शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘मुस्लिमांना दुय्यम नागरिक असल्याचे वाटते’

By admin | Updated: October 7, 2016 02:04 IST

भारतातील अल्पसंख्य समाजाला कधी-कधी आपण ‘दुय्यम दर्जाचे नागरिक’ आहोत, असे वाटते, असे मत केंद्रीय अल्पसंख्य कामकाजमंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : भारतातील अल्पसंख्य समाजाला कधी-कधी आपण ‘दुय्यम दर्जाचे नागरिक’ आहोत, असे वाटते, असे मत केंद्रीय अल्पसंख्य कामकाजमंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केले. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार अल्पसंख्याकांच्या हक्कांवरून टीकेला तोंड देत असताना, नक्वी यांच्या या मतामुळे सरकार अडचणींत आले आहे. मतपेट्यांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मी हे विधान केल्याचे स्पष्टीकरणही नक्वी यांनी केले. ते म्हणाले, ‘अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी भारत हा आदर्श देश असल्याचे व जरा शेजारी बघा म्हणजे तुम्हाला ते समजेल. भारतीय राज्यघटनेने समान हक्क बहाल केले असले, तरी तेवढी समानता नसल्याची भावना कधी-कधी अल्पसंख्य समाजामध्ये निर्माण होते. कधी-कधी आम्हाला आपण दुय्यम दर्जाचे नागरिक असल्याचे वाटते. मूळ प्रश्न हा नेहमीच बाजूला पडतो.’ राष्ट्रीय अल्पसंख्य आयोगाच्या वार्षिक व्याख्यानात नक्वी येथे बुधवारी बोलत होते. राजिंदर साचर समिती आणि कुंडू समितीसह अनेक अहवालांत तेव्हाच्या सरकारांनी मुस्लीम समाजाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी किती किरकोळ काम केले हे दाखविले आहे. मोदी सरकार सत्तेवर येऊन अडीच वर्षे झाली, तेव्हापासून अल्पसंख्य समाजाशी संबंधित प्रश्नांवरून, असहिष्णुता, पुरस्कार परत करणे आणि गोरक्षकांच्या मुद्द्यांवरून टीकेच्या माऱ्याखाली आहे. कोणाहीकडून देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाहीसमाजा-समाजामध्ये शांतता आणि सौख्य राहावे, असे आग्रहाने सांगून नक्वी यांनी आयोगाने दंगलींशी संबंधित नसलेली प्रकरणे हाताळली, तर ते योग्य आदर्श ठरेल, असे म्हटले. भारतीय मुस्लिमांना कोणाहीकडून देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही. त्यामुळेच मूलतत्त्ववादी संघटना भारतात शिरकाव करू शकलेल्या नाहीत, असे ते म्हणाले.