शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

मुंबईवरील 26/11चा हल्ला कधीही विसरणार नाही, दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देऊ- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 13:29 IST

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून 26/11च्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली वाहिली आहे

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून 26/11च्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेत सुरक्षा जवानांच्या शौर्यालाही सलाम केला आहे. दहशतवाद हे जगातील मानवतेसाठी एक आव्हान बनलं आहे. दहशतवादाविरोधात जगातील सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र यायला पाहिजे. तसेच मोदींनी संविधान दिवसाच्या निमित्तानं संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम भाजपा अध्यक्ष अमित शाहांनी इतर नेत्यांसोबत ऐकला. 26/11 आपला संविधान दिवस आहे. परंतु हे देश कसं विसरू शकेल, की 9 वर्षांपूर्वी याच दिवशी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. भारत देश त्या शूरवीर नागरिक, पोलीस, सुरक्षा जवानांना सदैव स्मरणात ठेवेल. ज्यांनी या हल्ल्यात स्वतःचा जीव गमावला आहे, त्याचं बलिदान कधीही विसरता येणार नाही. भारताचं संविधान हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. आजचा दिवस संविधान सभेच्या सदस्यांना स्मरण करण्याचा दिवस आहे. आपण भारताच्या ज्या संविधानाचा जयजयकार करतो ते संविधान बाबासाहेबांसाख्या कुशल नेतृत्वामुळे प्रत्यक्षात अवतरलं आहे. संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. देशाला समृद्ध आणि शक्तिशाली बनवण्यात बाबासाहेबांचं मोठं योगदान आहे.तसेच 4 डिसेंबर रोजी नौदल दिवस साजरा करणार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं आहे. जर तुम्हाला शेतातल्या पिकांची चिंता आहे, तर त्या धरणीमातेचीही काळजी घ्यावी लागणार आहे. 3 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी 'मन की बात'मधून दिव्यांगांना प्रोत्साहित केलं. दिव्यांग दृढनिश्चयी आणि शक्तिशाली आणि धाडसी आहेत. प्रत्येक क्षणी त्यांच्याकडून काही ना काही शिकायला मिळतं. सध्या प्रत्येक क्षेत्रात ते चांगलं काम करत आहेत, असं मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी