शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींचा मुलगा CBI च्या फेऱ्यात; जय अनमोल अंबानींवर २२८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा, प्रकरण काय?
2
विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान करणाऱ्या सूर्यकांत मोरेंविरोधात हक्कभंग
3
तुमची एक छोटीशी चूक आणि PPF च्या व्याजावर भरावा लागू शकतो टॅक्स, जाणून घ्या अधिक माहिती
4
Travel : भारतातील 'या' हिल स्टेशनला जाल तर इटलीचं सौंदर्य विसराल; महाराष्ट्राच्या तर आहे अगदीच जवळ!
5
हिवाळी अधिवेशनात फडणवीस-शिंदे ‘हम साथ साथ है’; दोन्ही नेत्यांची ठरवून कुस्ती, विरोधकच चितपट!
6
ती व्हायरल ब्लू साडी गिरीजा ओकची नव्हतीच, तर 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची!
7
Pune Crime: 'चल तुला शाळेत सोडतो', पुण्यात तरुणाचा अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
8
TATA च्या स्वस्त शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; १८% नं वाढला भाव, ५४ रुपये आहे किंमत
9
ही काय भानगड? आर. अश्विनच्या पोस्टमध्ये झळकली सनी लिओनी! जाणून घ्या त्यामागची गोष्ट
10
प्रवाशांना गुड न्यूज, टाइमटेबल आले; कोकण रेल्वेवर विशेष सेवा, मुंबई-गोवा किती ट्रेन वाढतील?
11
प्रत्येक समस्येला लाडक्या बहिणीशी जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
12
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver मध्ये २०३४ रुपयांची घसरण, किती स्वस्त झालं Gold? पाहा
13
डिव्हिडंड आणि भांडवली नफा; शेअर बाजारातील कमाईवर किती लागतो टॅक्स? कुठे वाचतील पैसे?
14
सामान्य नागरिकांना त्रास होईल, असे नियम-कायदे नको; IndiGo संकटावर PM मोदींची प्रतिक्रिया
15
बांगलादेशचे नवे पंतप्रधान कोण होणार? 'या' चार बड्या नेत्यांची नावे चर्चेत; कुणाला सर्वाधिक संधी?
16
शेतकऱ्यांच्या लेकींची उत्तुंग भरारी; ५ मुली झाल्या RAS अधिकारी, एकेकाळी फीसाठी नव्हते पैसे
17
IndiGo: सरकारचा इंडिगो एअरलाइन्सला दणका, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय
18
नवरदेवाने कर्ज काढून लग्न केलं; पहिल्या रात्रीच नववधूने कांड केलं; कळताच कुटुंबाला बसला मोठा धक्का!
19
विराटच्या RCB ने IPL जिंकले पण 'अर्थव्यवस्था' कोसळली! लीगची ब्रँड व्हॅल्यू ६,६०० कोटींनी घटली
20
वडील नव्हे तर आईच्या जातीच्या आधारे मुलीला मिळणार SC प्रमाणपत्र; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"नेहमी एकाच समाजाचे लोक आग का लावतात?;" भोपाळमधील मुस्लीम रॅलीवर बाबा रामदेव म्हणाले...

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 30, 2020 17:05 IST

यावेळी बाबा रामदेव यांनी देशातील मुस्लिमांच्या वृत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'नेहमी-नेहमी एकाच समाजाचे लोक का आग लावायला सुरुवात करतात? मग हिंदूही विचार करतील, की

ठळक मुद्देभोपाळमधील इकबाल मैदानावर मुस्लीम समाजाने फ्रान्सविरोधात रॅली केली. भारताने फ्रान्सचे उघडपणे समर्थन केले आहे.रामदेव म्हणाले, धार्मिक उन्मादामुळेच जग भरात युद्धे होतात.

