शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

मुंबईवरील 26/11चा हल्ला कधीही विसरणार नाही, दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देऊ- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 13:29 IST

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून 26/11च्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली वाहिली आहे

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून 26/11च्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेत सुरक्षा जवानांच्या शौर्यालाही सलाम केला आहे. दहशतवाद हे जगातील मानवतेसाठी एक आव्हान बनलं आहे. दहशतवादाविरोधात जगातील सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र यायला पाहिजे. तसेच मोदींनी संविधान दिवसाच्या निमित्तानं संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम भाजपा अध्यक्ष अमित शाहांनी इतर नेत्यांसोबत ऐकला. 26/11 आपला संविधान दिवस आहे. परंतु हे देश कसं विसरू शकेल, की 9 वर्षांपूर्वी याच दिवशी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. भारत देश त्या शूरवीर नागरिक, पोलीस, सुरक्षा जवानांना सदैव स्मरणात ठेवेल. ज्यांनी या हल्ल्यात स्वतःचा जीव गमावला आहे, त्याचं बलिदान कधीही विसरता येणार नाही. भारताचं संविधान हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. आजचा दिवस संविधान सभेच्या सदस्यांना स्मरण करण्याचा दिवस आहे. आपण भारताच्या ज्या संविधानाचा जयजयकार करतो ते संविधान बाबासाहेबांसाख्या कुशल नेतृत्वामुळे प्रत्यक्षात अवतरलं आहे. संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. देशाला समृद्ध आणि शक्तिशाली बनवण्यात बाबासाहेबांचं मोठं योगदान आहे.तसेच 4 डिसेंबर रोजी नौदल दिवस साजरा करणार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं आहे. जर तुम्हाला शेतातल्या पिकांची चिंता आहे, तर त्या धरणीमातेचीही काळजी घ्यावी लागणार आहे. 3 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी 'मन की बात'मधून दिव्यांगांना प्रोत्साहित केलं. दिव्यांग दृढनिश्चयी आणि शक्तिशाली आणि धाडसी आहेत. प्रत्येक क्षणी त्यांच्याकडून काही ना काही शिकायला मिळतं. सध्या प्रत्येक क्षेत्रात ते चांगलं काम करत आहेत, असं मोदी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी