शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

मुंबई-पुण्यातील प्रवासी अडकले चीनच्या सीमेवर, ट्रॅव्हल्स कंपनीच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 02:51 IST

पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमधून कैलास मानसरोवरासह इतर पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी गेलेले पर्यटक तीन दिवसांपासून चीनच्या सीमेवर अडकून पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे : पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरांमधून कैलास मानसरोवरासह इतर पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी गेलेले पर्यटक तीन दिवसांपासून चीनच्या सीमेवर अडकून पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ट्रॅव्हल्स कंपनीच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पर्यटकांना त्रास सहन करावा लागला. मात्र, मंगळवारी या पर्यटकांचा पुढील प्रवास सुरू होणार आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे कोणतीही माहिती नससल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.पुण्यातील ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून हे पर्यटक कैलास मानस सरोवर यात्रेसाठी गेले आहेत. त्यात पुणे, बारामती, मुंबई, बेळगाव, सांगलीमधील ५८ पर्यटकांचा समावेश आहे. पुण्याच्या रघुकुल हॉलीडेज या ट्रॅव्हल्स कंपनीचे नेपाळ मधील ट्रॅव्हल्स कंपन्यांबरोबर आर्थिक व्यवहारहोते. या कंपनीनेने नेपाळच्या ट्रॅव्हल्स कंपन्यांना ५४ लाख रुपये देणे अपेक्षित होते. पैसे मिळाल्याशिवाय पर्यटकांचा प्रवास होणार नाही,अशी भूमिका संबंधित कंपन्यांनी घेतली. परंतु, तीन दिवस अडकून पडल्याने पर्यटकांनी नेपाळमधील भारतीय दुतावासाशी व केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी संपर्क साधला, असे पर्यटकांच्या नातेवाईकांनी सांगितले.रघुकुल हॉलीडेज कंपनीचे अमित कुलकर्णी म्हणाले, संबंधित पर्यटक नेपाळमधील काठमांडूपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर तैमूर येथे आहेत. तेथून जवळच चीनची सीमा आहे. मात्र, पर्यटकांच्या प्रवासाचा प्रश्न मार्गी लागला असून मंगळवारपासून त्यांचा पुढील प्रवास सुरू होणार आहे. येत्या ४ जुलैपर्यंत विविध ठिकाणी फिरून आल्यानंतर त्यांचा प्रवास संपणार आहे.प्रवाशांनी नातेवाइकांना माहिती देताना सांगितले, रघुकल हॉलीडेजकडून तातडीने पैसे मिळण्याची मागणी काठमांडू येथील द ट्रेकर्स सोसायटी प्रा. लि. या कंपनीने केली होती. त्याशिवाय पर्यटकांना सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.