नवी दिल्ली - भोपाळमधील इकबाल मैदानावर मुस्लीम समाजाने फ्रान्सविरोधात रॅली केली. यामुळे देशातील एक मोठ्या वर्गाकडून संताप व्यक्त होत आहे. भारताने फ्रान्सचे उघडपणे समर्थन केले असताना, एक विशिष्ट समाज त्याला विरोध करून काय सांगू इच्छितो? असा सवाल लोक करत आहेत. यातच फ्रान्सच्या राष्ट्रपतींविरोधात भारतात एका विशिष्ट समाजाने केलेले निदर्शन अत्यंत दुर्दैवी असल्याचे, योग गुरू बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना, सरकारने अशा प्रकारच्या  कार्यक्रमांना परवानगी देणे योग्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Nice Attack: मुंबईच्या रस्त्यावर फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉनचे पोस्टर्स पायदळी तुडवले; रझा अकादमीचं कृत्य

'नेहमी-नेहमी एकच समाज का आग लावतो' - यावेळी बाबा रामदेव यांनी देशातील मुस्लिमांच्या वृत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'नेहमी-नेहमी एकाच समाजाचे लोक का आग लावायला सुरुवात करतात? मग हिंदूही विचार करतील, की आगच लावावी. आपण आपल्या मान्यतांवर विश्वास ठेवा, मात्र, संपूर्ण जगावर तर हे थोपू शकत नाही. स्वतःप्रति दृढ रहा आणि इतरांप्रति उदार रहा. स्वधर्म निष्ठा, परधर्म सहिष्णुता ठेवा'. रामदेव म्हणाले, ध्रुवीकरणाचे घृणास्पद राजकारण संपायला हवे. यावर लगाम लागायला हवा.'

मुस्लिमांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार; मलेशियाचे माजी PM महातिर मोहम्मद यांचं प्रक्षोभक वक्तव्य

'धार्मिक उन्मादामुळेच युद्ध होतात' - रामदेव म्हणाले, धार्मिक उन्मादामुळेच जग भरात युद्धे होतात. 'आजवर जगभरात झालेल्या लढायांचे सर्वात मोठे कारण हे धार्मिक उन्माद आहे. धार्मिक दंगे आहेत.' यावेळी, पैगंबर मोहम्मद, यशू ख्रिस्त, गुरुनानक देव जी, भगवान महावीर, बुद्ध, भगवान राम, कृष्ण, शिव, कुठल्याही महापुरुषाने धार्मिक कट्टरतेसंदर्भात भाष्य केले आहे? असा सवाल करत, कधीच नाही,' असे बाबा रामदेव म्हणाले. या सर्वांनी एकच गोष्ट सांगितली आहे, 'सर्व मानुष्य एकसारखेच आहेत. हिंसा तर अत्यंत दूरची गोष्ट, हे म्हणतात, की कधीही कुणाचे मन दुखवू नका. मग हा काय तमाशा सुरू आहे? कशासाठी निदर्शन होत आहे?'

योग गुरू म्हणाले, एखाद्या व्यक्तीची मान कापली जाते, हत्या केली जाते. यासाठी, की आमच्या पुर्वजाचे कार्टून का तयार केले? त्यांनी प्रश्न उपस्थित केला, की 'एवढी असहिष्णुता का?' रामदेव म्हणाले, 'धर्माच्या नावावर हत्या करणे, लोकांचा शिरच्छेद करणे, लोकांची कत्तल करणे, हा धर्म नाही, अधर्म आहे, हे पाप आहे, हा गुन्हा आहे. हे जगाला युद्धाकडे ढकलणारे आहे.'

"वेदनादायक शिक्षा मिळेल..."; फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासंदर्भात झाकीर नाईकने ओकली गरळ

'संपूर्ण जगात पसरवला जातोय विध्वंसक विचार' -रामदेव म्हणाले, एक विद्धवंसक विचार संपूर्ण जगात पसरवला जात आहे. काही लोक म्हणतात, की इस्लामचा स्वीकार करा, अन्यथा मारून टाकू. काही लोक म्हणतात, की ख्रिश्चन व्हा, अन्यथा स्वर्ग मिळणार नाही. काही लोक म्हणतात, हिंदू धर्म स्वीकारा, अन्यथा मोक्ष मिळणार नाही. मग परत दुसरे-तिसरे आणखी येतात. रामदेव म्हणाले, 'लोक जोवर आपल्या धर्माला श्रेष्ठ आणि दुसऱ्याच्या धर्माला निकृष्ट म्हणत राहतील, तोवर जगात आग लागतच राहणार.'

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाMuslimमुस्लीमFranceफ्रान्सIslamइस्लाम