शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

मंदिरांच्या सुरक्षेसाठी मुस्लीम बांधवांचा पहारा!दंगलखोरांपासून गुरुकुल, गोशाळा वाचविण्यासाठी सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 08:19 IST

मंदिरांच्या सुरक्षेसाठी या भागातील ४१९ गावांमध्ये सर्व समाज समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या असून, त्या हिंसाचाराच्या दिवसापासून मंदिराबाहेर सतत पहारा देत आहेत.

बलवंत तक्षक -

चंडीगड : हरयाणातील नूह येथे हिंसाचार सुरू असतानाही मुस्लिम समाजाचे लोक सुरक्षेसाठी मंदिरांचा पहारा देत आहेत. नूह येथील बदकाली चौकात ३१ जुलै रोजी झालेल्या हिंसाचारानंतर एकाही मंदिराचे त्यांनी नुकसान होऊ दिलेले नाही. मंदिरांच्या सुरक्षेसाठी या भागातील ४१९ गावांमध्ये सर्व समाज समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या असून, त्या हिंसाचाराच्या दिवसापासून मंदिराबाहेर सतत पहारा देत आहेत.

नूहची गणना देशातील सर्वात मागास जिल्ह्यांमध्ये केली जाते. येथील ८० टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. नूह व्यतिरिक्त, फिरोजपूर झिरका, तावडू, पिंगवान, नगीना आणि पुनहाना या शहरांमध्ये २५ टक्क्यांहून अधिक हिंदू लोकसंख्या आहे. अनेक गावांमध्ये ९० टक्क्यांपर्यंत मुस्लिम लोकसंख्या आहे.

मरोडा गावचे सरपंच मुश्ताक खान म्हणतात की, ‘नूहमध्ये हिंसाचार झाला असला तरी मेवातमध्ये गंगा-जमुनी संस्कृती कायम आहे. ही संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी मुस्लिम लोक मंदिरांसमोर पहारा ठेवत आहे.  हिंसाचारानंतर लाठ्या-काठ्या, रॉड आणि शस्त्रे घेऊन आलेल्या शेकडो दंगलखोरांपासून गुरूकुल, गोशाळा वाचविण्याचे काम मुस्लिम समाजातील लोकांनी केले.’  खान म्हणाले की, दंगलखोरांना धर्म नसतो. समाजात द्वेष निर्माण करणे हे त्यांचे काम आहे. पण आपल्याला गंगा-जमुनी संस्कृती जपायची आहे आणि त्यासाठी आपण कधीही मागे हटणार नाही.’

चारही बाजुने वेढा, मुले घाबरली होती अन्...- भादस गावातील गुरूकुलचे आचार्य तरुण महाराज म्हणाले की, ‘सरपंच शौकत अली यांनी हिंसाचाराच्या काळात हिंदू-मुस्लिम बंधूभावाचा आदर्श ठेवला. गुरूकुलला चारही बाजूंनी वेढा घातला होता, मुले घाबरली होती. पण शौकत अली यांनी त्यांना सर्वतोपरी मदत केली. गोठ्यावर हल्ला करण्याचा डावही त्यांनी हाणून पाडला.- ’ गोशाळेचे संचालक वेदप्रकाश परमार्थी यांच्या म्हणण्यानुसार, मुस्लिम बांधव हे त्यांचे सुख-दु:खात सोबती आहेत. हरयाणा हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत २०२ जणांना अटक करण्यात आली आहे.

हिंसाचारावेळी रजा, एसपींची बदली- हरयाणातील नूह जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) वरुण सिंगला जिल्ह्यातील हिंसाचारावेळी रजेवर होते, त्यामुळे त्यांची बदली भिवानी येथे त्याच पदावर करण्यात आली आहे. 

आज काय घडले?- पानिपतमध्ये दुकानाची तोडफोड- मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त- गुरुग्राममध्ये तीन दुचाकी जाळल्या- अनेक परिसरात सलोखा-बंधुभाव

टॅग्स :HaryanaहरयाणाMuslimमुस्लीम