शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

मुंबई, पुण्यासह देशातील नऊ शहरांत घरांच्या विक्रीत २५ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 06:35 IST

नव्या गृहनिर्माण प्रकल्पांनाही फटका

नवी दिल्ली : मुंबई, पुण्यासह नऊ शहरांमध्ये  या वर्षीच्या जुलै ते सप्टेंबर या काळात घरांच्या विक्रीत २५ टक्क्यांची घट झाली आहे. ग्राहकांचा थंड प्रतिसाद पाहता नव्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये ४५ टक्क्यांची कपात झाली आहे.

प्रॉपटायगर या संस्थेने केलेल्या पाहणीतून हे निष्कर्ष आले आहेत. या काळात नऊ महत्त्वाच्या शहरांमध्ये फक्त ६५,७९९ घरांची विक्री झाली. जुलै ते सप्टेंबरपर्यंत सात महत्त्वाच्या शहरांमध्ये घरांची विक्री घटल्याचा निष्कर्ष अ‍ॅनारॉक व जेएलएल या संस्थांनीही काढला होता. अ‍ॅनारॉकच्या मते घरविक्रीत१८ टक्के तर जेएलएलच्या मते १ टक्का घट झाली होती.

रिअल इनसाइट या स्थावर मालमत्तेबाबतच्या संस्थेने म्हटले आहे की, नऊ शहरांमध्ये गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ८८,०७८ घरांची विक्री झाली होती. यंदा मात्र या काळात मोठी घट झाली. गेल्या वर्षी या काळात ६१,६७९ घरबांधणीची नवी कामे सुरू झाली होती. यंदा फक्त ३३,८८३ नवी घरे बांधण्याच्या कामांना प्रारंभ झाला आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे यासह मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नॉयडा (ग्रेटर नॉयडा, यमुना एक्स्प्रेस-वेसहित प्रदेश समाविष्ट), गुरगाव (भिवाडी,धारुहेरा, सोहनासह), बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद या शहरांमधील घरांच्या विक्री व नव्या गृहनिर्माण प्रकल्पांसंदर्भात प्रॉपटायगरने पाहणी केली होती.

स्थिती ‘जैसे थे’च राहील

देशात आर्थिक मंदीसदृश्य वातावरण आहे. बिगरबँकिंग वित्तसंस्था मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत. त्यामुळे बिल्डरांना स्थावर मालमत्तेच्या कामांसाठी होणारा पतपुरवठा आटला आहे. सणासुदीचे दिवस असूनही अनेक ग्राहकांनी नवी घरे घेण्याचा विचार पुढे ढकलला आहे. त्यामुळे घरांच्या विक्रीवर परिणाम होत आहे. आगामी तिमाहीमध्येही नवे गृहनिर्माण प्रकल्प सुरू होण्याचे प्रमाण कमीच राहील, असा अंदाज प्रॉपटायगरसह काही संस्थांनी वर्तविला आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाHomeघर