुमार म्हणाले की, १५ जागा असलेल्या काँग्रेसला आम्ही ४० जागांपर्यंत पोहोचविले. आघाडी वाचविण्यासाठी काँग्रेसलाही मध्यस्थी करण्याबाबत सुचविले होते.हे रामचे जय श्रीराम झाले !तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षांनी तेजस्वी यादव यांना विरोधी पक्षनेते म्हणून घोषित केले. सभागृहात तेजस्वी म्हणाले की, नितीश कुमार यांनी एकदाही मला राजीनामा मागितला नाही किंवा काढलेही नाही. नितीश कुमार यांचा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. २८ वर्षांच्या एका तरुणाला लक्ष्य केले जात आहे. भाजपाला सत्तेची लालसा आहे आणि भाजपासोबत जाण्याची नितीश कुमार यांचीही तशी इच्छा होतीच. आम्ही असा कोणता अपराध केला की, तुम्ही हा निर्णय घेतला? महात्मा गांधी यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, बापूंची हत्या करणाºयांसोबत तुम्ही हातमिळवणी केली आहे. संघमुक्त भारताबाबत कोण बोलले होते? मग, मुख्यमंत्री तुम्ही का घाबरलात? आम्ही मातीत मिसळू, पण भाजपासोबत जाणार नाही. आता आपण ह्यहे रामह्णचे ह्यजय श्रीरामह्ण झालात. लोकांनी भाजपाच्या विरुद्ध कौल दिला होता. नितीश कुमार यांनी बिहारचा अपमान केला आहे. ह्यबहती हवा सा था वो, गुजरात से आया था, काला धन लाने वाला था वो, कहा गया उसे ढुंढो, दाऊद को लाने वाला था वो, कहा गया उसे ढुंढोह्ण असे गीतही त्यांनी सादर केले.आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नकातेजस्वी यादव यांच्याकडे इशारा करून नितीश कुमार म्हणाले की, कोणीही आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये. धर्मनिरपेक्षता भ्रष्टाचारावर पडदा टाकण्यासाठी नाहीय. हे लोक अहंकारात जिंकले आहेत. आपले पाप झाकण्यासाठी ते धर्मनिरपेक्षतेचा आधार घेतात. बिहारमध्ये आघाडीच्या काळात आमचे अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न झाला. केंद्रात आणि राज्यात एकाच आघाडीचे सरकार आल्याची ही पाहिली वेळ आहे.राजद फुटला असता - सुशील मोदीगुप्त मतदान झाले असते तर राजद पक्ष फुटला असता. एक डझनपेक्षा अधिक आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले असते, असे मत उप मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी व्यक्त केले. बहुमत सिद्ध केल्यानंतर बाहेर पत्रकारांशी बोलताना सुशीलकुमार मोदी यांनी राजद-काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, विश्वासदर्शक ठरावानंतर राजद आणि काँग्रेसला उत्तर मिळाले आहे. जदयू आणि भाजपा हे नैसर्गिक मित्र आहेत. आगामी ४० महिने आम्ही मजबुतीने सरकार चालवू. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की, बिहारमधील ही आघाडी अधिक दिवस टिकणार नाही. नितीश कुमार हे तेजस्वी यादव यांना वारंवार खुलासा करण्यास सांगत होते. पण, तेजस्वी यादव यावर खुलासा देऊच शकत नव्हते. कारण, त्यांच्याकडे या आरोपांचे काहीच उत्तर नव्हते. आपल्या एक हजार कोटी रुपयांच्या संपत्तीबाबतही ते काहीच बोलले नाहीत. २८ वर्षांच्या वयात तेजस्वी यांनी एवढी संपत्ती कशी जमविली ते बिहारच्या जनतेलाही जाणून घ्यायचे आहे, असेही ते म्हणाले.