शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मुंबईचे पाणी देशात सर्वाधिक शुद्ध; दिल्लीत हवाच नव्हे, पिण्याचे पाणीही अशुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2019 06:22 IST

दिल्लीची हवाच नव्हे, तर पाणीही अशुद्ध असल्याची माहिती दावा केंद्रीय ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी दिली.

- एस. के. गुप्तानवी दिल्ली : दिल्लीची हवाच नव्हे, तर पाणीही अशुद्ध असल्याची माहिती दावा केंद्रीय ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी दिली. भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) २० राज्यांच्या राजधान्यांच्या केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांनी हे सांगितले.मुंबईत नळाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या नमुन्यांत दोष नसल्याचे आढळून आले आहे. २१ मोठ्या शहरांतील पाण्याच्या शुद्धतेत मुंबई पहिल्या स्थानी आहे. मुंबईतील पाण्याचे सर्व दहा नमुने तपासणीत उत्तीर्ण झाले आहेत. चंदीगडमधील पाण्यात अ‍ॅल्युमिनियम आणि क्लोरीनचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले. पासवान म्हणाले की, २१ शहरांतील पाण्याचे १० नमुने तपासणीस पाठवले होते. त्यात दिल्लीचे सर्व नमुने ४२ पैकी १९ मानकांवर नापास झाले. दिल्लीच्या पाण्यात आर्सेनिक, क्लोराईड, टीडीएस, रंग, अमोनिया, सल्फाईड, अ‍ॅनियोनिक डिटर्जंट, लीड, मॅग्नेशियम, कॅल्शिअम नायट्रेट, अ‍ॅल्युमिनियम यांचे प्रमाण अधिक आढळून आले. महाराष्ट्रात अमरावती जिल्हा सहाव्या स्थानी असून, तेथील १० पैकी ६ नमुने नापास झाले. त्यांच्यात ७ मानकांत दोष आढळून आले. पासवान म्हणाले की, आमचा उद्देश कोणत्याही सरकारला दोष देणे हा नाही, हे दिल्ली सरकारला दाखवून देण्यासाठी देशभर सर्वेक्षण केले. २०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाचे स्वच्छ पाणी देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. १०० स्मार्ट शहरांतही पाण्याची तपासणी केली जात आहे.पाणीशुद्धतेत शहरांचे मानांकन१ मुंबई । २ हैदराबाद । ३ भुवनेश्वर । ४ रांची । ५ रायपूर६ अमरावती । ७ सिमला । ८ चंदीगड । ९ तिरुवनंतपूरम१० पाटणा । ११ भोपाळ । १२ गुवाहाटी । १३ बंगळुरू१४ गांधीनगर । १५ लखनौ । १६ जम्मू । १७ जयपूर१८ देहरादून । १९ चेन्नई । २० कोलकता । २१ दिल्ली