शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पंतप्रधानपदासाठी मुखर्जी माझ्याहून अधिक पात्र होते - डॉ. मनमोहन सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 05:15 IST

पंतप्रधानपदासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे माझ्याहून अधिक पात्र होते असे विधान माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी येथे केले. प्रणव मुखर्जी यांनी लिहिलेल्या ‘द कोअ‍ॅलिशन इयर्स-१९९२-२0१२’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

नवी दिल्ली : पंतप्रधानपदासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे माझ्याहून अधिक पात्र होते असे विधान माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी येथे केले. प्रणव मुखर्जी यांनी लिहिलेल्या ‘द कोअ‍ॅलिशन इयर्स-१९९२-२0१२’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.माझ्याहून अधिक योग्यता व पात्रता असतानाही पंतप्रधानपदासाठी आपल्या नावाचा विचार झाला नाही वा आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी तक्रार करण्यासाठी अनेक कारणे प्रणव मुखर्जी यांच्याकडे आहेत, असे सांगून मनमोहन सिंग म्हणाले की, अर्थात मला पंतप्रधान करण्यात आले आणि ते पद स्वीकारण्याखेरीज माझ्याकडे अन्य पर्याय नव्हता. पण त्यामुळे आम्हा दोघांच्या संबंधात काहीही फरक पडला नाही.या समारंभाला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी हेही उपस्थित होते. माजी पंतप्रधानांच्या वरील विधानांमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. सोनिया गांधी व राहुल गांधी यांची भाषणे झाली नाहीत.डॉ. सिंग म्हणाले की, २00४ साली सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदासाठी माझी निवड केली, तेव्हा प्रणव मुखर्जी माझ्या प्रतिष्ठित व महत्त्वाच्या सहकाºयांपैकी एक होते. ते पंतप्रधान होण्यासाठी अधिक पात्र होते. त्यामुळे आपणास पंतप्रधान करण्यात आले नाही, अशी तक्रार करण्याचे कारण त्यांच्याकडे होते. मुखर्जी हे ठरवून राजकारणात आले.देशातील एक सर्वोत्तम राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मी मात्र अपघाताने राजकारणात आलो, पी. व्ही. नरसिंह राव यांनी मी अर्थमंत्री व्हावा, असा आग्रह धरला, तशी आॅफर त्यांनी मला दिली आणि तेव्हाच माझा राजकीय प्रवास सुरु झाला, याचा उल्लेख करून माजी पंतप्रधान म्हणाले की, यूपीए सरकार नीट चालण्याचे श्रेय प्रणव मुखर्जी यांना द्यायलाच हवे. जेव्हा कधी अडचण येत असे, तेव्हा आम्ही त्यांचा सल्ला घेत असू आणि तेच अडचणीतून मार्ग काढत असत. डॉ. मनमोहन सिंग यांनी शरद पवार यांच्यासारखा कर्तबगार नेताही आमच्या मंत्रिमंडळात होता, अशा शब्दांत त्यांचेही कौतुक केले.या समारंभाला सर्व राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनीही प्रणव मुखर्जी यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. मुखर्जी यांच्या स्मरणशक्तीचा उल्लेख करताना, त्यांनी ती हत्तीसारखी असल्याचे नमूद केले. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव सुधाकर रेड्डी, बसपाचे खा. सतीशचंद्र मित्रा, द्रमुकच्या नेत्या कणीमोळी यांचीही यावेळी भाषणे झाली. कोअ‍ॅलिशन इयर्स १९९६-२0१२ या पुस्तकात माजी राष्ट्रपती मुखर्जी यांनी १९९६ सालच्या संयुक्त मोर्चाच्या सरकारपासून यूपीए दोनच्या सरकारपर्यंतच्या कार्यकाळातील घडामोडींचा आढावा घेतला आहे.माझी अपेक्षा होती- काँग्रेसला २00४ साली विजय मिळाल्यानंतर पंतप्रधान कोणाला करणार, यावर पक्षामध्ये तर्कवितर्क लढवले जात होते. सोनिया गांधी त्या पदासाठी माझी निवड करतील, अशी माझी अपेक्षा होती.त्यांनी आधीच स्वत: पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिला होता. माझा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता, मला पंतप्रधान केले जातील, असे मला वाटत होते, असे प्रणव मुखर्जी यांनी पुस्तकात नमूद केले आहे.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंग