शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मुंबई, पुण्यासह देशातील नऊ शहरांत घरांच्या विक्रीत २५ टक्के घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 06:35 IST

नव्या गृहनिर्माण प्रकल्पांनाही फटका

नवी दिल्ली : मुंबई, पुण्यासह नऊ शहरांमध्ये  या वर्षीच्या जुलै ते सप्टेंबर या काळात घरांच्या विक्रीत २५ टक्क्यांची घट झाली आहे. ग्राहकांचा थंड प्रतिसाद पाहता नव्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये ४५ टक्क्यांची कपात झाली आहे.

प्रॉपटायगर या संस्थेने केलेल्या पाहणीतून हे निष्कर्ष आले आहेत. या काळात नऊ महत्त्वाच्या शहरांमध्ये फक्त ६५,७९९ घरांची विक्री झाली. जुलै ते सप्टेंबरपर्यंत सात महत्त्वाच्या शहरांमध्ये घरांची विक्री घटल्याचा निष्कर्ष अ‍ॅनारॉक व जेएलएल या संस्थांनीही काढला होता. अ‍ॅनारॉकच्या मते घरविक्रीत१८ टक्के तर जेएलएलच्या मते १ टक्का घट झाली होती.

रिअल इनसाइट या स्थावर मालमत्तेबाबतच्या संस्थेने म्हटले आहे की, नऊ शहरांमध्ये गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ८८,०७८ घरांची विक्री झाली होती. यंदा मात्र या काळात मोठी घट झाली. गेल्या वर्षी या काळात ६१,६७९ घरबांधणीची नवी कामे सुरू झाली होती. यंदा फक्त ३३,८८३ नवी घरे बांधण्याच्या कामांना प्रारंभ झाला आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे यासह मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नॉयडा (ग्रेटर नॉयडा, यमुना एक्स्प्रेस-वेसहित प्रदेश समाविष्ट), गुरगाव (भिवाडी,धारुहेरा, सोहनासह), बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद या शहरांमधील घरांच्या विक्री व नव्या गृहनिर्माण प्रकल्पांसंदर्भात प्रॉपटायगरने पाहणी केली होती.

स्थिती ‘जैसे थे’च राहील

देशात आर्थिक मंदीसदृश्य वातावरण आहे. बिगरबँकिंग वित्तसंस्था मोठ्या आर्थिक संकटातून जात आहेत. त्यामुळे बिल्डरांना स्थावर मालमत्तेच्या कामांसाठी होणारा पतपुरवठा आटला आहे. सणासुदीचे दिवस असूनही अनेक ग्राहकांनी नवी घरे घेण्याचा विचार पुढे ढकलला आहे. त्यामुळे घरांच्या विक्रीवर परिणाम होत आहे. आगामी तिमाहीमध्येही नवे गृहनिर्माण प्रकल्प सुरू होण्याचे प्रमाण कमीच राहील, असा अंदाज प्रॉपटायगरसह काही संस्थांनी वर्तविला आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्थाHomeघर